मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|विवाहाचे आठ प्रकार| गांधर्वविवाह प्रचारातून गेला असावा विवाहाचे आठ प्रकार विवाहाचे आठ प्रकार ब्राह्मणविवाह दैवविवाह आर्ष विवाह प्राजापत्य विवाह आसुरविवाह गांधर्वविवाह राक्षसविवाह पैशाचविवाह पुत्रिकाविधिविवाह पृथग्विवाह आणि मिश्रविवाह आपत्प्रसंगी विवाहांची वर्णश: व्यवस्था असवर्ण विवाह शूद्रवर्णाच्या स्त्रीस वरण्यचा त्रैवर्णिकांस आग्रहपूर्वक निषेध प्राचीन उदाहरणे स्त्री - संबंध व्यभिचारवृद्धी ही स्थिती व्यवहाराशी जुळतीच आहे गांधर्वविवाह प्रचारातून गेला असावा मनुकालापूर्वी स्वयंवरपद्धती बंद होती ब्राह्मादी चार विवाहांचा संकोच आसुर व राक्षस विवाहांचे भेदस्वरूप समाजाची उत्क्रान्ती; राजसत्ता व कुटुंबस्वामी कुटुंबस्वामीची भयंकर सत्ता, गुलामगिरी, विक्रय कन्याविक्रय व आसुरविवाह राक्षसविवाहाबद्दलचा विचार राक्षसविवाहाची खोटी बतावणी गांधर्वविवाह प्रचारातून गेला असावा प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता. Tags : astrologyjyotishमराठीवधूवर गांधर्वविवाह प्रचारातून गेला असावा Translation - भाषांतर येथपर्यंत पैशाच विवाहाचा विचार झाला. आता गांधर्वविवाहाबद्दल थोडासा विचार करू. पैशाचविवाहाप्रमाणे हा विवाह निंद्य मानिला नव्हता, तथापि प्रत्यक्ष मनुस्मृतिकाळीदेखील समाजात त्याचा प्रसार कितपत असेल याविषयी बराच संशय आहे. याचे कारण स्त्रीजातीला केव्हाच स्वातंत्र्य असावयाचे नाही या तत्त्वाचा प्रसार समाजात झाला होता हे होय. महाभारत वगैरे प्राचीन ग्रंथांतून कोठे कोठे शकुंतलाविवाहासारखी आख्याने दृष्टीस पडतात, परंतु त्यांवरून सामान्यत: लोकसमुदायात हा विवाह होत असलाच पाहिजे असे अनुमान करिता येत नाही. अभिज्ञानशाकुंतल नाटकात -गांधर्वेण विवाहेन बह्वयो राजर्षिकन्यका: ।श्रूयंते परिणीतास्ता: पितृभिश्चाभिनंदिता: ॥हा श्लोक आला आहे, त्यात “ राजर्षीच्या कन्या ” असा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. विक्रमोर्वशीय, रत्नावली, इत्यादी नाट्यग्रंथांतही या विवाहाची वर्णने आली असून नायक व नायिका क्षत्रियवर्णाची असल्याचे सांगितले आहे. अर्थात या सर्व गोष्टींवरून क्षत्रियवर्गात, कदाचित विशेषत: राजेलोकांत, ही गांधर्वविवाहाची चाल होती असे मानण्यास प्रत्यवाय नाही. इतर वर्णांसंबंधाने या प्रकारच्या विवाहाची वर्णने असल्याचे कोठे पाहण्यात नाही. नाही म्हणावयास भवभूतिकृत मालतीमाधव नाटकातील नायक व नायिका ही दोघेही ब्राह्मण वर्णाची असून त्यांचा विवाह कवीने याच पद्धतीचा घडवून आणिला आहे, व यावरून ब्राह्मणांतदेखील चाल होती असा कोणाचा तर्क होईल, परंतु तो बरोबर आहे असे मानिता येणार नाही. या नाटकात --शाकुंतलादीनितिहासवादान्प्रस्तावितानन्यपरैर्वचोभि: ।( मालतीमाधव अंक २ )इत्यादी श्लोक आला आहे, व त्यात मालतीचे मन वलविण्याच्या कामी शकुंतलाप्रभृती स्त्रियांच्या उदाहरणांचा उपयोग करण्यात आल्याचे वर्णिले आहे ही गोष्ट खरी; तथापि मालतीसारख्या प्रौढ वयाच्या ब्राह्मण वधूस गांधर्वविवाहाच्या जुन्या कथा मुद्दाम सांगण्याचा प्रसंग आला, एवढ्यावरून्च या विवाहाची प्रवृती निदान ब्राह्मण समुदायात तरी नव्हतीच असे उघड म्हणता येते.ब्राह्मणांप्रमाणेच वैश्यवर्णाची उदाहरणेही प्राय: दुर्मिलच आहेत. मागे दशकुमारचरित ग्रंथात वर्णिलेली एक कथा सामुद्रिक विषयासंबंधाने आली आहे. तीतील नायक व नायिका ही दोन्हीही वैश्य आहेत. त्यांच्या उदाहरणावरून या वर्णात हा विवाह होण्याची बंदी नव्हती असे अनुमान वाटेल तर काढावे. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP