मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|अवतार वाणी|

अवतारवाणी - भजन संग्रह १९

संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.


एक तूं ही निरंकार (१८१)

गवताचे घर उत्तम जेथे गुरुचा सेवक वास करी ।

उत्तम वाणी त्या शिष्याची जो गुरु महिमा गान करी ।

सुंदर धरती नगरी सुंदर गुरुभक्त जेथे वास करी ।

सकल काज शिष्याचे पावन जो कांही व्यवहार करी ।

मनमार्गी महालात राहूनी माये संगे प्रीत करी ।

जो नर हरिचे नाम न घेई धरतीला अपवित्र करी ।

दौलत असूनी शांती ना मनी रडुन जीवन व्यतीत करी ।

मनमार्गीचे सर्वच खोटे मिथ्यासंगे प्रीत करी ।

मनमार्गीचे सर्वच मिथ्या गुरुशिष्याचे पवित्र काम ।

'अवतार' म्हणे धर्माहुनी सर्व उत्तम एक हरिचे नाम ।

*

एक तूं ही निरंकार (१८२)

सर्व सुखांचा असो भोगता किंवा असो कुनी धनवान ।

असेल तो जगताचा राजा नित्य करी लाखोंचे दान ।

दीन दुबळ्यांना दान करोनी अजोड त्याची शान असो ।

दीन दुःखी रोग्यांवर सुद्धा परउपकार करीत असो ।

दानधर्म हे समजूनी पूण्य दया दीनावर करीत असो ।

सर्व याचका तृप्त करोनी महादानी म्हणवीत असो ।

शोभा येथील राहे येथे येई न ती कामी अंती ।

म्हणे 'अवतार' हरिवाचोनी काही न जाई संगती ।

*

एक तूं ही निरंकार (१८३)

मायेचे रूप रंग पाहूनी भुलून जे प्राणी जाती ।

तूटल्या तार्‍यासम गगनीच्या मातीला मिळुनी जाती ।

परिवार स्त्री पुत्रासाठी नित्य अशी पापे करीसी ।

रात्रंदिवशी कपट करूनी उदर जयांचे तू भरीसी ।

लाख करोडो माया जोडी शांती न येई परी मनी ।

सर्वही सांठा राहील येथे कामी ना येणार कुणी ।

माय राहील सारी येथे नाम सवे जाईल अंती ।

त्यागुन हे संतच देती सोडवील जे तुज अंती ।

त्यागुन सारे खोटे धंदे कर प्राण्या स्वरुपाची जाण ।

कोठून आला कुठे जायचे 'अवतार' गुरु करवी हे जाण ।

*

एक तूं ही निरंकार (१८४)

बेमुख जो गुरुपासुन झाला ठाव नसे त्याला जगती ।

बेमुख जो गुरुपासुन झाला मान कुणी ना त्या देती ।

बेमुख जो गुरुपासुन झाला मरण जन्म त्या त्रस्त करी ।

बेमुख जो गुरुपासुन झाला जीवन दुःखे व्यतीत करी ।

बेमुख जो गुरुपासुन झाला करील माय त्यावर मात ।

बेमुख जो गुरुपासुन झाल सैतान सम राहे जगात ।

बेमुख होणे गुरुपासोनी याहून मोठे नाही पाप ।

सदुगुरुचे होऊन राहतां नसे दुःख आणी संताप ।

लख चौर्‍यांऐशीं फिरुनी मनमार्गीला नाही माफ ।

विना शरण 'अवतार' गुरुला कर्मलेखा ना होती साफ ।

*

एक तूं ही निरंकार (१८५)

गुरु शिष्याच्या दृष्टीमाजी सोने माती एक समान ।

गुरु शिष्याला एक सारखे निर्धन असो कुणी धनवान ।

गुरु शिष्याच्या दृष्टीमाजी हर्ष शोक हे एक समान ।

गुरु शिष्याच्या दृष्टीमाजी सुख दुःखाचे नाही ध्यान ।

गुरु शिष्याच्या दृष्टीमाजी सारे मानव एक समान ।

गुरु शिष्याच्या दृष्टीमाजी राव रंक हे एक समान ।

शिष्य गुरुचा गुरुचरणांचे क्षणाक्षणाला करितो ध्यान ।

शिष्य गुरुचा म्हणे सदैव आहे सर्व तुझे भगवान ।

करी दर्शन ऐशा शिष्याचे त्याचे होईल रे कल्याण ।

म्हणे 'अवतार' अशा शिष्यांवर ओवाळीन मी माझे प्राण ।

*

एक तूं ही निरंकार (१८६)

करणी आणि कथन जयाचे भिन्न भिन्न दिसूनी येते ।

मनात वैर विरोध ठेवुनी सोंग करितो प्रेमाचे ।

सकलांची हा जाणी अंतरे सकल जाणीतो अवगुण ।

त्याला तू लपवीसी कैसे दोष तुझे मानव प्राण्या ।

स्वतः करी ना कारज कांही दुजास सांगे करावया ।

आपण स्वतः तरू शके ना यमराजा सोडी न तया ।

बसला हृदयी असे जयाच्या अंतर्यामी हा निरंकार ।

त्याच्या निर्मळ उपदेशाने तरून जाऊ शके संसार ।

मस्तकी अपुल्या संतजनांची चरण धुळीला जो लावी ।

'अवतारी' म्हणे तोची नर जगती सकल पदार्थानी मिळवी ।

*

एक तूं ही निरंकार (१८७)

ज्या देवाने दिधली तुजला यौवन आणि सुंदरता ।

नकोस विसरू क्षणभर त्याला व्यापुनी जो आहे जगता ।

सदगुरु तोची राम दाखवी लेख न मगे कर्माचा ।

यालाच तुम्ही माना भगवंत येऊ नको मनी शंका ।

सर्व जीवाहुन श्रेष्ठ नरा तू आहे श्रेष्ठ तुझा वाली ।

तरिही जीवन तुझे मानवा याच्या नामावीण खाली ।

रोग अहंमचा तुला लागला दुजा कोणता दोष नसे ।

बघेनास तू स्वतःच याला तुजपासुनी हा दुर नसे ।

त्यागुनी सारे झगडे जर तू शरण सदगुरुला येशी ।

म्हणे 'अवतार' क्षणात एक जीवन मुक्ती मिळवीशी ।

*

एक तूं ही निरंकार (१८८)

खोटी कमाई जे का करती ऐशा नरा असो धिक्कार ।

खोते ज्याच्या मनी सांचले पावन ते कैसे होणार ।

धृग धृग आहे जीवन त्याचे प्रभु कृपा ना प्राप्त करी ।

सुकून जाईन सारी शेती वर्षा जर होई न वरी ।

धृग धृग ऐसे धन कॄपणाचे कामी कुणाच्या येत नसे ।

धृग धृग ऐसे सुंदर तन ते श्रीहरिला जे प्रिय नसे ।

धृग धृग ऐशा मानव प्राण्या मैल मनाचा घालवीना ।

भाग्यहीन तोची नर जाणा शरण येई ना संतजना ।

आस जयाला प्रभु मीलनाची थोर तयाचे भाग्य असे ।

'अवतार' जयाला गुरु मिळाला कृपा पात्र तो प्राणी असे ।

*

एक तूं ही निरंकार (१८९)

निराकार या प्रभुला जाणा जो जगती व्यापक आहे ।

याची सारी सृष्टी आहे हा सृष्टी स्थापक आहे ।

शस्त्र न याला कांपू शकले हवा न याला सुकवू शके ।

पाण्याचा परिणाम न यावर अग्नी न याला जाळू शके ।

अंश तू याचा अरे मानवा याच स्वरूपाची ज्योती ।

कौडी समान जीवन झाले असता तू अस्सल मोती ।

हेच तुझे असली घर आहे हेच असे तव रूप महान ।

परि गुरुवीण अशक्य होणे निजसामर्थ्ये याचे ज्ञान ।

ठेवून श्रद्धा यावर अपुली ध्यान तू याचे नित्य करी ।

'अवतार' जाणुनी सदगुरुकरवी नंतर तूंही तूंही करी ।

*

एक तूं ही निरंकार (१९०)

अंतसमयी जव हा प्राणी सोडून जाईल जगताला ।

यमराजा येऊनी तोडीला सर्व गोत्र संबंधाला ।

धन यौवन अन् रूप हे सूंदर संगे नसे जाणे यानी ।

हरी नामावीण दौलत सारी कामी ना येणार कुणी ।

बुद्धीबळ ना येईल कामी चालू शके ना चतुराई ।

वाळुवर ही असे इमारत खोटी आंस तिचे ठायी ।

मानियले जे धन तू अपुले असे सर्व ते परक्याचे ।

अखेर समयी येई न कामी ओझे कर्मा धर्माचे ।

रंगून जाई जो हरिनामी तरून जाईल तो संसार ।

हसत मुखाने जाईल तोची ऐका संत म्हणे 'अवतार' ।

N/A

References : N/A
Last Updated : July 22, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP