मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ४|
सर्वसाधारण भोजनविधि.

धर्मसिंधु - सर्वसाधारण भोजनविधि.

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


आतां सर्वांना साधारणपणें भोजनादिकांचा विधि सांगतों. सोन्याचे अगर रुप्याचे पात्रांत अथवा आंबा इत्यादिक वृक्षाच्या पानांवर भोजन करणें तें प्रशस्त होय. कांस्यपात्रांत भोजन करणें असेल तर ज्या कांस्यपात्रांत आपण भोजन करतों त्यांतच इतरांनीं करुं नये. दुसर्‍यानें भोजन केलेल्या कांस्यपात्रांत ते उच्छिष्ट झाल्यामुळें भोजन करुं नये. ’संन्यासी, ब्रह्मचारी व विधवा यांनीं तांबूल, तैलाभ्यंग व कांस्यपात्रांत भोजन हीं वर्ज्य करावीं.’ संन्यासी इत्यादिकांनीं पळसाच्या पानांवर भोजन करणें प्रशस्त होय. गृहस्थाश्रमीयांनीं पळसाचे पानांवर भोजन करुं नये, केलें असतां चांद्रायण करावें. चांद्रायण वल्लीरुप जो पळसाचा वृक्ष तद्विषयक होय असें स्मृत्यर्थसारांत सांगितलें आहे. कदली, कुडा, मोहाचा वृक्ष, जांभूल, फणस, आंबा, चांफा व उंबर यांचीं पानें भोजनाला प्रशस्त होत. रुई, पिंपळ, वड इत्यादिकांचीं पानें निषिद्ध आहेत.

N/A

References : N/A
Last Updated : June 25, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP