पाणपोईवाली

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात.


झाली ती ओणवी, तों पदर उरिं सरे सैल झाला, झुले तो

पाणी दे पाणपोईजवळ उभि, पितां ऊर्ध्वदृष्टी फुले तो !

बोटें तीं ओंजळीचीं विरळ, मग तिची धार बारीक झाली;

मद्येच्छू काय पीतो अविचल ? मदिराक्षी तरी काय घाली !

N/A

कवी - भा. रा. तांबे

वृत्त - स्रग्धरा

ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर

Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP