मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|लळित| पदे ४१ ते ४९ लळित पदे पद आणि श्लोक पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ४९ पदे ५० ते ५५ लळित - पदे ४१ ते ४९ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : ramdassamarthaपदरामदाससमर्थ पदे ४१ ते ४९ Translation - भाषांतर ॥४१॥ कोण मी मज कळतचि नाहीं । सारासारविचार शोधूनि पाही ॥१॥नारी म्हणों तरी नरचि भासे । नर म्हणों तरी समूळ विनासे ॥२॥दास म्हणों तरी रामचि आहे । राम म्हणों तरी नाम न साहे ॥३॥॥४२॥ आतां तरि जाय जाय जाय । धरी सद्रुरूचे पाय ॥ध्रु०॥ संकल्प विकल्प सोडूनि राहें । दृढ धरुनी पाय पाय पाय ॥१॥नामस्मरण ज्या मुखीं नाहीं । त्याणें वाचुनी काय काय काय ॥२॥मानवतनु ही नये मागुती । बरें विचारुनि पाहें पाहें पाहें ॥३॥आत्मानात्मविचार न करितां । व्यर्थ प्रसवली माय माय माय ॥४॥सहस्त्र अन्याय जरी त्वां केले । कृपा करील गुरु माय माय माय ॥५॥रामदास म्हणे नामस्मरणें । भिक्षा मागुनि खाय्र खाय खाय ॥६॥॥४३॥ अरे नर सारविचार कसा ॥ध्रु०॥ क्षीर नीर एक हंस निवडिती । काय कळे वायसा ॥१॥माया ब्रह्म एक संत जानती । सारांश घेती तसा ॥२॥दास म्हणे वंद्य निंद्य वेगळें । कर्मानुसार ठसा ॥३॥॥४४॥ अरे मन पावन देव धरी । अनहित न करी ॥ध्रु०॥ नित्यानित्यविवेक करावा । बहुजना उद्धरीं ॥१॥सकळ चराचर कोठुनि जालें । कोठें निमालें तरी ॥२॥ दास म्हणे जरी समजसी तरी । मुळींची सोय धरीं ॥३॥॥४६॥ भूतकाळीं कर्म केलें वर्तमानीं आलें । त्याचें सुख मानूनियां भोगितो आपुलें ॥ध्रु०॥सुखदु:खभोग जाला तोचि मागिल ठेवा । आतां दु:ख मानू नको करी राम सेवा ॥१॥बाईल मेली पोर मेलें द्रव्य नाहीं गांठीं । तळमळ लागली जीवीं कांरे होशी कष्टी ॥२॥जें जें दु:ख होतें जीवा तेंचि मागिल कर्म । आतां त्याचें सुख मानी स्मर राम नाम ॥३॥नामाविण राहूं नको असा फजित होशीं । पुन्हां घडे नये बापा नरकामध्यें जाशी ॥४॥भविष्याचा धोका तुझे हातामध्यें आहे । पळभर विसरूम नको नाहिं कोणी साह्ये ॥५॥सावध होंई सावध होंई किती सांगूं तुजला । तुजला । परिणाम कठीण मोठा शरण जांई गुरुला ॥६॥दास म्हणे जालें तें तरी होउनियां गेलें । नको नको म्हणतांहि भोगवितें केलें ॥७॥ भूतकाळीं० ॥॥४७॥ एकला जगदंतर जाहला । आणीक कोणीव नाहीं तयाला ॥१॥चारी खाणी चारी वाणी । हालवी बोलवी चालवी त्याला ॥२॥एक धरी एक त्यागीत आहे । आपण आपण भोगवीत आहे ॥३॥दस म्हणे हा बहुविध तमासा । पाहिल तो मग होईल तैसा ॥४॥॥४८॥ ज्या ज्या वेळे जें जें होईल तें तें भोगावें । विवेकाला विसरुनि आपण कष्टी कां व्हावें ॥धृ०॥एकदां एक वेळ बहु सुखाची गेली । एकदां एक वेळ जीवा बहू षीडा झाली ॥१॥एकदां मागूं जातां मिळती षड्रस पक्कान्नें । एकदां मागूं जातां न मिळे भाजीचें पान ॥२॥सुकृत दुष्कृत दोन्ही पूर्वदत्ताचें फळ । ऐसें प्राणी जाणेना तो मूर्खचि केवळ ॥३॥देह दु:खास मूल ऐसें बरवें जाणोन । सुखदु:खाविरहित रामदास आपण ॥४॥ज्या ज्या० ॥॥४९॥ घटका गेलीं पळें गेलीं तास वाजे झणाणा । आयुष्याचा नाश होतो राम कांरे म्हणाना ॥१॥ एक प्रहर दोन प्रहर तीन प्रहर गेले । विषयाच्या संगामुळें चारी प्रहर गेले ॥२॥रात्र कांहीं झोंप कांही स्त्रीसगें गेली । ऐशी आठा प्रहरांची वासलाद झाली ॥३॥दास म्हणे तास वाजे सकळां स्मरण देतो । वेळोवेळां राम म्हणा म्हणोनि झणकारितो ॥४॥ N/A References : N/A Last Updated : April 13, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP