मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नरहरि|गंगारत्नमाला| भाग २ गंगारत्नमाला भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ गंगारत्नमाला - भाग २ कवी नरहरी यांनी पौराणिक काव्य लिहून मराठी भाषेला एक आगळीच झळाळी दिली. Tags : kavyanarahariramकाव्यनरहरिराम भाग २ Translation - भाषांतर शा०वि०गंगा ही हरि-पाद-पंक-ज-भवा स्वर्गावरी राहिली ॥तेथे स्वर्ग-नदी म्हणोनि पहिले नावाप्रती पावली ॥तेथोनी मग शं-करे निज-जटा-जूटांतरी वाहिली ॥आली भूमिवरी हरी अघ जरी पाप्यांनि ही गाहिली ॥२३॥शा०वि०रामा पुण्य हरी-पदांबु-लहरी-बिंदू शरीरा जरी ॥स्पर्शे तत्क्षणि जो असेल पदरी तत्पाप-वृंदा हरी ॥घेता नाव जिचे अनंत जनुचे जे पाप देही असे ॥गंगा त्या सकलासि घालवितसे ती भूवरी ही वसे ॥२४॥हे ऐकून राम विचारतो-उ०जा०भागीरथी का इजला म्हणावे ॥कशी वदा जान्हवि नाव पावे ॥आश्चर्य माते बहु होत आहे ॥दीनार्थ जी भूवरि माय वाहे ॥२५॥विश्वामित्र सांगतो-उ०जा मुनी म्हणे आयिक राम-राया ॥जो लागला मृत्यु-करा मराया ॥सकृत जरी घे नर नाम वाचे ॥तात्काळ नाशी भय ते भवाचे ॥२६॥शा०वि०साकेताधि-प-नंदना हरि-पदी गंगा जगन्माउली ॥ऐके सांगतसे सख्या तुज कशी स्वर्गाप्रती पावली ॥जीच्या सानुज आयिकोनि सकला हो सच्चरित्रा सुखी ॥नित्य श्री-कर सर्वदा हि तुझिया तन्नाम राहो मुखी ॥२७॥प्रल्हादात्म-ज जो विरोचन तया सत्पुत्र झाला बळी ॥नामे सर्व सुरांसि जिंकुनि करी राज्य त्रि-लोकी बळी ॥तत्त्त्रासे स्तविला रमेश अमरी जो भक्त-चिंता-मणी ॥घे तो कश्यप-गेहि जन्म अदिती-पोटी जगाचा धणी ॥२८॥गीति.र्हस्वांकृति धरि म्हणुनी, वामन हे नाव ठेविले बाळा ॥उप-नयन योग्य झाला, तेचि क्षणि देव शिक्षि जो काळा ॥२९॥मग तो ब्रह्मचारी वामन बळी यज्ञ करित होता तेथे गेला; तेव्हा-उ०जा०बळी तया पाहुनि देव-राया ॥प्रेमे नमी होउनि नम्र पाया ॥म्हणे मला धन्य तु आजि केले ॥स्वद्दर्शने कल्मष सर्व गेले ॥३०॥सिंहासनी बैसवि वामनाला ॥सं-तोष झाला बळिच्या मनाला ॥ब्रह्मादिकी यद्यश शुद्ध गावे ॥पूजी तया दैत्य-पती स्व-भावे ॥३१॥कामदा.माग जे तुला पाहिजे असे ॥राय घे म्हणे सर्व देतसे ॥ऐकुनी तया बोलिला हरी ॥सांग कोण त्वत्तुल्य भुवरी ॥३२॥पूर्वजांचिये नाव राखिले ॥एक मागतो पाहिजे दिले ॥मत्पदे धरा तू त्रि-पाद दे ॥ऐकुनी बळी बोलिला मदे ॥३३॥कामदा.गाव आथवा राज्य माग की ॥काय पाहिजे सांग आणखी ॥देव बोलिला इतुके पुरे ॥लोभ केलिया काय ही नुरे ॥३४॥पृथ्वी.नको म्हणत आसता 'गुरु धरा तयाला दिली ॥विरोचन-सुते, तदा वचन-सत्य-ता राखिली ॥तदैव जगदीश्वरे निज-विराट-रूप-च्छले ॥अनंत हि पद-द्वये जग समग्र ही व्यापिले ॥३५॥स्त्रग्धरागेला जो ऊर्ध्व-पाद त्रि-भुवन-गुरुचा तन्नखें रंध्र झाले ॥ब्रह्मांडाच्छादनाला तदुपरि जळ जे शुद्ध ते आत आले ॥पाद-स्पर्शे प्रभूच्या सकल-जगदघ-ध्वंस-कर्तृत्व त्याते ॥ये स्वर्गी ब्रह्मदेवाद्यमर-नुत पडे घोर तौयौघ पाते ॥३६॥गीति.विष्णु-पद-स्पर्शाने विष्णु-पदी-नाव पावली राया ॥तेथुनि स्वर्गी राहे गंगा-नामे सुरांसि ताराया ॥३७॥देव-मुनि स्तविति जिला गाती गंधर्व सर्वदा राया ॥सुर-सिंधु ती भूवरि आली कलुषौघ सर्व दाराया ॥३८॥मालिनीसगर-तनय रामा मत्त होवोनि गेले ॥कपिल-नयन वन्हीमाजि पोळोनि मेले ॥शुभ-गति पितरांते द्यावया दीन-बंधु ॥भगिरथ नृप आणी भूवरी स्वर्ग-सिंधु ॥३९॥ N/A References : N/A Last Updated : April 10, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP