मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ४|
दिवा विझल्यास निर्णय

धर्मसिंधु - दिवा विझल्यास निर्णय

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


भोजन करीत असता दिवा विझला तर भोजनपात्र हातात घेऊन सूर्याचे स्मरण करावे व पुनः दिवा लागला म्हणजे तो पाहून पानावरील अन्न भक्षावे; दुसरे अन्न भक्षू नये. श्राद्धदिन व श्राद्धदिनाच्या पूर्वीचा दिवस, व्यतीपात, वैधृति, व संक्रांत इत्यादि दिवशी रात्री भोजन करू नये. रात्रीचा चवथा व पहिला प्रहर विद्याभ्यासात घालवावा. मधल्या दोन प्रहरपर्यंत निद्रा करणारा ब्रह्मत्वाला योग्य होतो. पूर्व, पश्चिम किंवा दक्षिण यापैकी कोणत्याहि दिशेस उसे करून निजावे; उत्तरेस उसे करून कधीही निजू नये. रात्रिसूक्ताचा जप केल्यावर सुखशायीचे स्मरण करावे व विष्णूला नमस्कार करून निद्रा करावी. "अगस्ति, माधव, मुचुकुंद, महामुनि कपिल, अस्तिक हे पाच मुनि सुखशायी होत." निजतेवेळी यांचे स्मरण केल्यास निद्रा सुखकारक होते.

N/A

References : N/A
Last Updated : June 25, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP