मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीज्ञानेश्वरसमाधी महिमा| अभंग ४५ ते ५० श्रीज्ञानेश्वरसमाधी महिमा अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ४३ अभंग ४४ अभंग ४५ ते ५० अभंग ५१ ते ५५ अभंग ५६ ते ६१ श्रीज्ञानेश्वरसमाधी महिमा - अभंग ४५ ते ५० श्रीसंतज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतलेली पाहून श्रीनामदेवांना भरून आले आणि त्यांनी श्रीसंतज्ञानेश्वरांच्या स्तुतीपर हे अभंग लिहीले. Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवपुस्तकसंतमहिमा अभंग ४५ ते ५० Translation - भाषांतर ४५ऐसी स्तुति नमनाची । केलिया भगवंताची ।ऐकतां जाली रुची । म्हणे धन्य धन्य रे सख्या ॥१॥कैसी स्तुति परिकर । जपतां नामावळी साचार ।वेगीं तुष्टले हरिहर । निज ब्रह्म स्वरुप ॥२॥वैष्णव सभोंवते उभे । तिहीं जयजयकार प्रतिभे ।करुनि रुक्मिणीवल्लभे । तया प्रसाद दिधला ॥३॥मागुता ज्ञानदेव वदे । धन्य धन्य तुझीं चरणारविंदें ।तेथें रातलिया योगिवृंदें । ते चरण धन्य धन्य ॥४॥पुंडलिकें स्तवन । मांडावें तंव नारायण ।म्हणे सन्मुख उभा सोपान । यासी समाधि देणें लांगेल ॥५॥निवृत्ती मुक्ताई दोघें । तीं बुझाविलीं पांडुरंगें ।उद्धव अक्रुर वेगें । तया संगें निरविलीं ॥६॥ज्ञानदेवासी उद्धव । बोले एकांतीचा भाव ।तुम्हां तुष्टला देवाधिदेव । धन्य धन्य वैष्णव तुम्ही ॥७॥ज्ञानदेव म्हणे स्वामी । दीनें रंकें विठोबाचे आम्ही ।धन्य धन्य भाग्याचे तुम्ही । जे निरंतर विष्णुसंगें ॥८॥उद्धव म्हणे ज्ञानेश्वरा । आम्ही जाणो कृष्णावतारा ।परि पांडुरंग मूर्ति निर्धारा । तूं आणि पुंडलिक जाणसी ॥९॥नामा म्हणे ज्ञानदेवें मागुतें स्तवन आरंभिलें भावें ।तें ऐकवया देवें । एकचित्त केलें ॥१०॥४६कर जोडोनियां पुढें । लोटांगण टाकिलें गाढें ।म्हणे स्तवन करावया मी वेडें । काय जाणे तुझा महिमा ॥१॥तरी पांडुरंगा तूं दयाळु । भक्त भाविकां कृपाळु ।भीमातटीं उभा गोपाळु । पुंडलिकाकरणें ॥२॥चंद्रभागा सरोवरीं । निरे भिवरेचां तिरिं ।वाट पाहसी हरी । भक्तासाह्या कारणें ॥३॥तरी उदार शूर महिमेचा । खुंटलिया चारी वाचा ।तेथ पवाडु मज कैंचा । वर्णाविया सामर्थ्य ॥४॥शेषा ऐसा स्तुती करी । तया नाकळ्सीच श्राहरि ।जिव्हा चिरलिया भग्नधारी । मग मौन्येंचि राहिला ॥५॥तो तूं अळंकापुरीं येसी । मज दीना समोखिसि ।देव म्हणे तूं होसि । साक्षात ज्ञानरुप ॥६॥ज्ञानदेवो साक्षात नाम तुझें । तें ज्ञान ह्रदयीचें माझें ।हे जन तारावया काजें । तुवां अवतार घेतला ॥७॥नामा म्हणे देव हरी । पुढतोपुढतीं साहाकारी ।वर देऊनि अंगिकारी । आपणची जाला ॥८॥४७तव अंतरिक्षीं गगनीं । देव बैसोनि विमानीं ।वर्षताती दिव्य सुमनीं । पांडुरंगावरी ॥१॥विठोबा गुणनिधी । सवें पुंडलिक सुबुद्धि ।लघिमा आणिमादी सिद्धी । सवें असती ॥२॥मग नेमिलिया तिथी । कृष्णपक्ष अष्टमी समर्थीं ।नाम संकीर्तन संतसंगतीं । तो ब्रह्मप्राप्ति पावला ॥३॥नवमीं गजर कथेचा । तरि वैष्णव तोचि साचा ।चतुर्भुज होईल हे वाचा । वदोनियां गेले ॥४॥सहज ते दशमी । दिंडी जागरण आश्रमीं ।तो येईल वैकुंठ ग्रामीं । कीर्तन करीतची ॥५॥एकादशी श्रेष्ठ गाढी । नामस्मरणें कोटीयाग जोडी ।येकी घडी युगाएवढी । एवढें सामर्थ्य इयेचें ॥६॥एकादशी दिननिशीं । जागरणीं ह्रषिकेशी ।कीर्तन करी अहर्निशीं । तरि तो तारिल सर्व जनां ॥७॥द्वादशीस क्षीराब्दी । कीर्तन करील आल्हादीं ।तो पावन होईल गोविंदीं । निजपदीं विष्णूचा ॥८॥त्रयोदशीं उत्तम थोर । करिल दिंडी पताका गजर ।टाळ मृदुंगे झणत्कार । तरि तो सकळ कुळ तारील ॥९॥नामा म्हणे चतुर्दशीं । अमावस्येचा दिवशीं ।ज्ञानदेवीं राहेल नेमेंसी । तरी तो तरैल भूतकाळीं ॥१०॥४८ऐसें वदोनि पांडुरंगें । समस्तांसी वस्त्रें दिली अंगें ।देऊनि भूषणें अनेगें । रत्नमुक्ताफळें अलंकार ॥१॥धन्य जन्मले भूमंडळीं । कीर्तनीं नाचती गदारोळी ।ते विष्णुसन्निध सर्वकाळीं । ऐसें वनमाळी बोलिले ॥२॥राही रुक्मिणी सत्यभामा । विचारिती पुरुषोत्तमा ।बहुत विठोजी जंववरी धरा । तंववरि समाधि स्थिरा ।हरिकीर्तन करितो सैरा । चतुर्भुज होईल ॥४॥हें शिवपीठ शिवाचें । हेंचि पूर्वस्थान अगस्तीचें ।जाणोनि जन्म जाले चौघांचे । सर्व क्षेत्रांची आदिभूमि ॥५॥पूर्वापार युगायुगीं । अनेक पुण्यें घडले यागीं ।तपें तपिन्नलें महायोगी । तो हा आळंकापुरें ठावो ॥६॥येथें रामकृष्ण कथा । जो करील सर्वथा ।तो पुढें पवेल व्यथा । भवबंधापासुनी सुटेल ॥७॥सप्तद्वीप नवखंड । आणि अवघें गणितां ब्रह्मांड ।त्याहूनि हें हो उदंड । पुण्य जोडेल नामें ॥८॥ऐसें उत्तमोत्तम थोर । सकळ जीवांचे माहेर ।नाम घेतां तरती चराचर । दिला वर रुक्मिणीवरें ॥९॥नामा म्हणे देवराव । महिमा सांगतसे भाव ।धन्य आळंकापुरी गांव । आदि ठाव वरिष्ठ ॥१०॥४९नित्य अनुष्ठान ये तीर्थीं । त्याचे पूर्वज उद्धरिती ।जे कां अन्नदान करिती । ते पार्वती वैकुंठीं ॥१॥ऐसें तीर्थक्षेत्र सर्वोत्तम । आणिक नाहीं यासी सम ।शिवपीठ हें मनोरम । आळंकापुरीं हें देख ॥२॥न वर्णवे येथिंची थोरी । जेथें साक्षात श्रीहरि ।येऊनियां झडकरी । ज्ञानदेवा समाधि दिधली ॥३॥अनंत पुण्य ज्याचें गांठीं । तरीच ज्ञानदेव पडे दिठी ।जोडे तप कोट्यानुकोती । ऐसे धूर्जटी बोलिले ॥४॥सिद्ध साधकांचे स्थळ । सर्व तीर्थाचें हेंचि मूळ ।वास केलिया सर्वकाळ । तरी महादोष हरतील ॥५॥अजान वृक्षातळीं हरिकथा । नित्य जो नर करी तत्वतां ।तो न जाय यमपंथा । ऐसें जगन्नाथ बोलिले ॥६॥द्वारीं सुवर्णाचा अश्वत्थ । नित्य पूजलिया स्वस्थ ।लक्ष्मी न सांडी तया सत्य । सकळ आर्ती पूर्ण होती ॥७॥नित्य प्रदक्षिणा सप्त । तरी अगाध पुण्य त्वरित ।पूर्वज्क वैकुंठासी जात । बेचाळिसां सहित ॥८॥नित्य विष्णूचें पूजन । नित्य नाम संकीर्तन ।नित्य वैष्णव संत भोजन । धन्य पावन इहलोकीं ॥९॥नामा म्हणे आळंकापूर । सर्व क्षेत्रामाजीं मनोहर ।पवित्रासी परम परिकर । त्रिभुवनीं दुर्लभ ॥१०॥५०ऐसें तीर्थ सर्वोत्तम । सांगतसे पुरुषोत्तम ।शंकरादि परमधाम । ब्रह्मनाम वर्णित ॥१॥क्षेत्रमहिमा अति अद्भुत । आदि सिद्धेश्वर कुळदेवत ।समर्थ महाभागवत । नामें गर्जत सर्वकाळ ॥२॥म्हणे पुंडलिक पूर्वींचे स्थळ । आणि शिवाचें मूळपीठ निर्मळ ।तेथें निर्विकल्प सोज्वळ । तप विशाळ जोडिले ॥३॥क्षेत्र पंढरीहुनी अधिक । ऐसें बोलती ब्रह्मादिक ।म्हणती धन्य येथिंचे लोक । शुद्ध भाविक प्रेमळ ॥४॥घडे महाविष्णूचें पूजन । तीर्थ व्रत संध्यास्नान ।वाचे हरिनाम कीर्तन । श्रवणीं गुण विष्णुचे ॥५॥विठोजी म्हणे ऐक भक्ता । तपोनिधी महंत तूं सर्वथा ।ज्ञानदेवासारिखा वक्ता । मज आवडता न दिसे ॥६॥तुम्ही दोघे असा या सृष्टीं । जग उद्धारीं पाटोवाटीं ।कीर्तन करितां उठाउठीं । तो वैकुंठीं पावावें ॥७॥पुंडलिकें नमस्कारिले हरी । चरणचज वंदिले शिरीं ।म्हणे मी भाग्याचा उजरी । तूं कैवारी आमुचा ॥८॥नामा म्हणे देशभक्त । एक होऊनि समस्त ।निवृत्तिराज स्तुति बोलत । प्रेम अद्भुत दाटलें ॥९॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP