षड्रिपुविवेचन - कोपनिरूपण

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


कोपआरोपणा खोटी कोपें कोपचि वाढतो । मोडतो मार्ग न्यायाचा अन्याय प्रबळे बळें ॥१॥
क्रोध हा खेद संपादी जेथें तेथें चहूंकडे । विवेक पाहतां कैंचा शुद्धि तेथें असेचिना ॥२॥
भ्रुकुटी कुटिला गांठी काळिमा वदनीं चढे । कुर्कुरी बुर्बुरी रांगें हस्तपायच चोळितो ॥३॥
कुशब्द वोखटे काढी त्रासकें वचनें वदे । घेतसे बालटें ढालें उणें काढी परोपरी ॥४॥
बोलतां हिसळे थुंका तये ताये उसाळतो । तांबडे जाहले डोळे रागें रागाच फुगला ॥५॥
कँठलल्लाटिंच्या शीरा फुगल्या घाम चालिला । थरथरा कांपतो रागें रूपें भूतचि जाहला ॥६॥
धर्ते लोकांसि झिंजाडी सातांपांचांचि नावरे । कुस्ती लिथाडी पछयाडी मारामारी धबा-धबी ॥७॥
सुटलीं फिटला वस्रें नागवे दिसती जनां । लाज ते अंतरीं नाहीं गांधलें नीट धांवती ॥८॥
अनर्थ मांडला मोठा लाथा बुक्या चपेटिका । कोपरें मारिती शीरीं काष्ट-पावाणअर्गळा ॥९॥
मुसळें मारिती काटया खिडी डांगाच ढेंकळें । डसती झोबतीं अंगानीकुरें लविती कळा ॥१०॥
एकांहीं धरिल्या शेंडया वृषणीं लविती कळा । पाडिलें दांत भोंकाडें मस्तकें फोडिलीं बळें ॥११॥
ताडिले पाडिले पडले रक्तबंबाळ जाहले । घरचीं मारिती हांका हांका बोंबा परोपरी ॥१२॥
दिवाणामाजि ते नेले मारिले दंड पावले । क्रोधें करंटे ते केले क्रोध चांडाळ जाणिजे ॥१३॥
भल्यानें कोप सांडावा शांतीने असत बरें । क्षुल्लकें कोप पाळावा भल्याचें काम तो नव्हे ॥१४॥
इतिश्री क्रोधरिपु । जेणें बहुत जाला दर्पू । त्यांचीं लक्षणें अमूपू । निरूपिलीं साक्षेपें ॥१५॥

॥ क्रोधनिरूपण समाप्त ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP