मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ५|
घरात कबुतर आल्यास

धर्मसिंधु - घरात कबुतर आल्यास

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


कपोत अथवा पारवा घरात शिरला असता, मधमाशांचे मोहोळ किंवा वारूळ झाले असता पिंगळ्याचा शब्द, काकवैकृत ग्राम्य व अरण्यक इत्यादि मृगपक्ष्यांचा विकार असता शांति करावी. "देवाःकपोत०" या पाच ऋचांचे सूक्ताचा सहस्त्र किंवा शंभर जप केल्यावर "यत इंद्रभयामहे० स्वस्तिदाविशस्त्र्यंबक०" या मंत्रांनी होम करावा, व व्याह्रति मंत्रांनी एकशे आठ तिलहोम करावा. अथवा पाच ब्राह्मणाकडून क्रमाने "देवाःकपोत" हे सूक्त, "सुदेवो असि०" ही ऋचा, "कनिक्रंदत०" हे शाकुंतल सूक्त व "नमो ब्रह्मणे नमो अग्नये०" हा मंत्र यांच्या सहस्त्रादिसंख्येने जप करून उपनिषदांचे पठण करावे; व व्याह्रति मंत्रांनी तिलांचा होम करावा.

N/A

References : N/A
Last Updated : June 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP