स्फुट अभंग - ३२

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


३२
काय सांगो मी या मारूतीचें बाळ । गिळिलें मंडळ मार्तंडाचें ॥१॥
मार्तंड गिळिला येणें बाळपणीं । देवादिकां रणीं पिटियेलें ॥२॥
पिटीले राक्षस विंध्वंसिलें बन । लंकेचे दहन क्षणमात्रें ॥३॥
क्षणमात्रें आला जानकी शोधुनी । सिंधु वोलांडुनी अवळीला ॥४॥
अवलीळा जेणे द्रोणाद्री आणीला । राक्ष वधिला काळनेमी ॥५॥
काळनेमी आणी मारिली विवसी । उद्धार तयेसी दिवदान ॥६॥
जीवदान दिल्हें तया लक्षुमणा । आणी कपीगणा सकळीकां ॥७॥
सकळीकां कपीकुळांचें मंडण । वांचविले प्राण बहुतांचे ॥८॥
बहुतां मधुनी तया राघवासी । नेलें पाताळासी निशाचरीं ॥९॥
निशाचरीं रम पाताळासी नेला । मागे धाविन्नला हनुमत ॥१०॥
हनुमंते उडी घातली संकटीं । सोडिलें सेवटी स्वामीयांसी ॥११॥
स्वामीयासी सोडी धन्य तो सेवक । अलोलीक मारूतीची ॥१२॥
मारूतीनें तये जानकीकारणें । नगरची नेणें उचलूनि ॥१३॥
उचलूनी माथां तये जानकीसी । वाटे कुंभकासीं वधावया ॥१४॥
वधूनिया कुंभकर्णाचा नंदनु । पुन्हा बिभीषणू राज्यीं बैसे ॥१५॥
बैसला मारूती तये सिंधुतीरीं । हुंडारीलें दुरी गुरूडासी ॥१६॥
गरूडाची हांव सर्वही यादव । फेडियेला गर्व येकसरा ॥१७॥
येकसरा नामें रूपें पालटीला । मग रक्षियेला कृष्णनाथ ॥१८॥
कृष्णनाथ रूपें जाहला ब्राह्मण । वांचविले प्राण अर्जुनाचे ॥१९॥
अर्जुनाचें सैन्य रोमावळीअंत । महानदीप्रांत उतरिलें ॥२०॥
उतरीलें येणें आर्जुनादिकांतें । गेलें दुंदुभीतें वधावया ॥२१॥
वधावया गेले तेणे हुंडारीलें । सागरीं राखिले मरूतीनें ॥२२॥
मारूतीचें बळ वर्णितां सबळ । वाचा हे विबळ होत आहे ॥२३॥
होत आहे साना होत आहे थोर । कोण जाणे पार स्वरूपाचा ॥२४॥
रूप वज्रदेही पुछ्य वज्र ते हिं । रामदासीं नाहीं जन्म मृत्यु ॥२५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP