मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १|
विषघटिकाशान्ति

धर्मसिंधु - विषघटिकाशान्ति

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


तिथि, वार व नक्षत्रें यांच्या विषघटिका जरी कौस्तुभांत सांगितल्या आहेत, तरी ज्योतिषग्रंथांत नक्षत्रांच्याच विषघटिकांचा विशेष दोष सांगितलेला आहे; म्हणून नक्षत्रांच्या विषघटिकांत जर जन्म झाला, तरच सांगितलेली शान्ति करावी. तिथ्यादिकांच्या ज्या विषघटिका सांगितल्या आहेत, त्यांचा दोष फार थोडा आहे; यास्तव त्यांवर जन्म झाल्यास रुद्राभिषेकादि करावींत. विषघटिकांचें लक्षण कौस्तुभ वगैरे ग्रंथांत पाहावें. ’विषघटिकांत जन्म पावलेलें बालक-पित्याच्या धनाचा व स्वतःचा-विष, शस्त्र, अस्त्र इत्यादिकांनीं नाश करणारें होतें. तद्वतच क्रूर ग्रहानें युक्त असणार्‍या लग्नावर व लग्नांशांत जन्मलेलें मूलहि हेंच फळ देतें असें जाणावें’ असें वचन आहे. या बाबतींत

’एतद्विषनाडीषु शिशुजननसूचितारिष्ट०’

वगैरे संकल्प करुन, एका कलशावर चार प्रतिमांत--रुद्र, यम अग्नि व मृत्यु--या देवतांचें ’कद्रुद्राय० यमायसोम० अग्निर्मूर्धा० व परंमृत्यो०’ या मंत्रांनीं पूजन करावें. ग्रहांचें अन्वाधान केल्यानन्तर ’रुद्रयमाग्निमृत्यून्समिच्चरुघृततिलाहुतिभिः प्रतिदैवतं प्रतिद्रव्यमष्टोत्तरशतसंख्याभिः

शेषेणत्यादि’

असें अन्वाधान करावें आणि घरांत शिजविलेल्या भाताचा होम करावा.

N/A

References : N/A
Last Updated : May 17, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP