मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध २|
तीर्थादि साधनानें आत्महत्या

धर्मसिंधु - तीर्थादि साधनानें आत्महत्या

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


विद्यमानकालीन शिष्ट तर रोगादिकांची पीडा सहन करण्यास असमर्थ झाले असतां सन्यासाश्रम घेऊन तीर्थादि साधनानें आत्महत्या करितात. गृहस्थाश्रमी विधुर इत्यादिक करीत नाहीं. अपरिहार्य अशा रोगानें ग्रस्त झालेल्या वृद्धादिकांची जलादि साधनानें बुद्धिपूर्वक आत्महत्या कलियुगांत प्रयागावांचून अन्यत्र होत नाही. कारण भृगु, अग्नि, इत्यादिकांचे ठायी जीं पतनें त्यांनीं वृद्धादिकांचें मरण इत्यादि कलिवर्जात परिगणन केलें आहे, असें कोणी ग्रंथकार म्हणतात. या मतानें मरणांत प्रायश्चित्तविधि व काशीखंड इत्यादि ग्रंथांत ब्राह्मणांस सांगितलेले देहत्यागविधि हे अन्य युगपर होत. प्रयागमरण व स्त्रियांचें सहगमन ही कलियुगांत सर्वसंमत आहेत. सहगमनाशिवाय इतर जो विधिक्यानुज्ञात देहत्याग त्याविषयी त्रिरात्न अशौच आहे, असें पुष्कळ ग्रंथकार म्हणतात. १० दिवस असें कित्येक ग्रंथकार म्हणतात. याप्रमाणें फलेच्छेनें विहित कामनिक प्रयागमरणाविषयींही २ पक्ष जाणावे.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP