तरीही केधवा

’कुसुमाग्रज’ या टोपणनावाने श्री. विष्णू वामन शिरवाडकर (१९१२-१९९९) यांनी मराठीत लेखन केले.


दोघांत आजला

अफाट अन्तर

जुळून पाकळ्या

उडाल्या नंतर-

जीवनावाचून

जळला अंकुर

प्रश्नहि राहिला

राहिले उत्तर !

 

संग्रामी आजला

शोधतो जीवित

उरींचे ओघळ

दाबून उरात-

उठती भोवती

धुळीचे पर्वत

अखण्ड फिरते

वरून कर्वत !

वादळी रणांत

करणे कोठून

नाजूक भावांचे

लालनपालन-

तरीही केधवा

पडता पथारी

थडगी दुभंग

होतात अंतरी-

आठवे तुझ्या ते

प्रीतीचे मोहळ

आणि हो बिछाना

आगीचा ओहळ !

N/A

References :

कवी - कुसुमाग्रज

ठिकाण - मुंबई

सन - १९३७


Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP