मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ५|
शिवनिर्माल्यग्रहणाचा निर्णय

धर्मसिंधु - शिवनिर्माल्यग्रहणाचा निर्णय

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


शिवास अर्पण केलेला नैवेद्य, पत्र, पुष्प, फल व जल ही अग्राह्य आहेत. पण शालिग्राम-शिलेच्या संसर्गाने शिवाचे नैवेद्य पवित्र होत. शिव व सूर्य यांचा नैवेद्य भक्षण केला असता चांद्रायण प्रायश्चित्त करावे. अभ्यास असल्यास दुप्पट चांद्रायण करावे. बुद्धिपूर्वक अभ्यास असल्यास सांतपन करावे, आपत्ति नसेल तर देवतांच्या निर्माल्यग्रहणाविषयी हाच निर्णय जाणावा. ज्योतिर्लिंग, स्वयंभू लिंग व सिद्धपुरुषांनी स्थापिलेले लिंग यावाचून असलेल्या स्थावर लिंगाविषयी हा शिवनिर्माल्यग्रहणाचा निषेध जाणावा. ज्योतिर्लिंग, स्वयंभू लिंग, इत्यादिकांच्या बाबतीत पूजकाने दिलेले फल व तीर्थादिक भक्तियुक्त अंतःकरणाने शुद्ध होण्यासाठी ग्रहण करावे. लोभाने ग्रहण करू नये. पंचायतनातील चार बाणलिंगे व प्रतिमा यांचा अन्नादिक नैवेद्य स्वतः ग्रहण केला तरी दोष नाही. ज्योतिर्लिंगाव्यतिरिक्त असलेल्या स्थिर लिंगाचे तीर्थोदक व चंदन हे भक्तिमान शिवोपासकांनीच ग्रहण करावे. ज्योतिर्लिगादिकांचे ठायी पूजकाने दिलेले अन्नही भक्षण करावे. असे कित्येक म्हणतात.

N/A

References : N/A
Last Updated : June 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP