प्रासंगिक कविता - प्रसंग ११

समर्थ रामदासांनी हिन्दी भाषेत रसाळ पदे लिहीली आहेत.


( शके १६०३ मध्यें श्रीसमर्थांनीं आपला अवतार संपविल्यानंतर तीन दिवसांनीं भीमस्वामी तंजावरकर सज्जनगडावर येऊन पोंचले आणि दर्शन झालें नाहीं म्हणून निग्रह करून बसले. तेव्हां समर्थांनीं समाधींतून प्रगट होऊन त्यांस दर्शन दिलें व पुढील अभंग सांगितला. हल्लीं श्री समाधीवर मधोमध जी चीर पडलेली दिसते ती याच वेळची होय, अशी आख्यायिका प्रचलित आहे. )
माझी काया गेली खरें । मी तों आहे सर्वांतरें ।
ऐका स्वहित उतरें । सांगईन ॥१॥
राहा देहाच्या विसरें । वर्तों नका वाइट बरें ।
तेणें भक्तिमुक्तीचीं द्वारें । चोजवतीं ॥२॥
नका करूं वटवट । पाहा माझा ग्रंथपट ।
तेणें सायुज्यतेची वाट । ठाईं पडे ॥३॥
बुद्धि करावी स्वाधीन । मग हें मजूर आहे मन ।
हेंचि करावें साधन । दास म्हणे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP