मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध १|
मासिकादि यांचा निर्णय

धर्मसिंधु - मासिकादि यांचा निर्णय

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


त्यात एकोद्दिष्ट श्राद्ध सातवा, आठवा व नववा या मुहूर्तांनी युक्त अशा मध्याह्न काली करावे. त्यातही कुतुपरोहिण संज्ञक आठवा व नववा असे जे दोन मुहूर्त तो मुख्य का होय. त्यातही पूर्वदिवशीच अथवा दुसर्‍या दिवशीच माध्याह्न व्याप्ति असेल तीच स्थिती घ्यावी. दोन दिवशी मध्याह्न व्याप्ति असेल किंवा दोन दिवशी मध्याह्नकाली स्पर्श नसेल तर पूर्व दिवशीच करावे. दोन दिवशी सारखी कदेशी व्याप्ति असेल तर पूर्वदिवशीच घ्यावी. सर्व दर्प इत्यादिकांनी व्यवस्था जाणावी असे काहि ग्रंथकार म्हणतात. वैषम्याने एक देशव्याप्ति असेल तर आधिक्याने निर्णय करावा. पार्वण श्राद्धास अपराह्ण व्यापिनी तिथी घ्यावी. पूर्व दिवशीच अथवा दुसर्‍या दिवशीच अपराह्ण व्याप्ति असेल तर तीच घ्यावी. दोन्ही दिवशी अपराह्ण व्याप्ति असेल किंवा नसेल किंवा अंशाने सारखी व्याप्ति असेल तर पूर्व दिवसाची घ्यावी. विषम व्याप्ति असेल तर अधिक व्यापिनी घ्यावी. माधवाचार्य असे म्हणतात की, दोन दिवशी पूर्ण अपराह्न व्याप्ति व अंशतः सारखी व्याप्ति असून उत्तर तिथीचा क्षय असेल तर पूर्व दिवसाची घ्यावी. उत्तर तिथीची वृद्धि असता, दुसर्‍या दिवसाची घ्यावी. उत्तर तिथीचा क्षय व वृद्धि नसतील तरीही दुसर्‍या दिवशीची घ्यावी. हा क्षयदिवसाचा निर्णय प्रतिसांवत्सरिक श्राद्ध, मासिक श्राद्ध व मृत तिथीचे दिवशी करावयाचा सकृन्महालय याविषयी जाणावा.

N/A

References : N/A
Last Updated : June 28, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP