मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|द्वितीय परिच्छेद|
पूर्वोक्त निर्णय

धर्मसिंधु - पूर्वोक्त निर्णय

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


श्रवण नक्षत्राने युक्त असलेली श्रावणी पौर्णिमा, फक्त पौर्णिमा, हस्तनक्षत्राने युक्त असलेली पंचमी अथवा केवळ पंचमी-यापैकी कोणचाही जरी काळ असला तरी तो (उपाकर्माला) चालतो; म्हणून केवळ श्रवण नक्षत्र अथवा केवळ हस्तनक्षत्र-यांचा काळ त्यांनी उपाकर्माला घेऊ नये. श्रावणात जर काही अडचण (विघ्नदोष) असेल, तर भाद्रपदी पुनव अथवा पंचमी या काळावर ते (उपाकर्म) करावे. तिथीला खंड असेल, अथवा ती जर बारा घटकांहून अधिक असेल तर दुसर्‍या दिवसाची घ्यावी व बारा घटकांहून कमी असल्यास आदल्या दिवसाची घ्यावी, वगैरे निर्णय पूर्वी सांगितल्याप्रमाणे जाणावा.

N/A

References : N/A
Last Updated : April 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP