निरंजन माधव - मंत्ररामचरित

निरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे.


श्रीज्याची ललना, भुजंग शयना, पुत्रत्व पद्मासना,

पक्षी तो वहना, समुद्र सदना, वाणी रती या सुना ।

कंठीं कौस्तुभ भूषणा सुखघना प्राधान्य पंचानना

सारें विश्वकुटुंब राज्य गणना त्रैलोक्य नारायणा ॥१॥

राजे थोर धरातळीं अतिबळी ते रावणें जिंतिले

स्वर्गीचे सुर गेहकार्यकरणीं जेणें सदा योजिले ।

पाताळीं उरगांगना हरुनिया चूडामणी घेतले

द्वारीं नित्य उभे नवग्रह, असे बंदीं किती घातले ॥२॥

मंत्राचें बळ राहिलें, ऋषिवरी यज्ञक्रिया टाकिल्या,

रोडेले अमरेंद्र भाग हरितां आंगीं शिरा वाहिल्या ।

धाकें कांपतसे सदा वसुसती भीवोनि त्या रावणा

लोकीं अन्य सदा समर्थ न दिसे त्रैलोक्यसंरक्षणा ॥३॥

जेणें शंकर अर्चिला निजकरें वाहोनि दाहा शिरें

तेणें तुष्ट पिनाकपाणि वर दे वोपी तया सादरें ।

' स्वर्गीचे सुरयक्षकिन्नर महादैत्येंद्र राजे बळी

ते होतील हतप्रभाव समुदे तूझ्या प्रतापानळीं ' ॥४॥

क्षा जिंतुनि यानपुष्पकनिधी घेवोनि गेला घरा

आला ऐकुनि दिकपती दशदिशा त्या टाकिती सत्वरा ।

स्वर्गीचे मणि पारिजात समुदे लंकांगणीं आणिले

धेनू कामदुधा हयोत्तम करी द्वारीं बळें बांधिले ॥५॥

रागें रावण निंदिती सुरपती जावोनि विष्णुप्रती

झालें वृत्त समस्तही विनविती बोले तया श्रीपती ।

होतों दाशरथी, तुह्मी वसुमती घ्या वानराच्या बुथी

आहे दुष्ट किती वधोनि कुमती सतोषऊं ते क्षिती ॥६॥

मंत्री मेळविले अजात्मज करी संभार यज्ञीं बरा

तेव्हां राघव जन्मला, नृपतिला आनंद झाला पुरा ।

नेला अध्वररक्षणा मुनिवरें मार्गी वधी ताटिका

केली मुक्त पदीं चतुर्मुखसुना नामें अहल्या निका ॥७॥

नकनृपतिगेर्ही भंगिलें चाप रामें

परिणिलि मग सीतादेवता सार्वभौमें ।

पथिं भृगुतनयाचा मान सिद्धीस गेला

रघुपति युवराज्यीं स्थापनीं नेम केला ॥८॥

थातथ्य वाणी पित्याची कराया

सवें घेतली जानकी भव्यकाया ।

त्वरें चालिला दंडकारण्यपंथें

जनस्थान गोदावरी तीर्थ जेथें ॥९॥

गन्नायकाची हरी धर्मदारा ।

दशग्रीव कापट्यवेषें उदारा ।

वधी राम वालीस सुग्रीवसंगें

तरे वारिधी जाय लंकेसि वेगें ॥१०॥

येथ राघव पातला परिघ हा शाखामृगीं घातला

बांधाया गज मातला बिसगुणें इच्छा धरी मातला ।

हा तों मानुष पूतळा निजकरीं नाराच हा धूतला

वक्षीं तीखट रुतला कपिदळीं पाडीन त्या भूतळा ॥११॥

रामासीं झगडावयासि निधडा लंकेश आला पुढां

रामें बाणसडा करानि करडा त्या नाचवीलें धडा ।

सैन्याचा रगडा सवृक्ष दगडा तो हाणितो माकडा

वाहे रक्त भडाड रावणदळीं केला शिरांचा हुडा ॥१२॥

मारी रावणकुंभकर्ण समरीं त्या मेघनादासवें

सीता सोडविली बिभीषण पदीं संस्थापिला वैभवें ।

आला तो शरयूतटासि भरता भेटे पुन्हां भूपते

शोभे राज्यपदीं सुबांधवजनीं पूर्णेदु सीतापती ॥१३॥

ऐशी हे रघुनाथकीर्तकथाशृंगारहारावळी

नामें मुक्तमणी चरित्रपदकें भक्तीसुतें गुंफिली ।

कंठीं भूषण शोभतांचि भुलल्या त्या मुक्तियोषा बळें

त्यांचा संग निरीक्षितांचि रुसल्या गेल्या कुबुद्धी पळें ॥१४॥

हे गाथा यशलाभ या क्षितितळीं सर्वार्थही भेटवी

अंतीं रामपरायणासि पदवी वैकुंठिंची दाखवी ।

केली माधवनंदनें कविवरें मंत्राद्यहारावळी

तेरा गुंफुनि पावला गुरुकृपें धन्यत्व सन्मंडळीं ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP