मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध २|
शवास खांदा दिल्यास

धर्मसिंधु - शवास खांदा दिल्यास

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


शवास खांदा दिल्यास- स्नेहाने सजातीय शवास खांदा दिल्यास त्याच्या घरचे अन्न भक्षण केले असता व त्याचे घरी वास केला असता १० दिवस अशौच. त्याच्या घरी वास मात्र केल्यास किंवा अन्न मात्र भक्षण केल्यास त्रिरात्र अशौच. अन्न भक्षण करणे व घरी वास करणे हे नसेल तर १ दिवस अशौच. दुसर्‍या गावातील शवास खांदा देऊन दुसर्‍या गावी वास केल्यास मौल्य घेऊन सजातील शवास खांदा दिल्यास १० दिवस अशौच. विजातीय शवास खांदा दिल्यास शवजातीचे अशौच धरावे. मौल्य घेऊन हीन जातीच्या शवास खांदा दिल्यास शव जातीचे दुप्पट अशौच धरावे. सोदकाचे शवास खांदा दिल्यास १० दिवस अशौच. शवास अलंकार केले असता पादकृच्छ्र करावे. अज्ञानाने तसे केल्यास उपोषन करावे. उपोषण करण्यास असमर्थ असल्यास स्नान करावे. अनाथ द्विजास शव धर्मार्थ वाहिल्यास व दहन केल्यास अश्वमेधादि पुण्य प्राप्त होते व केवळ स्नानाने शुद्धि होते. याविषयी अग्नि स्पर्श करून घृतप्राशनही करावे. शूद्राचे शव द्विज जरी धर्मार्थ वाहील तर त्याने १ दिवस अशौच धरावे. धर्मार्थ अनाथ शवाच्या मागे गेल्यास दोष नाही. पिता, माता, मातामह, आचार्य व उपाध्याय यावाचून इतरांचे शवास ब्रह्मचार्‍याने खांदा दिल्यास त्याचे वृत्ताचा लोप होतो. त्याने पूर्वोक्त रीतीने अशौच धरावे. नंतर त्या ब्रह्मचार्‍याने कृच्छ्र प्रायश्चित्त व पुनरुपनयन करावे. पिता इत्यादिकांचे प्रेत वाहिले तरी ब्रह्मचार्‍याने अशौची यांचे अन्न भक्षण करू नये आणि त्यास स्पर्शही करू नये. या अशौचातही नित्य कर्माचा लोप नाही.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP