मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचीकरणादी अभंग| ४६ ते ५२ पंचीकरणादी अभंग १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५२ पंचीकरणादी अभंग - ४६ ते ५२ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : abhangramdassamarthaअभंगरामदाससमर्थ पंचीकरणादी अभंग - ४६ ते ५२ Translation - भाषांतर ४६पांचहि प्रळय सांगईन आतां । जाणिजे तत्वतां दोन्हों पिंडीं ॥१॥दोनी पिंडी दोनी ब्रह्मांडप्रळय । पांचवा अन्वय विवेकाचा ॥२॥विवेकाचा पंथ विवेकें जाणावा । योगियांचा ठेवा निरूपण ॥३॥निरूपणी निद्राप्रळय बोलिला । दुजा मृत्यु जाला प्राणियासी ॥४॥प्राणियासी पिडी हे दोनी प्रळयो । ब्रह्मा निद्रा क्षयो ब्रह्मराचा ॥५॥ब्रह्मयाचा क्षयो तो ब्रह्मप्रळयें । व्यतिरेकान्वयो विवेकाचा ॥६॥विवेकाचा अर्थ माईक सर्वही । स्वस्वरूपीं नाहीं चराचर ॥७॥चराचर मूर्ति मायिक प्रसिद्ध । हा विवेक सिद्ध सज्जनाचा ॥८॥सज्जनाचा भाव सर्व दृश्य वाव । दृश्यातीत देव जैसा तैसा ॥९॥जैसा देव आहे तैसा ओळखावा । प्रळय पांचवा दास म्हणे ॥१०॥४७कण सांडोनियां घेऊं नये भूस । गर्भेविण फणस घेऊं नये ॥१॥घेऊं नये नारिकेळाची नरोटी । सालपटें खोटीं डाळिंबाची ॥२॥डाळिंबाची त्वचा चवड उंसाचा । स्तंभ कर्दळीचा कामा न ये ॥३॥खातां न ये नाना फळांची आटोळी । अहो हे वाचाळी वाउगीच ॥४॥वाउगें सांडोनि सा तेंचि घ्ययावें । येर तें सांडावें मिथ्याभूत ॥५॥मिथ्याभूत जें जें तत्व दृष्टी पडे । म्हणोनियां घडे त्याग त्याचा ॥६॥त्याग त्याचा कीजे तें मनीं कल्पावें । मग अनुभवें जाणिजेल ॥७॥जाणिजेल सार त्यागितां असार । बोलावा विस्तार कासयासी ॥८॥कासयासी आतां धरावा संदोहो । कल्पनेचा देहो नाशिवंत ॥९॥नाशिवंत आहे नांव आणि रूप । पाहें आपेंआप दास म्हणे ॥१०॥४८खोटें निवडितां खरें नाणें ठरे । तेसेंचि विस्तारें तत्त्वज्ञान ॥१॥तत्त्वज्ञान खोटे जाणोनि सांडावें । मग ओळखावें परब्रह्म ॥२॥परब्रह्म वरवें संतसंगें कळे । विवेकें निवळे मार्ग कांहीं ॥३॥मार्ग कांहीं कळे पईक्षा जाणतां । दिशाभुली होतां वाट चुके ॥४॥वाट चुके मीन ऐसें न करावे । सार्थक करावे दास म्हणें ॥५॥४९जें जें कांहीं दिसें तें तें सर्व नासे । अविनाश असें आत्मरूप ॥१॥आत्मरूपीं दृष्टि घालितां निवळे । आपेंआप कळे मिथ्या माया ॥२॥मिथ्या माया वाटे साचाचे सारिखी । स्वरूपा ओळखी जंव नाहीं ॥३॥जंव नाहीं जाली संदेहा निवृत्ती । तंव हे प्रचीती जाणवेना ॥४॥जाणवेना मनी निश्चयावांचुनी । निश्चयो श्रवणीं दास म्हणे ॥५॥ ५०देहबुय्द्धि बहु काळाची जुनाट । नवी आहे वाट सार्थकाची ॥१॥सार्थकाची वाट भ्रांतीनें लोपली । जवळी चुकली असोनियां ॥२॥असोनियां देव जवळी चुकला । प्राणी भांबावला मायाजाळें ॥३॥मायाजाळ दृश्य तुटे एकसरें । जरि मनीं धरे स्वस्वरूप ॥४॥स्वस्वरूपनिश्चयें समाधान होय । रामदासीं सोय स्वरूपाची ॥५॥५१योगियांचा देव मज सांपडला । थोर लाभ जाला एकाएकीं ॥१॥एकाएकीं देव त्रैलोक्यनायक । देखिला सन्मुख चहूंकडे ॥२॥देशधडी नित्य निरंतर । व्यापूनी अंतर समागमें ॥३॥समागम मज रामाचा जोडला । वियोग हा केला देशधडी ॥४॥देशधडी केला वियोग । रामदासीं योग सर्वकाळ ॥५॥५२जेथें जावें तेथें राम समागमीं । आतां कासया मी खंती करूं ॥१॥खंती करूं ज्याची तो समागमेंचि । पाहातां सुखाची घडी होय ॥२॥अहो देव खरा भूमंडळवासी । जातां दिगंसाती सारिखाचि ॥३॥सारिखाचि जनीं वनीं वनांतरी । तो गिरिकंदरी सारिखाचि ॥४॥सारिखाचि देव कदा पालटेना । राहे त्रिभुवना व्यापुनियां ॥५॥व्यापुनीया दासासन्निद्यचि वसे । विचार वलसे रामदासीं ॥६॥श्रीरामदासस्वामींची अभंगगाथा समाप्त N/A References : N/A Last Updated : November 05, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP