रूपक - पांगुळ

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


जंबुया द्वीपामाजी एक पंढरपुरगांच । धर्माचें नगर द्खा विठो पाटील त्वाचें नांव । चला जाऊं तया ठाया कांहीं भोजन मागाया ॥१॥
विठोबाचा धर्म जागो । त्याचे चरणीं लक्ष लागो । ज्याशी नाहीं पंख पाय तेणें करावें तें काय ।
शुद्ध भाव धरोनियां पंढरीसी जाय इच्छिलें फळ देतो यासी नवलाव तें काय ॥२॥
सुदामा ब्राम्हण दु:खें दारिद्रें पीडिला । मुष्टिभर पोहे घेऊनि त्याचे भेटीलागीं गेला । शुद्ध भाव देखोनियां गांव सोनियाचा दिला ॥३॥
गण आणि गोत्नज सर्व हांसताती मज । गेलें याचें मनुष्यपण येणें सांडियेली लाज । विनवी तो शिंपी नामा संत चरणींचा रज ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 15, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP