प्रसंग सोळावा - प्रसंग समाप्ति

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


कोठें गेला असेल संस्‍कार । या वेगळा भेदाचाहि विचार । तें शुद्ध करूनियां घ्‍यावें अक्षर । आपला म्‍हणउनी ॥९७॥
हा ग्रंथ करून सद्‌गुरूनें । शेख महंमद वाढविला भूषणें । ऐसें आदिपुरुषाचें महिमानें । न कळेचि ईश्र्वरा ॥९८॥
प्रसंग सोळावा जाला पूर्णत्‍वें । सत्रावा आरंभिला ग्रासून जिवशिव नावें । शिवत्‍वहि ग्रासिलें सद्‌भावें । सोऽहं तत्त्वबोधासंगें ॥९९॥
वैराग्‍य बोधाचीहि जाली शांति । निज शोधा सद्‌गुरूची संगती । वैकुंठ मुक्तीची ही विपत्ती । दृश्य अदृश्य नाहीं ॥१००॥
जैसें हुताशनाचे ज्‍वाळ । वोणवा लागलया दिसती प्रबळ । येर्‍हवीं तें असती अचळ । गारे काष्‍टापोटीं ॥१०१॥
दंभें वाची गतल्‍याची कथनीं । शूरत्‍व आचरोनि दाखवित ना कोणी । विरक्त आत्‍मज्ञानी ये मेदिनीं । थोडे असती ॥१०२॥
सद्‌गुरूची पाउलें धरूनी शिरीं । संग्रामास पातलों अंतरीं । तें ऐकावें शूर नरीं । शेख महंमद वदती ॥१०३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP