मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवसुत|
जायाचें जग का असेंच ?

जायाचें जग का असेंच ?

केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.


`` Doth then the world go thus, doth al thus move ? ''
-  W. Drummond.
श्लोक
जायाचें जग का असेंच ? सगळें ऐसेंच का चालणें ?
ऐसा न्यायच का जगामधिं आम्हांलागीं सदा लाभणें ?
सर्वाला नियमीतसे दृढ असें तें हेंच का शासन ?
देवांनो, असलेंच काय तुमचें सामर्थ्य द्या सांगुन ? ॥१॥
जे आत्मे अपनीतिच्या निबिड त्या धुंदीमुळें आंधळे
त्यांशीं अन्ध विधी सदैव करितो सख्यत्व कीं आपुलें;
जे कीं, आणिक हे सुनीति ! धरिती भक्ती तुझीयावरी
जाती लोटत वादळामधिं अहा ! ते जीर्ण पर्णापरी ! ॥२॥
सर्वांचा अवघ्या नियामक असे का हो कुठें ईश्वर ? -
तो आहे, मग सन्मनें हळळती दुःखामधें कां तर !
नम्रत्वावरि हाय ! उद्धटपणा वर्चस्व कां तें करी ?
कां हो हाल तुटूनि हंत ! पडती निर्दोषितेच्यावरी ? ॥३॥
बा धांव देवा ! तर ये त्वरेनें !
ही दुर्दशा थांबिव रे दयेनें;
बा, साधु आणीक असाधु यांचें
समप्रकर्षी युग आण साचें !
डिसेंबर, १८८२.

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP