मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|द्वितीय परिच्छेद|
उपांगललिताव्रत

धर्मसिंधु - उपांगललिताव्रत

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


आश्विन शुक्ल पंचमीला उपांगललितादेवीचे व्रत करावे. या व्रताकरिता अपराह्णव्यापिनी पंचमी घ्यावी. कारण, उपांगललितेच्या पूजेला अपराह्णकाळच सांगितला आहे. दोन दिवस संपूर्णत्वाने अपराह्णव्याप्ति असेल अथवा सारखी किंवा कमीजास्ती अपराह्णकाली एकदेशव्याप्ति असेल, तर युग्मवाक्याला अनुसरून पूर्वदिवसाची घ्यावी. दुसर्‍या दिवशीच जर अपराह्णव्याप्ति असेल, तर दुसर्‍या दिवसाची घ्यावी. कोणी रात्रव्यापिनी घेतात व पूजादिक रात्रीच करतात. त्याबद्दल मूलनिर्णय पाहिला पाहिजे. या पूजेचा विधि वगैरे सर्व इतर ग्रंथांत प्रसिद्ध असल्याने येथे सांगितला नाही.

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP