मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ४|
कात्यायनांना उपयुक्त निर्णय

धर्मसिंधु - कात्यायनांना उपयुक्त निर्णय

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


गूळ व गोरस यावाचून इतर पदार्थ दुसर्‍याच्या अग्नीवर पक्व झालेले भक्षण करू नयेत. हा आहिताग्नि (अग्निहोत्री) यांचा धर्म याज्ञिकांना संमत आहे. उस व दूध यापासून केलेले पदार्थ व खापरामध्ये भाजलेले यव हे प्रवासामध्ये असताना अग्निहोत्र्याने दुसर्‍याच्या अग्नीवर पक्व झालेले अतएव अभक्षणीय असे समजू नये. जे अन्न उदकावाचून लौकिकाग्नीवर पक्व झालेले असेल ते फळांप्रमाणे ग्राह्य समजावे, त्या अन्नाला दोष नाही. प्रातर्होम समाप्त करून त्या होमाग्नीमधून काही अग्नि घेऊन तो स्वयंपाकघरामध्ये नेऊन त्यावर पाक करावा. नंतर तो अग्नि पुन्हा होमाग्नीमध्ये नेऊन त्यावर होम करावा असे सांगितले आहे. याकरिता आलस्यरहित होऊन वैश्वदेव इत्यादि कर्म करावे.

N/A

References : N/A
Last Updated : May 29, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP