मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवसुत|
‘ पण लक्षांत कोण घेतो ?’ च्या कर्त्यास

‘ पण लक्षांत कोण घेतो ?’ च्या कर्त्यास

केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.


( शार्दूलविक्रीडित )

यूरोपीय कथा-पुराण-कविता-प्रन्थांतुनी चांगले,
ते आहेत कितीक धोर उमदे राऊत वाखाणिले;
ज्यांचें ब्रीद-पवित्र राहुनी, जगीं दुष्टांस दण्डूनियां
कीजें सन्तत मुक्त दुर्बल जना, मांगल्या वाढावया !

या त्यांच्या बिरुदामुळेंच बहुधा, सन्मान ते जाहले---
देते या महिलाजनांस पहिला, स्त्रीवर्गकार्यीं भले---
ते भावें रतलें, क्षणक्षण मुखें स्त्रीनाम उच्चारुनी,
भूपुष्ठस्थित आद्य दैवत जणूं त्यां वाटली भामिनी !

‘ आहे रे पण कल्पनारचित हें सारेंचि वाग्डम्बर ’
हे कोणी व्यवहारमात्रचतुर प्राणी वदे सत्वर !
‘ नाहीं ! ---वाचुनि हें पहा ! ’ म्हणुनि मी तूझी कथा दावितों,
गेले राउत ते न सर्व अजुनी !-- हा गर्व मी वाहतों !

धीरा ! उन्नतिचे पथांत उमदा राऊत तूं चालसी !
नाहीं काय ? करूनि चीत अगदीं ही रूढिकाराक्षसी,
टांकानें अपुल्या दुराग्रह जुना मर्मीं तसा विंधुनी,
स्त्रीजातीस असाच काढ वरती !-- घे कीर्ति संयादुनी १

१९ ऑक्टोबर १८९२

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP