पंचीकरणादी अभंग - १६ ते २०

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


१६
दिसे तें नासल सर्वत्र जाणत । या बोला व्युत्पत्ती काय काज ॥१॥
कार्य कारण हा विवेक पाहिजे । तरीच लाहिजे शाश्वतासी ॥२॥
शाश्वतासी येणें जाणेंचि न घडे । साकार हें मोडे दास म्हणे ॥३॥

१७
निर्गुणस्वरूपीं मूळमाया जाली । तिच्या पोटीं आली गुणमाया ॥१॥
गुणमायेपोटीं जाला सत्वगुण । सत्वीं रजोगुण उद्धवला ॥२॥
उद्धवला रजोगुणीं तमोगुण । तमोगुणीं जाण व्योम जालें ॥३॥
व्योमापोटीं वायु वायुपोटीं तेज । तेजीं तें सहज आप जालें ॥४॥
आपासूनियां भूमंडळ होणें । शात्रींचीं वचनें दास म्हणे ॥५॥

१८
मायेचें स्वरूप ब्रह्मीं उद्भवलें । तिच्या पोटा आलें महत्तत्व ॥१॥
महत्तत्वीं सत्व सत्वीं रजोगुण । तिजा तमोगुण रजापोटीं ॥२॥
पोटीं पंचभूतें तमाचिया आलीं । दास म्हणे जाली सृष्टि ऐसी ॥३॥

१९
शून्यापासूनियां जन्म आकाशासी । आकाश वायूसि प्रसवले ॥१॥
प्रसवला वायु तया तेज जालें । तेजाचिया आलें पाटआप ॥२॥
अपापासुनियां सृष्टि ते जन्मली । ऐसी विस्तारली माया देवी ॥३॥
मायादेवी वेळे शून्याकडे पळें । ते काळीं खवळे पंचभूत ॥४॥
जें जें जया व्यालें तें तेणें भक्षिलें । अंतीं तें उरलें शून्य एक ॥५॥
शून्याचें स्वरूप पाहतां कांहीं नाहीं । तें शून्य सर्वही जेथें आटे ॥६॥
आहे हें आटलें त्याचें शून्य जालें । शून्यहि विरालें जे स्वरूपीं ॥७॥
स्वरूप पाहातां काळ वेळ गेली । निजठेवी लाधलीं प्राणियासी ॥८॥
प्राणीयाचें हित आहे संतांपायीं । वेगीं शरण जायीं आलियातें ॥९॥
आलिया रे संतसंगें मुक्त होसी । रामीरामदासीं हेंचि वर्म ॥१०॥

२०
पृथ्वीतळीं व्याळ व्याळातळीं जळ । त्यातळीं अनळ सत्य जाण ॥१॥
सत्य जाण तयातळीं तो अनिळ । त्यतळीं पोकळ व्योम आहे ॥२॥
व्योमातळीं अहंकार तो केवळ । तेणें ब्रह्मगोळ धरियेला ॥३॥
धरियेला पुढे महतत्व असे । सप्तावरण ऐसें निरोपिलें ॥४॥
दशगुणीं थोराहुनी थोर एक । हे सप्तकंचुक दास म्हणे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP