मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध २|
समावर्तनाचा संकल्प वगैरे

धर्मसिंधु - समावर्तनाचा संकल्प वगैरे

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


"मम गृहस्थाश्रमार्हतासिद्धिद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थ समावर्तनं करिष्ये"

असा संकल्प करून नान्दीश्राद्धापर्यंत कर्म बटूनेच करावे. ब्रह्मचारी जीवत्पितृक असेल तर पित्याची माता इत्यादिकांचा उद्देश करावा. ब्रह्मचारी अशक्त असेल तर पित्याने प्रतिनिधिरूपाने नान्दीश्राद्ध करावे. उपनयनाप्रमाणे समावर्तनामध्येही पित्यानेच नान्दीश्राद्ध करावे असे मतान्तर पूर्वी सांगितले आहे. अवशिष्ट प्रयोग आपापल्या गृह्यसूत्राप्रमाणे करावा. दहा अथवा तीन ब्राह्मणांना भोजन द्यावे. जे मधुपर्कपूजा करतील त्यांच्या येथे रात्री रहावे. त्यानंतर व्रतांचा संकल्प करावा. ही व्रते दोन प्रकारची आहेत; आपल्या गृह्यसूत्रात सांगितलेली आणि स्मृतीमध्ये सांगितलेली. ही सर्व व्रते पुरुषार्थरूप आहेत समावर्तनाची अंगे नव्हेत. अशत असेल त्याने आपल्या गृह्यसूत्रात सांगितलेली तेवढीच व्रते करावी. शक्त असेल त्याने स्मृतीमध्ये सांगितलेली देखील करावी. ती अशी निमित्त असल्यावाचून मी रात्री स्नान करणार नाही. नम्रपणाने मी स्नान करणार नाही. नग्न होत्साता मी शयन करणार नाही. मैथुनावाचून अन्यत्र मी नग्न स्त्रीला पहाणार नाही. वृष्टि होत असता धावणार नाही आणि वृक्षावर आरोहण करणार नाही. कूपामध्ये उतरणार नाही. बाहूंनी नदी तरणार नाही. प्राणसंशयाचे कृत्य करणार नाही. याप्रमाणे सूत्रोक्त व्रते सांगितली.

N/A

References : N/A
Last Updated : May 19, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP