अन्नवहस्त्रोतस् - भस्मक

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


हेतू संप्राप्ति
नरे क्षीणकफे पित्तं कुपितं मारुतानुगम् ।
स्वोष्मणा पावकस्थाने बलमग्ने: प्रयच्छति ॥
तदा लब्धबलो देहे विरुक्षे सानिलोऽनल: ।
परिभूय पचत्यन्नं तैक्ष्ण्यादाशु मुहुर्मुहु: ॥
पक्वत्वाऽन्नं सततो धातूञ्छोणितादीन् पचत्यपि ।
ततो दौर्बल्यमातड्कान्मृत्युं चोपनयेन्नरम् ॥
भुक्तेऽन्ने लभते शान्तिं जीर्णमात्रे प्रताम्यति ।
तृट्‍श्वासदाहमूर्च्छाद्या व्याधयोऽत्याग्निसंभवा: ॥
च.चि. १५.२१८ ते २२० पान १२१२-२३

कट्‍वादिरुक्षान्नभुजां नराणां क्षीणे कफ मारुतपित्तवृद्धौ ।
अतिप्रवृद्ध: पवनान्वितोऽग्नि: क्षणाद्रसं शोषयति प्रसह्य ॥
भुक्तं क्षणाद्‍भस्म करोति यस्मात्तस्मादयं भस्मकसंज्ञकोऽभूत् ।
तृड्‍दाहमूर्च्छाभ्रमकासशोफविट्‍शोषमोहश्रमकर्मकारी ॥
तृड्‍दाहश्वासकासादीन्कृत्वैवात्याग्निसम्भवात् ।
पक्त्वाऽन्नमाशु धात्वादीन्स क्षिप्रं नाशयेद्‍ ध्रुवम् ॥
यो.र. पान २६७

आहारं पचति शिखी दोषानाहारवर्जित: पचति ।
दोषक्षये च धातून्धातुक्षैण्ये तथा प्राणान् ॥
यो.र. पान २६८

अत्यंत तिखट व रुक्ष अशा आहारामुळें कफ क्षीण होतो आणि वातपित्ताचा प्रकोप होतो. वातानें अनुगत झालेलें पित्त प्रकोप पावतें आणि पित्ताचें अग्निकर्म प्रकर्षानें वाढतें. शरीरांतील रस शुष्क होतो. अत्यंत खा खा सुटते कितीहि व कोणत्याहि प्रकारचें अन्न खाल्लें तरी समाधान होत नाहीं, अन्नाचें भस्म होतें तें अंगीं लागत नाहीं. तृष्णा, दाह, मूर्च्छा, भ्रम, कास, शोथ, मलाचे खडे बनणें, मोह श्रम हीं लक्षणें उत्पन्न होतात. या अत्यग्नीमुळें क्रमानें अन्नाचें मग दोषांचें नंतर धातूंचें पचन होतें. शेवटीं प्राणाचाहि घास घेतला जातो. क्वचित् असा आढळणारा पण अत्यंत घातक असा हा व्याधी आहे.

चिकित्सा
तमत्यग्निं गुरुस्निग्धमन्दसान्द्रहिमस्थिरै: ।
अन्नपानैर्नयेच्छान्तिं दीप्तमग्निमिवाम्बुभि: ॥
तमत्यग्निं-भस्मकाख्यं, गुरुस्निग्धादिभिरन्नपानै: शान्तिं
नयेत् । कमिव ? दीप्तं-द्द्धमग्निं बाह्यं, यथा जलै: ।
मुहुर्मुहुरजीर्णेऽपि भोज्यान्यस्योपहारयेत् ।
निरिन्धनोऽन्तरं लब्ध्वा यथैनं न विपादयेत् ॥
मुहुर्मुहु:- क्षणेक्षणे, अजीर्णेऽपि भोज्यानि कृशरादीनि, उप-
हारयेत्-आहारार्थ प्रकल्पयेत् । अजीर्णेऽपीत्यपिशब्दात् किमुत
जीर्णे भोज्यानुपहारयेदिति । क्रिमित्येवं क्रियते ? इत्याह-
यस्मात्तस्मात्तथा तेन प्रकारणाजीर्णेऽपि पुन: पुनहारारोप-
योगेन निरिन्धनोऽग्निरन्तरं - अवकाशं, लब्ध्वा यथा एनं
न विपादयेत् ।
सटिक वा. चि. १०-८३, ८४ पान ६७१

या अत्यग्नीसाठीं गुरु, स्निग्ध, मंद, सांद्र, स्थिर, शीत अशा गुणांचीं द्रव्यें वापरावीं. थोडेसें अजीर्ण झालें तरी पुन्हां पुन्हां आहार देत रहावें.

कल्प
प्रवाळ मौतिक गैरिक शंखजीरक बदाम, पिस्ते, चारोळी, अति शीत जलपान, खवा पेढे, वाराह मांस.

N/A

References : N/A
Last Updated : July 23, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP