उपदेश - अभंग ६ ते १०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


६.
भृंगीचिया अंगीं कोणतें हो बळ । शरिरें अनाढळ केली आळी ॥१॥
काय तिनें तपमुद्रा धरियेली । म्हणोनियां झाली भृंगीं अंगें ॥२॥
अरे बा शहाणिया तैसा करीं जप । संतयोगें पाप नाहीं होय ॥३॥
नामयाची जनी पिटिती डांगोरा । संदेह न धरा करा पूजा ॥४॥
७.
जहज तारिलें तारिलें । शेवटीं उगमासी आलें ॥१॥
भाव शिडासी लाविला । नाम फरारा सोडिला ॥२॥
कथा भरियेलें कोणें । घ्यारे नका दैन्यवाणें ॥३॥
एका मनाचा विसार । आधीं देउनी निर्धार ॥४॥
कोण देतो फुकासाठीं । आर्तभूत व्हावें पोटीं ॥५॥
आर्तभूत व्हारे । जनी म्हणे केणें घ्यारे ॥६॥
८.
हेंचि देवांचें भजन । सदा राहे समाधान ॥१॥
येर अवघे संसारिक । इंद्र देव ब्रम्हादिक ॥२॥
वरकडाचा पाड किती । जनी देवास बोलती ॥३॥
९.
चोरा संगतीनें गेला । वाटे जातां नागवला ॥१॥
तैसी सांडोनियां भक्ती । धरी विषयाची संगती ॥२॥
अग्निसवें खेळे । न जळे तो परी पोळे ॥३॥
विश्वासला चोरा । जनी म्हणे घाला बरा ॥४॥
१०.
जगीं विठ्ठल रुक्मिणी । तुम्ही अखंड स्मरा ध्यानी ॥१॥
मग तुज काय उणें । झालें सोयरे त्रिभुवनें ॥२॥
साराचें जें सार । भवसिंधु उतरी पार ॥३॥
मन ठेउनी चरणीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP