मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध १|
सपिंडक मातामह श्राद्ध

धर्मसिंधु - सपिंडक मातामह श्राद्ध

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


आतां जीवत्पितृकदौहित्र्यानें आश्विन शुक्ल प्रतिपदेच्या दिवशीं सपिंडक मातामह श्राद्ध करावें. तसेंच भ्रात्याच्या पुत्रानें पुत्रहीन चुलत्याचे सपिंडक प्रतिसांवत्सरिक श्राद्ध करावें. त्याप्रमाणें कनिष्ठ भ्रात्यानींही पुत्ररहित ज्येष्ठ भ्रात्याचें प्रतिसांवत्सरिक श्राद्ध करावें. सवतीच्या पुत्रानें सापत्‍न मातेचें श्राद्ध करावें. दौहित्रानें पुत्ररहित मातामहाचें प्रतिसांवस्तरिक श्राद्ध करावें. याप्रमाणें पितृव्यादिक चार श्राद्धें करण्याविषयीं जीवत्पितृकांसही अधिकार आहे. पुत्ररहित पितृव्य, भ्राता इत्यादिकाची स्त्री असेल तर तीच श्राद्धास अधिकारिणी आहे. भ्रातृपुत्रादिकांस श्राद्धाधिकार नाही. याप्रमाणें पुत्र नसेल तर पतीनेंच स्त्रियेचें श्राद्ध करावें. सवतीचा पुत्र असेल तर त्यानेंच श्राद्ध करावें. पतीने करुं नये. दौहित्र व भ्रात्याचा पुत्र असतां मृत झालेला विभक्त असेल तर दौहित्रच अधिकारि. विभक्त नसल्यास भ्रात्याचा पुत्र अधिकारी. भ्राता व भ्रातृपुत्र हे दोघेही असतां भ्रात्यानेंच श्राद्ध करावें, असें कित्येक ग्रंथकार म्हणतात. जीवत्पितृकांस पिता, पितामह इत्यादि मनुष्यपतिरांचे तर्पणास निषेध असला तरी अग्निष्वात्तादिक देवऋषि पितरांचे तर्पणास निषेध नसल्यामुळें स्नानांगतर्पण व ब्रह्मयज्ञांगभूत देवऋषि पितृतर्पण याविषयीं अधिकार आहे. याप्रमाणें ज्याचें श्राद्ध करण्याचा अधिकार आहे, त्याचें श्राद्धांगतर्पण करण्याविषयींही अधिकार आहे. यम व भीष्म यांचें तर्पण जीवत्पितृकांनींही करावें. जीवत्पितृकानें श्राद्धांगतर्पणाहून इतर तर्पण तिलांनीं करुं नये व श्राद्ध प्रयोगामध्यें वामजानूखालीं करुं नये व वस्त्राचा नीवीबंधही करुं नये. नदीत्यादिकांत स्नान करुन तर्पण केल्यावर समंत्रक वस्त्र निर्बाडन करुं नये. तसेंच खडग मौक्तिक हस्तांत धारण करुन पितृतर्पण करावें. या वचनानें प्राप्त असलेलें खडग धारण करुं नये. द्विजाग्र्यांनीं पित्र्यकर्माचे वेळीं अपसव्य करावें असें सांगितलें आहे. म्हणून जीवत्पितृकानें प्रकोष्ठापर्यंत म्हणजे कोपराच्या खालच्या भागापर्यंत अपसव्य करावें. पिता संन्यासी इत्यादि स्वरुप जिवंत असतां व ज्याची माता व मातामह मृत आहेत अशा पुत्रानेंही "पितुः पितृ पितामह प्रपितामहानाम्‌ " ही तीन पार्वणें एकोद्दिष्टगण आपल्या मातेचा उच्चार ’पितुःपत्‍न्याः’ असा, आपल्या पितृव्याचा उच्चार ’पितुर्‌भ्रातुः’ असा व आपल्या मातामहाचा उच्चार ’पितुः श्वशुरस्य’ इत्यादि पितृसंबंध पुरस्कारें करुन उद्देश करुन महालय श्राद्ध करावें. याचप्रमाणें दर्शादि श्राद्धाविषय़ीं जाणावें. पिता संन्यासी नसला तरीही जीवत्पितृकानें तीर्थ श्राद्ध करणें तें असेंच करावें. नांदीश्राद्धाविषयींही असाच निर्णय जाणावा. ब्रह्मयज्ञाच्या अंतीं नित्य पितृतर्पण करावयाचें तें ज्याचा पिता संन्यासी इत्यादि स्वरुप असा जिवंत आहे त्यानेंही तें असेंच करावें असें म्हणतात.

N/A

References : N/A
Last Updated : June 28, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP