मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|निरंजन माधव|श्री ज्ञानेश्वरविजय|समाधि प्रकरण| अध्याय पांचवा समाधि प्रकरण अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा उपसंहार समाधि प्रकरण - अध्याय पांचवा निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे. Tags : niranjan madhavpoemsongकवितागाणीनिरंजन माधव अध्याय पांचवा Translation - भाषांतर देखोनियां नाचत नामयांते । रंगी तया श्रीहरिसन्निधीतें ।बोले तदां ते जननी जगाची । श्रीरुक्मिणी हांसुनि मंदवाची ॥१॥नाम्यासि या विष्णुपदासि न्यावें । सायुज्य मुक्तीप्रति यासि द्यावें ।हा योग्य आहे अतिभक्त नामा । आज्ञा करावी सुरसार्वभौमा ॥२॥हरी मुखा पाहुनि नामयाच्या । बोले महामेघ - गभीर - वाचा ।नेतों तुला मुक्तिपदासी नामा । देईन सायुज्य अलभ्य तें मा ॥३॥या भीमकीला तरि हेंचि माने । आरुढ हो हंसयुतें विमानें ।जायीं पदी राहुनि सौख्य भोगीं । जेथें सदां राहति भक्तयोगी ॥४॥हे ऐकतां विठ्ठलवक्त्रवीणा । नामा वदे केवळ दीनवाणी ।वंदी पदाब्जीं उभयांस माथां । उपेक्षितां कां मजला अनाथा ॥५॥नको नको मुक्ति तुझी दयाळा । विमान हंसान्वित हें कशाला ।देयीं तुझ्या केवळ प्रेमळांतें । जे इच्छिती मुक्ति अखंड त्यातें ॥६॥भांडार तूझें हरि हेंच मोटें । तें मुक्ति देयीं स्वजनासि नेटें ।नको नको मुक्ति कदापि मातें । वैकुंठ तेंही मज किंकरातें ॥७॥जीवंत मी भोगित मुक्ति येथें । राहें सुखें सेउनि पंढरीतें नाचोनि रंगी तुझिया समोरा । श्रीभीमरावाळवटी उदारा ॥८॥हे दास तूझे मिळताति तेथें । करीन संकीर्तन भक्तियुक्तें । गायीन गाथा तुमच्या अनंता । नानावतारीं करिसी अनंता ॥९॥ज्या ज्या युगीं त्वां अवतार कीजे । मीही तसा होउनियां विराजें ।आयी ! पुसावें तुम्हि विठ्ठलाते । कोठें न होतों हरिच्या समेतें ? ॥१०॥जेव्हा जळीं हा झषरुप झाला । मी भक्त सत्यव्रत त्याच वेळां ।जेव्हां घडे कूर्मशरीरधारी । मी जाहलों मंदर या शरीरीं ॥११॥जेव्हां घडे देव वराहरुपी । मी जाहलो कंकरभूमिरुपी ।खांबांत झाला नरसिंह जेव्हां । प्रल्हाद मी सन्निध भक्त तेव्हां ॥१२॥जैं जाहला वामन ब्रह्मचारी । मी पादुका तैं घडलों विचारीं ।हा जाहला भार्गवरुप जेव्हां । मी जाहलो तीक्ष्णकुठार तेव्हां ॥१३॥जेव्हां घडे राघव चापपाणी । मी मारुती दास यथार्थ मानी ।हा कृष्ण तैं उद्धव मींच झालों । याच्याच बोधें बरवा निवालों ॥१४॥हा पंढरीनायक मीच नामा । उभा असे सन्निध जाणसी मा ।नाचें पुढें मी जननी अखंअ । मुक्तीहुनी हें सुख फार गोड ॥१५॥भक्तीविना इच्छिल मुक्ति कोणी । धिगधिक्तया मी अति तुच्छ मानी ।नको नको मुक्ति कदापि माये । मी भक्तियोगें भुवनीं न माये ॥१६॥तूं मुक्ति ते वो फळ जाण आयी । हें सौख्य त्या मुक्तिपदांत नाहीं ।नि:सार ते मुक्ति कशासि मातें । नामामृतप्राशन नात्ति जेथें ॥१७॥नि:सीम जे भक्त असेति त्यांची । वंदीन मी धूळि पदांबुजाची ।मुक्तीहुनी ते शतकोटि वाटे । विशेष तें प्रेम मनीं न सांटे ॥१८॥श्रीराम नारायण वासुदेव । मुकूंद विष्णु विभु देवदेव ।श्रीरुक्मिणीनायक दीनबंधू । स्वछंद मी गायीन हा प्रबंधू ॥१९॥नामामृतातें बहुसाल प्यालों । बोधें तयाच्या अतिमत्त झालों ।निजाबुभूती सति नित्य भोगीं । मी मुक्तिदासीविषयी विरागी ॥२०॥म्यां लोटिलें मुक्तिपदासि लातें । भजोनि भावें पुरुषोत्तमातें ।कर्माख्य माझें पट तें गळालें । मी पांडुरंगांगणिं नित्य लोळें ॥२१॥तूं आदिमाता म्हणवोनि तूंतें । मी बोलिलों हृद्गत गुह्य माते ।हें गूज माझें कवणासि दाऊं । सांगे सती हें कवणासि देऊं ॥२२॥मौनेंचि म्यां सांठविलें स्वचित्तीं । न बोलतां विठ्ठलपाय चिंतीं ।हा अंतरात्मा हरि एक जाणे । तूं मावली जाणसि वो सुजाणे ॥२३॥हे नामदेवामुखिंची सुवाणी । ऐकोनि हांसे मग कृष्णराणी ।श्रीरुक्मिणी धन्य म्हणोनि राहे । ज्ञानेश्वरें ऐकुनि मात तेहे ॥२४॥श्रीभीमकीतें विनवोनि बोले । जे ऐकतां सज्जन तैं निवाले ।तें ऐकिजे सर्वहि संतलोकीं । हा श्रेष्ठ संवाद असे त्रिलोकीं ॥२५॥द्रुतविलंबित.वदत ज्ञानमणी जननीपुढें । परिस वो कथितों सति साबडें ।सकळ जाणसि तूं जगदीश्वरी । तदपि बाळगिरामृत स्वीकरी ॥२६॥परम भक्ति घडोनि जनाप्रती । सुजडतारक होसिल तूं सती ।गहन चित्पदिंची अनुभूति तूं । अससिं वो परमेश्वर शक्ति तूं ॥२७॥म्हणुनि हें तुजसीं अनुवादतों । अनुभवामृत तूंज निवेदितों ।अमर ते हरिभक्त अखंड ते । कुशल वर्तति नाशविहीन ते ॥२८॥हरिपदाब्जरजोत्तम लाधले । म्हणुनि ते पुरुषोत्तम जाहले ।न गणिती तरि मुक्ति-महापदा । पतनवंत गणोनि महाऽऽपदा ॥२९॥हरिपदाब्जरजीं महिमा असे । तसि कदापि न मुक्तिपदीं दिसे ।हरिनखांशुविमिश्रमहाजळा । शिव धरी मुकुटीं परमोज्ज्वळा ॥३०॥घडत मज्जनयोग महेश्वरा । शिव महावन डाकिनि शंकरा ।घडत भीमरथी त्रिजगोद्धरा । विलसते नरलोकयशरकरा ॥३१॥मिळुनियां तरि इंद्रनदीप्रती । बहुत पावलिसे जगिं उन्नती ।हळुच हे उत्तरे फणिआलया । म्हणति भोगवती समुदें जिया ॥३२॥कलुष गौतम सन्मुनि पावला । घडत गोवध पातक त्याजला ।म्हणुनि तो शिवभक्ति बरी करी । हर तयाप्रति दे भुवनोद्धरी ॥३३॥शिवजटेंतुनि वोघ निघे तदां । अमल ब्रह्मगिरीशिखरी मुदा ।करुनि गौतम ते कुशवेष्टिता । लभत मज्जन पाचत मुक्तता ॥३४॥गोदावरी ते भवबंध नाशी । तारी कळीमाजी महाजनांसी ।भगीरथें प्रार्थुनि देवदेवा । मागीतली लोकनुतप्रभावा ॥३५॥पित्राचिया उद्धरणार्थ वेगें । शिवें दिल्हा वोघ महानुरागें ।भगीरथातें म्हणवोनि लोकीं । भागीरथी ख्यात असे त्रिलोकी ॥३६॥मंदाकिनी निर्जरलोकवासी । भागीरथी मानवोदोष नाशी ।पाताळलोकीं अळकावतीतें । त्या सागरा उद्धरणार्थ जाते ॥३७॥हे तीर्थ झाली पदरेणुसंगें । तो स्वामि आम्हां हृदयांत रंगे ।त्या सांडितां मुक्ति अम्हांसि कैशी । फळे तूं सांग समर्थ होसी ॥३८॥तीर्थादि हे किंकर ज्या विभूचे । आम्ही असों केवळ दास त्याचे ।नामींच आम्हां सकळार्थसिद्धि । मुक्ती अम्हां वंदिति नित्य आधीं ॥३९॥हें एवढें बीज अम्हांसि ठावें । म्हणोनि यातें पडलें भजावें ।आहे अम्हां विठ्ठल वित्त पूर्ण । याचे कृपे मुक्ति गणील कोण ॥४०॥हें ऐकतां विठ्ठल ज्ञानियाची । वाणी सुधातुल्य महारसाची ।प्रेमें अलिंगी मग हस्त माथां । ठेवी सुतोषें परिपूर्ण भक्ता ॥४१॥॥ इति श्रीज्ञानेश्वरविजयमहाकाव्ये समाधिवर्णने रुक्मिणीनामदेवज्ञानदेवसंवादोनाम पंचमोध्याय: ॥ श्लोक ३०६ ॥ N/A References : N/A Last Updated : February 28, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP