मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध १|
मध्यम ब्राह्मण

धर्मसिंधु - मध्यम ब्राह्मण

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


मातामह, माउतुळ, भागिनेय, दौहित्र, जामाता, गुरु, शिष्य, यजमान, श्वशुर, ऋत्विज, शालक, आतेबंधु, मावसभाऊ, मामेभाऊ, अतिथि, सगोत्री व मित्र हे मध्यम होत. दौहित्र, जामाता, भगिनीपुत्र हे विद्यादि गुणांनी युक्त असून यांस श्राद्धास निमंत्रण न केले तर दोष आहे; गुणहीन असल्यास दोष नाही. सहा पुरुषाच्या अलीकडे सगोत्री; श्राद्धास निमंत्रण करण्यास योग्य नाहीत. परगोत्री न मिळाल्यास सहा पुरुषापलीकडचे गोत्रजही भोजनास (क्षणास) सांगावे. याविषयी विशेष ऋत्विज सपिंडसंबंधी व शिष्य यांची योजना देवस्थानी करावी, पितृस्थानी करू नये. याप्रमाणे दुसरेही गुणहीन ब्राह्मण देवस्थानी योजावे. पिता, पितामह, भ्राता अथवा पुत्र किंवा सपिंडक हे परस्पर पूज्य नाहीत; म्हणजे परस्परांस श्राद्धास सांगू नये. त्याचप्रमाणे ऋत्विजही श्राद्धांमध्ये पूज्य नाहीत. हे जर अत्यंत गुणवान असतील तर त्यांस देवस्थानी योजावे.

N/A

References : N/A
Last Updated : June 28, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP