मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीकृष्ण - कथामृत| पंधरावा सर्ग श्रीकृष्ण - कथामृत प्रस्तावना श्री सद्गुरु प्रार्थना अनुक्रमणिका पहिला सर्ग दुसरा सर्ग तिसरा सर्ग चवथा सर्ग पांचवा सर्ग सहावा सर्ग सातवा सर्ग आठवा सर्ग नववा सर्ग दहावा सर्ग अकरावा सर्ग बारावा सर्ग तेरावा सर्ग चौदावा सर्ग पंधरावा सर्ग सोळावा सर्ग सतरावा सर्ग अठरावा सर्ग श्रीकृष्ण कथामृत - पंधरावा सर्ग संतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते. Tags : ganudaskrishnamarathiकृष्णगणुदासमराठी पंधरावा सर्ग Translation - भाषांतर ( शमोद्योग ) व्योमानिलानल जलावनि सोमसूर्य - हो त्री भि र ष्ट त नु भि र्ज ग दे क ना थःयस्तिष्ठतीह जन -- मंगल -- धारणायतस्मै नमोस्तु निरपेक्षहृदे शिवाय ॥१॥झरे सतत वाहते तव कृपारसाचे नवेजरी न मज लाभले तरि न शब्दही आठवेफुलेल तरु पोषणाविण कसा कथावें तरीम्हणोनि गुरुमाउली वरदहस्त ठेवी शिरीं ॥२॥वास वनीं अज्ञातीं तेवींधर्म बळावर धर्म संपवीधौम्य पुरोहित म्हणे तयासी “ दावध व्हावें अतां मनासी ॥३॥राज्य तुझें तुज वडिलोपार्जितयुद्धावांचुन मिळे न निश्चितत्यादृष्टीनें वर्षे गेलींअंधसुतानीं खटपट केली ॥४॥जनार्थ केल्या बहुसुखसोयीप्रवास आतां निर्भय होई पाट काढिले शेतीसाठींरंजक वस्तू भरल्या हाटीं ॥५॥वाया जाइल मानव शक्तिनाद लाविले किती या रीतींकरुन विडंबन गतकालाचेंपवाड गाती निजमहतीचे ॥६॥सतत असत्या प्रचारुनीया शाश्वत - हित विध्वंसीतेच गोड वाटते जनांसीं आली बकता हंसीं ॥७॥प्रजा असे विसराळू रायास्पर्शवेदिनी सत्य म्हणायाभूत भविष्या नच बघते तीतिज शिकवावे लागत संतीं ॥८॥भेटुन वरि वरि परराष्ट्रासीअसे निर्मिला स्नेह तयासीनृपवश करूनी घेत सुयोधनगमे तया हा जनहित कारण ॥९॥निस्वार्थी नी उदारवृत्तीहस्तक इतरा नित ऐकवितीतोच सुखाचा गमे जनातेंकुणा दुरचें आंतिल दिसतें ? ॥१०॥यास्तव सोपें नसे युधिष्ठिरविजय मिळविणे सुयोधनावरमुळें नृपा ! या विष - वृक्षाचींफार खोलवर गेली साचीं ॥११॥जनांस कौरव आवडती जरतेच सुखे नांदोत महीवर हवें कशाला राज्य मला तेंअसें न धर्मा आण मनातें ॥१२॥लोक तुला नच सर्व विसरले स्मरती अजुनी चित्तींअशांत म्हणुनी असती कौरव वाटत त्यासी भीती ॥१३॥सुयोधनानें स्वार्थापोटींप्रजा वळविली प्रेयापाठींमिळवुन द्यावे श्रेय तयांचेकार्य असे हें निर्लोभाचें ॥१४॥द्वारकेस जातो कपिकेतूविराट - कन्या - परिणय - हेतूंनिजपुत्रासीं अणावयातेंदे त्यासह संदेश हरीतें ॥१५॥योगेश्वर तो बुद्धिमतांवर येथ विवाहास्तव आल्यावरमंत्रबळें होईल तयाएंविफल सर्वही सुयोधनाचें ॥१६॥सांगतसे जें तेथ पुरोहितसहज पांडवा झालें संमत‘ प्रमाण अपुली आज्ञा ’ म्हणुनी वाकविती निज - मस्तक चरणीं ॥१७॥धर्मा करुनी नमन धनंजय निघे द्वारकेलागीं पवनगतीचे चपल अश्वही गमती त्या लघुवेगीं ॥१८॥पुरी द्वारका सोन्याची तीरविकिरणांनीं चमकत होतीप्रहर दोन टळले दिवसाचेअर्जुन ये मंदिरा हरीचे ॥१९॥पर्यंकीं श्रीहरी निजेलाअंगावरती घेउन शेलासोनसळी तो पदर तयाचानिश्वासें हळुं हालत साचा ॥२०॥नयन निमीलित तरिही सुंदर पुष्ट भुजेवर ठेवियलें शिरसरळ बाहु आजानु दुजा शुभशय्येवरतीं रुळतें कौस्तुभ ॥२१॥उच्चासन घेऊन उशासींअसे सुयोधन खल मदराशीसळ नयनीं, वळवीत मिशांनातुच्छ जणूं मानी सकलांना ॥२२॥सुयोधनासी बघतां क्षणभर अर्जुन थबके दारींगमे तया धनराशी जवळी जणुं कां नाग विखारी ॥२३॥जवळी येउन चरणा सन्निधउभा ठाकला मग विजयायुधनम्रपणें जोडिले करासीउठुनी बसले तों हृषिकेशी ॥२४॥वदती विजया हर्षित - हृदयें“ दूर असा कां बैस इथे येप्रिय सखया आलास कधीं तूं काय धरियला मनांत हेतु ” ॥२५॥‘ विनवाया तुज ’ म्हणे किरीटतोच आडवुन म्हणें कुहीटी“ मदीय परिसे वचन रमाधवप्रथम इथें मी आलों यास्तव ॥२६॥प्रथम येत जो त्या तोषविणेंमान्य करोनी त्याचें म्हणणेंतुज ठावी ही सज्जनरीती श्रेष्ठ म्हणुन तव पूजा होती ” ॥२७॥“ तुला कौरवा केव्हांपासुन सन्नीतीची महतीपटली, झालें फार बरें वा ” ! हसुन म्हणे श्रीमूर्ती ॥२८॥“ प्रथम जाहलें तुझें आगमनप्रथम पाहिला मी परि अर्जुनम्हणुनी मजसी उभयांचेंहीप्रिय - संपादन अवश्य होई ॥२९॥भावि रणास्तव हवें तुम्हातेंसहाय्य मम हें कळतें मातेंदोन दिशा मी तुमचें पुढती - ठेवित, घ्यावी जी आवडती ॥३०॥पूर्ण निरायुध एक असा मी‘ नारायण ’ मम सैन्य दुजें हेंशूर सज्ज जे विशाल आहे ॥३१॥ग्रहण हवें तें करणें यांतुनअसे धाकटा तुम्हांत अर्जुनसंधी पहिली म्हणुन तयासीचोजविणें प्रथमतां शिशूसी ” ॥३२॥व्यकुळ झाला मनीं कृपण तो “ मागे अर्जुन कायसेना जातां, घेउन कृष्णा काय करूं मी हाय ” ॥३३॥त्यजी परिस जड मुरडून नाकींनिवडि गारा बघुन चकाकी दूध टाकिलें थुंकुन ओठींलाळ घोटितो मद्यासाठीं ॥३४॥सूज्ञ परी टाकून पसारामूळ सूत्र घे करूनि विचाराम्हणे धनंजय “ हवास तूं मजशस्त्र न धरिसी तरी अधोक्षज ॥३५॥कुरूराजा बहु हर्षित होई“ म्हणे मूढ हा नच चतुराई ”रुची कीड्यांची हंसा नाहींपाहुन बगळा करितो ही ही ॥३६॥कौरव विनवी बलरामातेंतो न करी परि साह्य कुणातेंम्हणें “ सारखे दोघेही मजविरुद्ध त्यांतुन होत गदाग्रज ॥३७॥तव पक्षानें प्रिय बंधूसह लढणें दुःसह मजसीयेथ तईं नच वसेन जातों तीर्थाटन करण्यासी ” ॥३८॥पुरा गजाह्वय परते राजावदे हरी “ मी कुठल्या काजाकां म्हणुनी विजया मजलागीघेतलेस तूं मागुन वेगीं ॥३९॥देई उत्तर विनयें अर्जुनदुजें नको मज तुझ्या कृपेविणतं ज्या अपुल्या म्हणसी हृदयेंस्वयें त्याकडे श्री, यश जय ये ॥४०॥कुरू - राजाच्यामुळेंच हेहीभाग जाहलेम वदणें पाहीन मागतां तरि मुलास आईकाय दयाळा सोडुन जाई ॥४१॥या करितां नच मी आलेलामत्स्यपुरा परि तुज नेण्यालाअभिमन्यूचे लग्नासाठींसर्वहि आतुर तुझिया भेटी ॥४२॥विराट कन्या शुभा उत्तरा कलावती गुणशालीभाच्यासी तव वधु नेमियली सर्व सिद्धता झाली ॥४३॥रणविद्या तूं अभिमन्यूसीस्वयें दीधली अनुपम ऐसीलतितकलांचीमम शिष्या तीपरस्परां हे भूषण होती ॥४४॥श्रीकृष्णासी झालें बहुसुखउत्सुक देवी बघण्या सुनमुखनिघे पुरींतुन वर्हाड सत्वरलग्नाकरितां विशाल सुंदर ॥४५॥शृंगारित रथ अभिमन्यूचासभोंवतालीं गण ललनांचाकांतीनें ज्याचिया तनूचेंतेज गमे निस्तेज हिर्याचें ॥४६॥नवरदेव तो खुले तयांनींजयंत जैसा सुरांगनांनींनीति श्री धृति कीर्तीनें वावीर जसा शोभून दिसावा ॥४७॥हत्तींवरच्या अंबार्या त्या शिखरें जणुं मेरूचींचमकत होतीं सूर्यकरांनीं झूलहि भरगच्चीची ॥४८॥हिरे मानके पांच मण्यांनींभूषविले जे कनक नगांनींअश्व असे तेजाळ सुलक्षण पथें चालतां करिती नर्तन ॥४९॥ध्वजा रथाच्या नभीं फडकतीअसंख्य सुंदर ज्या विविधाकृतिरम्य फुलांनीं हें नटलेलेंसजीव कानन जणुं कीं चाले ॥५०॥सती सुभद्रा सती रुक्मिणीतशाच दुसर्या श्रीहरिरमणीरमा शारदा सावित्रीसमपवित्र पावन ज्यांचा विभ्रम ॥५१॥रथांत एक्या नर - नारायणसस्मित चाले प्रेमळ भाषणत्यांतिल गोडी चाखायास्तवभंवती फिरती सात्यकि उद्धव ॥५२॥वनमालीची वैभवशाली सेनाआली या रीतींवाजत गाजत सुरसरितेसम साजत जी का भूवरतींकरी स्वागता थाट, समुत्सुक विराट गाती भाट जयाधरी मुरारी उरीं नृपासी जरी वाकला धरुनि नया ॥५३॥“ दिष्ट्या त्वं वर्धसे युधिष्ठिरसत्य निष्ठया ” वदे रमावर प्रभा तुझी ग्रहमुक्तरवीसीउजळवील कीं पुनः महीसी ॥५४॥अर्ध्यादि स्वीकारुन पूजनवसे मंदिरीं रम्य दयाघन पुढें उत्तरा अभिमन्यूचाविवाह झाला बहु थाटाचा ॥५५॥ मनीं सर्वही हर्षित झालेमिष्टान्नानें याचक धालेआहेरासी करी रमावरगणती त्यांची करणें कुठवर ॥५६॥हत्ती घोडे रथ सोन्याचे वस्त्रें बहुमोलाचींकुबेर लज्जित व्हावा ऐशी राशी नवरत्नांची ॥५७॥पांडवपक्षी नृप जे तेथेंद्रुपद मगध पुरुजितादि होतेदंप्तीस पूजिले तयांनींअमोल सुंदर वस्त्राभरणीं ॥५८॥समारंभ तो सरल्यावरतींराजसभेसी बसले नृपतीरत्नें मंडित शुभासनासीवदे तयांना मग हृषिकेशी ॥५९॥“ नृप हो द्या अवधान जरासेंघ्या निर्णय जो समुचित भासेसदाचार सन्नीति तुम्हासीगमे प्राणसी सदा हवीशी ॥६०॥अन्यायाची चीड तुम्हांसीबोलतसे मी या विशासींनको सांगणें इथें नव्यानेंकसें कपट केलें शकुनीनें ॥६१॥सरळ मनाच्या युधिष्ठिरा तो नडुन कपट द्यूतेंधृतराष्ट्रासी वश करुनीया धाडी वनवासातें ॥६२॥कोण फेडितो स्वप्नांतील ऋणहाल सोसुनी द्यूताचा पणसत्यनिष्ठ हा परी युधिष्ठिरशिणला वर्षे तीन दहांवर ॥६३॥उदार - कीर्तीं हरिश्चंद्र नलधर्म असे हा त्या मालेंतीलराजर्षी हा विपदा भोतीजसा कुणी बलहीन अभागी ॥६४॥विजयी हा गांडीव धनुर्धरश्रेष्ठ जयाहुन एकच शंकरभूमीलाही उलथायाचेंअपार बल कीं या भीमाचें ॥६५॥सूत माद्रिचे हे बलशालीएरि सकलीं मुख घालुन खालींभोगियले दुःसह हाला यापण धर्माचा सत्य कराया ॥६६॥पुरी प्रतिज्ञा केली अपुली धैर्यें पंडुसुतांनींअवश्य आहे मिळणें आतां राज्य तयां परतोनी ॥६७॥वडिलोपार्जित राज्य असें हेंउभयां त्यावर सत्ता आहेकौरव जरि ते सरळपणानेंदेतिल ना तरि अनर्थवाणें ॥६८॥धर्माच्या या उदारहृदयींक्षमाच आहे शत्रूविषयींविनाश व्हावा सुयोधनाचालवही नाहीं भाव तयाचा ॥६९॥न्याय परायण नृप हो यास्तवविचार कांहीं सांगा अभिनवकौरव पांडव या दोघांहींजया मुळें अन्याय न होई ॥७०॥मनीं वाकड्या कुरुराजाचेंआज काय तें कळत न साचेंगमे पाठवूं म्हणुनी कोणीदूत विवेकी सुशील मानी ॥७१॥अर्ध भाग राज्याचा देउन समेट जरिकां झालाआनंदाची गोष्ट असे ती युद्ध हवें कवणाला ॥७२॥भाषण ऐकून भगवंताचेंअर्थ - धर्म - युत मृदु समतेचेंसाधु साधु बहु योग्य वचांनींस्तवन मांडिलें सकल नृपांनीं ॥७३॥विचार विनिमय करुन घडीभरद्रुपद करी सकलांस्तव उत्तर“ पक्ष आपुला असो नयाचाम्हणुन यत्न हा केवळ साचा ॥७४॥समेट होईल त्या अधमासीस्वxxतहि नच पटे अम्हांसीभुजग कदाचित निर्विष होइलदुष्टभाव नच कौरव सोडिल ॥७५॥नाश करावा पंडुसुतांचाहेत तयांचा फार दिसांचाअतां न त्याची कींव करावीसीमा शांतीसही असावी ॥७६॥उतरेल न मद अंशसुतांचा युद्धावांचुन देवाधर्मासाठीं ससैन्य आम्ही सिद्ध वेंचण्या जीवा ॥७७॥चेकितान युयुधान सात्यकीविराट राजा मत्स्यासह कींकुंतिभोज हा पाण्ड्य दुजे हीनृपती यासी संमत पाही ॥७८॥दंड यमाचा योग्य खला यासंधि तरीही हवा करायादशननासम असुरासींहीरघूत्तमें संधी दिधली ही ॥७९॥परी आमुची विनवी आहेतुम्हीच घ्यावें कार्य शिरीं हेंकुरूराजासी निजप्रभावेंकसें दुज्यांनीं उपदेशावें ॥८०॥सभेमधे ज्या श्रीभीष्मादिकतेथे तुम्हीची उन्नतमस्तकचतुरपणा ये चातुर्यासीअपणाजवळी हें हृषिकेशी ॥८१॥सूर्यशतापरि तेज आपुलें श्रुतिसम पावन वाणीविचार करितां सामर्थ्याचा गमता पिनाक - पाणी ॥८२॥आपणची जा श्रीयदुनाथा ”वदले सर्वहि नमवुन माथा“ होय बरें ” म्हणती जगजेठीदूत जाहले भक्तासाठीं ॥८३॥हर्षित झाले सकलहि राजेवदती “ कळवा घडेल जें जेंआज्ञा व्हावी अम्हांस तोंवर कथितां होऊं सेवे सादर ” ॥८४॥निज नगरासी जाई नृपगणपाण्डव आणि श्रीमधुसूदनपरस्परीं करितात विचारा प्रश्न कसा हा सुटेल सारा ॥८५॥विवेक नुरला सुत मोहानेंलवही ज्या त्या धृतराष्ट्रानेंसंजय नामें दूत आपुलाउपप्लव्य नगरास धाडिला ॥८६॥‘ भेद काढणें युधिष्ठिराचा पाहुन बलावलासीयुद्धापासुन विन्मुख करणें ’ बोधियलें हें त्यासी ॥८७॥वंदन करुनी पंडुसुतांनाकुशलें त्यासी पुशिलीं नानाअपुलीं हीं त्या सांगुन साचींबोलत वाणी धृतराष्ट्राची ॥८८॥“ नित्य असो कल्याण आपुलेंसाम घडावा हेंच चांगलेंमूर्ख परी मम सुत दुर्योधनबसला आहे हट्टा पेटुन ॥८९॥तो कवणाचें मानित नाहींपरी तसें ना तुमचें कांहींतुम्हें जाणतें अहांत सारेयुद्ध करा नच हें अविचारें ॥९०॥पाट वाहवुन नर - रक्ताचेकाय तरी सुख या राज्याचें विषय सुखाचें नसे प्रयोजननिभेल तुमचें परभृत होउन ॥९१॥मूर्खासंगें मूर्ख न व्हावें ही सुजनांची रीतीसहजशीलता पंडु - सुतांची असामान्य ही ख्याती ॥९२॥म्हणे कोपुनी कंस - निबर्हण“ दूता आवर हें तव भाषणधर्म न कारण या नाशासी कसें दिसें परि हे अंधासी ॥९३॥पांडवांस या कथिसी भिक्षाचोरा सोडुन धन्यास शिक्षाअम्ही जाणतों धर्म अधर्मानृपनीतीच्या तसेंच मर्मा ॥९४॥परतुनियां जा क्षमा असे तुजदूत दंड्य ना म्हणे अधोक्षजमीच येउनी गजनगरासीस्वयें सर्व मांडीत सभेसी ” ॥९५॥सर्वां चरणीं ठेवुन मस्तकपरता झाला अपाप सेवकदूत म्हणोनी भगवंताचीहोत सिद्धता निघावयाची ॥९६॥सूर्यासम दैदीप्य रथासी अश्व चार तेजस्वीध्वज गरुडांकित फडके वरतीं दारुक विनयें विनवी ॥९७॥धर्मराज विनवी विनयेंसीसर्व समर्था हे हृषिकेशी करी न भाषण तेथ विरोधीकसाहि हो परि सामच साधी ॥९८॥हट्ट धरी जरि फार सुयोधनदुखवूं त्यासी नको अवर्जुनपांचचि गावें पुरेत मातेंराज्य तयासी लखलाभों तें ” ॥९९॥“ युद्ध शक्य तोंवरि टाळावें ”म्हणे धनंजय वत्सल भावें“ सर्वहि साधे यत्न बळावरसांगू तुज मी काय रमावर ” ॥१००॥कभिन्न काळा कठोर कातळअवचित पाझरणें त्यांतुन जलतेवीं तापट भीम म्हणाला“ साम करावा तिथें दयाळा ॥१०१॥रक्तपाद होवो न महीवर जन नांदोत सुखानेंयुद्ध कराया मन नेघे मम ” बघत हरी नवलानें ॥१०२॥खैराचा अंगार निवावापर्वत जेवीं हलका व्हावाशेळपटे वा सिंह वनींचाभाव तसा हा वृकोदराचा ॥१०३॥कृष्ण बोलला त्या उपहासुनहोय कसें विपरीत विलक्षणधगधगती संतप्त भावनाविझली भीमा कशी कळेना ॥१०४॥कोठें गेला तुझा पराक्रमकीचकादि खल जनास जो यमअंधसुताच्या मांडीवरतीआदळणारी गदा कुठें ती ॥१०५॥पक्षाघातें गळले बाहूकीं भ्रम झाला तुज हें पाहूंतुझा भरवंसा मजसी होताअवसानीं या करिशी घाता ॥१०६॥भीम उत्तरे शांतपणानें देवा म्हण कांहीं तूंभरतकुलाचा नाश न होवो हाच मनींचा हेतू ॥१०७॥सती द्रौपदी हें संभाषणऐकत होती दूरी राहुनशांतपणा हा त्या वीरांचाभाल्यासम तिज रुतला साचा ॥१०८॥दुःखानें त्या परि संतपएंमानधना ती थरथर कांपेउरीं हुंदके समावती नाश्वास शिणविती नाकपुड्यांना ॥१०९॥लाल तांबड्या नयनांमधुनींस्रवे क्रोध जणु जलरूपानींगाल पोळले अश्रूनीं त्याबटा कचांच्या मुक्तचि होत्या ॥११०॥केंस मोकळे धरुनी हातींशोकावेगें वदे सती तीआठव करुनी या केसांचायत्न करावा मग सामाचा ॥१११॥अपमानाचें जगणे जीवन हें का फल धर्माचेंअतां सह्य नच होत मला हें सत्य सांगते वाचें ॥११२॥राज्य नको जर असेल यासीपुरा गजाह्वय कशास जासीपांच तरी कां हवींत गांवेंभिक्षा मागुन सुखें जगावें ॥११३॥त्रैलोक्या जिंकील बळानेंशौर्य होत तें केविलवाणेंवेष, वर्ष जो धरिला होता भिनला कीं तो हृदयीं आतां ॥११४॥भैरवता नांवातच केवळथिजली वृत्ती मरगळलें बळरिपुमर्दन करण्याचें सोडुनबसा सुखें जपमाळा घेउन ॥११५॥जळो शांतता युधिष्ठिराचीधिक धिक् यश किर्ती विजयाचीअर्थ न उरला भीमबळा याविडंबिती खल ज्यांची जाया ॥११६॥तेरा वर्षे धुमसत आहे मम हृदयीं जो अग्नि रिपुरुधिराच्या अभिषेकाविण तो नच जाय विझोनी ॥११७॥बलशाली ते पांचपुत्र ममअभिमन्यू हा अतुल पराक्रमलोळवुनी कौरवा महीवनिववितील हें जळतें अंतर ॥११८॥मीच करंटी ये जन्मासीकशास देऊं दोष कुणासीतुम्हांस पडतो मोह शमाचा खेळ असे हा हतदैवाचा ॥११९॥शोक करी ती साध्वी विह्वलद्रवेल ऐकुन वज्र शिलातल तिला शांतवी मग वनमालीदुर्दिन सरलें तव पांचाली ॥१२०॥भीमार्जुन हे तव शत्रूंचीरणीं दुर्दशा करतिल साचीमान न देती मम वचनालाविनाश त्यांचा मग ओढवला ॥१२१॥सम्राज्ञी होशील पुनः तूंसमर्थ आहे हा कपिकेतूविदीर्ण होतिल शतधा कौरवअसत्य माझी गिरा नसे लव ॥१२२॥निरोप घेउन या परि चढले रथावरी भगवंतसवें सत्यकी विश्वासाचा श्रेष्ठ वीर धीमंत ॥१२३॥काल रम्य तो ऋतु शरदाचात्रास न होई पथें धुळीचादिसे वनश्री उह्लसिता तीवरांगना जणु न्हाली होती ॥१२४॥डुलती सुफलित विस्तृत शेतेंजणों वंदितीं भगवंतातेंसूर्य करांनीं विकसित पद्मजशी यशःश्री निवास सद्में ॥१२५॥सज्जन - हास्या परी सुनिर्मळशोभत होतें तळ्यांतलें जलशुभ्र हंस गण आंत विलासेपवित्रतेचें वाहन जैसें ॥१२६॥अजें दुजें ना लव शरदासीसुंदरता दे सकल तरूंसी पूर्ण - यौवना वररमणीसम हरित - पटावृत अवनी अनुपम ॥१२७॥शुभ्र पांढरे मेघ तरळती नील नभासी कोठेंफेनपुंज सागरावरी जणु वायु डुलवी वाटे ॥१२८॥निरपवाद शोभा शरदाचीनिजदृष्टींनें खुलवित साचीकुरुनगरा प्रभु पोंचे येउनउभा स्वागता असे सुयोधन ॥१२९॥पायघड्या पसरल्या पथावररत्नांचे वर तोरण सुंदरघुमती मंजुल मंगल वाद्येंचारण गाती स्वागत पद्यें ॥१३०॥दुर्योधन शकुनी दुःशासनवंदन करिती आदर दावुनविनती करिती कृत्रिम भावें “ यदुराया मंदिरी चलावें ॥१३१॥सहा ऋतूंच्या सुख सौंदर्याएकदांच ये उपभोगायाजिथे असा तो हर्म्य मनोहरदासी मोहक सेवे तत्पर ” ॥१३२॥उपहारा हरि नसे भुकेला शुद्ध भाव त्या रुचतीवररंगानें भुलेल का तो हृदयीं ज्याची वसती ॥१३३॥“ सस्मित वदती सुयोधनासीश्रम करिसी हें व्यर्थ कशासीद्वारेचा मी आज न राजाआप्तपणा नच तुमचा माझा ॥१३४॥प्रियभक्ताचें करण्या रक्षणदूर सारिली लाज गोत - धनदास असे मी पंडुसुतांचाघेउन आलों निरोप त्यांचा ॥१३५॥तूं राजा मी दूतचि केवळविदुरासदनीं असें मला स्थळ‘ असो पाहुणा सम अधिकारीअसे सांगती लोक विचारी ” ॥१३६॥“ भोजनास तरि निदान यावें मम सदनीं यदुनाथा ” लगट करी तो खल दुर्योधन विनवी लववुन माथा ॥१३७॥म्हणे मुरारी त्या झिडकारुनयोग्य मानिती तदाच भोजन जिथें प्रेम तें असतें उत्कटधनहीना वा येतां संकट ॥१३८॥फार शिरूं की नये खोलवर ऐक सांगतो स्पष्ट हवें तरकुंठलीही मज नसे विपत्तीतुझी नि माझी लव ना प्रीती ॥१३९॥रथ घे विदुराघरी दारुका ऐकुन बसला खलास चरका मनांत भारी जळफळले तेसुधा वर्षली विदुरावरतें ॥१४०॥वळे दयाघन भाग्यसमीरेंधन्य धन्य हे नाथ मुरारेसाध्वी त्याची घे लोटांगणकुंती माता दे आलिंगन ॥१४१॥प्रेमळ वत्सल गुज गोष्टींनींदीर्घ तरी ती सरली रजनेनिरोप धाडी नृपा जनार्दनयेऊं कधी मी भेटी लागुन ॥१४२॥दुसरे दिवशीं राजसभेसी शिनिवीरा सह येईवासुदेव भगवान रमाधव संतजना सुखदायी ॥१४३॥ श्यामल कांती नवजलदासमधीर गती सुचवीत पराक्रमनतजनतारक रम्य पदें तींजणुं फुललीं कमलें भूवरतीं ॥१४४॥पीतांबर हा बहुमोलाचालखलख चमके कांठ जयाचा शोभत शेला अंगावरतीपदरा जडलें माणिक मोतीं ॥१४५॥गजशुंडेपरि अ जा नु बा हूधजती ना खल तयास पाहूंदीप्त रवीसम हृदयीं कौस्तुभकोमल ओठीं हास्य खुले शुभ ॥१४६॥डुलते कानीं सुरेख कुंडलस्कंधीं रुळती कुरळे कुंतलतिलक केशरी मृगमदमिश्रितमुगुट शिरींचा तेजे तळपत ॥१४७॥असा मनोहर योगविदांवर येता परिषत्स्थानी उभे राहुनी स्वागत केले भीष्मासह सर्वांनीं ॥१४८॥सुवर्ण मंचक रत्नें मंडितपादपीठ ज्या असे सुशोभित तेथ आदरें समापतीसीबसवी राजा नम्रवचेंसी ॥१४९॥सर्व सभासद बसले खालींवृत्ती त्यांची उत्सुक झालीपरमेशाचें श्रवण्या भाषणउठतां श्रीहरि शांत सभाजन ॥१५०॥“ कुरुकुल - तिलका धृतराष्ट्रा हेसख्य करूं मी आलों आहेकौरव पांडव या दोघांचेंभलें असो हें हेत मनींचे ॥१५१॥वंश असे हा श्रेष्ठ कुरूंचावचक दूरवर असे जयाचावंशाची या उज्वल कीर्तीसुरलोकींही किन्नर गाती ॥१५२॥मलिन न व्हावे यश ऐसे हें म्हणुनी सावध राहीमिथ्या वर्तन करणारासी स्वतंत्रता बरि नाहीं ॥१५३॥तुझे लाडके पुत्रचि येथेंडाग लाविती कुलकीर्तीतेंधर्मार्थासी हे अवमानुनकरूं पाहती नृशंस वर्तन ॥१५४॥दुर्बल लवही नसती पांडवशांत राहिले प्रेमानें तवतुझेच ते त्या जवळ करावेंहेंच विनविले तयीं सुभावें ॥१५५॥धर्म म्हणे तुज ‘ हें प्रिय तातादुजा आसरा अम्हां न आतां तुम्ही आमुचे वडिलांमागेंलालन पालन केलें अंगें ॥१५६॥दुःख साहिलें तव आज्ञेनें समय पाळिला सर्व नयानेंजागा आतां निज वचनासी राज्य करावें परत अम्हांसी ’ ॥१५७॥पंडू सुतांचा असा असे हा निरोप भूपा तुजसीअपार शक्ति असुनी अंगी विनम्र ते गुणराशी ॥१५८॥कथितों राजा तुझ्या हिताचेंअर्ध - राज्य दे पंडुसुतांचेंयुद्धाची ती वेळ न आणीसर्व - नाश होईल निदानी ॥१५९॥जय मिळवाया कौंतेयावरसमर्थ नाहीं कुणी सुरासुरराजा त्यासह सख्य करावेंजगताचे हित यांत समावें ॥१६०॥सांगा हो मज तुम्ही सभाजनद्रोणा भीष्मा करा निवेदनबोलत का मी अन्यायाचेंअसत्य शिवलें ना मम वाचें ॥१६१॥धर्म जाणती तुम्ही विचारीउत्तरदायी अहांत सारींनिर्णय घेतां अन्यायाचेसभासदांसीं पाप तयांचें ॥१६२॥निग्रह करूनि तव पुत्राचा समेट राजा साधीधर्म युधिष्ठिर तव आज्ञेसी नाहीं लवहि विरोधी ॥१६३॥धर्मनीतियुत वच समयोचितऐकुन झाले जन रोमांचितभीष्म पितामह वदले तेव्हां“ सकल हिताचा बोल हरी हा ॥१६४॥धृतराष्ट्रानें उत्तर केलेंश्रेयस्कर तव भाषण सगस्ळेंकाय करूं परि सुतासमोरीगुंग होत मम बुद्धी सारी ॥१६५॥धरी दुराग्रह मूर्ख सुयोधनरुचते ना मज त्याचे वर्तनउपाय परि मम चालत नाहींतूंच पहा त्या सांगुन कांहीं ॥१६६॥सर्वंकष तव कुशाग्र बुद्धिवश असती तुज सकला सिद्धि चतुर भाषणी तूं यदुरायाबोध करी हट्टी तनया या ” ॥१६७॥“ फार बरें ” मधुसूदन वदले “ कुरुराया तुजसाठीं सुयोधनासी बोधिन ’ म्हणती ‘ ऐक हिताच्या गोष्टी ॥१६८॥कुलदीपक तूं कुरूवंशाचापरिचय आहे तुज विद्यांचाज्ञान असे तुज भल्या बुर्यांचेंवचन मोडिसी कां वडिलांचें ॥१६९॥अवगणितां हितचिंतक बाप्पाकारण होतें पश्चातापा दुराग्रहा बळी पडुनी पाहीकुलक्षया नच कारण होई ॥१७०॥कामाहुन अर्थाची महती अर्थ अकिंचन धर्मापुढतींअधिष्ठान हें कधिं नच टाकींहित साधावें इह परलोकीं ॥१७१॥द्वेषा करिसी जन्मापासुनपंडुसुतांच्या तूं निष्कारणक्षमाच आहे त्याचे हृदयींपरी तियेचा अंत न पाही ॥१७२॥क्रोध न आला युधिष्ठिरासी अर्जुन धनु ना चढलेंतोंची निजहित साध सुयोधन ! वा संकट ओढवलें ॥१७३॥याच परी भीष्मद्रोणांनींबोध तया केला विदुरांनींपरी सुयोधन बहु अभिमानीवाक्य कुणाचें लव नच मानी ॥१७४॥क्रोध तयाचा उसळूनि यावाम्हणे “ माधवा कळला कावाढोंग दावुनी निःस्पृहतेचेंहित केवलो तूं बघसी त्यांचें ॥१७५॥बोधाची कां उगी उपाधीलवही नाही मी अपराधीद्यूतीं मजसी विजय मिळालानसे कुणाचा मी ओशाळा ॥१७६॥पोसुन माझ्या अन्नावरतीद्रोणभीष्म मज उलटे कथितीधाक घालिसी हरी कुणासीभीत न मी त्या बृहन्नडासी ॥१७७॥राज्य राहुंदे सुइच्या वरची देइन ना मातीहीसमरीम मृत्यू येइल येवो मज वीरा भय नाही ॥१७८॥म्हणे जनार्दन “ बरें तथास्तुवीर वृकोदर पुरविल हेतूवीरशयन तुज मिळेल निश्चित तदा न मागें घे यत्किंचित ॥१७९॥निर्दोषी मानिसी स्वतालापहा शोधुनी निज चित्तालाघातियलेंसी विषान्न भीमाजाळाया यतलास तया मा ॥१८०॥सती द्रौपदी तुझी भावजय तिला गांजिले सोडुनियां नयसभेंत धजसी करण्या उघडीतदाच भरली तव पूर्ण घडी ॥१८१॥तुझिया पापा गणती नाहीत्यजिलें सत्य न पंडुसुतांहींएकच झाली चूक तयांचीतुला ठेविलें जिवंत हेंची ॥१८२॥सुधारिली ती जाईल आतां सुचली तुज दुर्बुद्धिमत्सामर्थे संतजनांचे हेतू नेइन सिद्धीं ॥१८३॥कथितों अंती धृतराष्ट्रा तुजउच्चरवानें म्हणे अधोक्षजबंदित घाली सुताधमा यामोहासी वश होइ न वाया ॥१८४॥कुल रक्षाया वधणें व्यक्तिगांवासाठी कुलास मुक्तित्यजणें गांवहि देशासाठींसूज्ञ जनांची ही परिपाटी ॥१८५॥कंसा वधिलें मी ज्ञातीस्तवप्रजापतीनें दमिले दानवतसें त्यागुनी सुतमोहासीसाध - देश - कुल कल्याणासी ॥१८६॥असें ऐकतां हरिचें भाषण कर्ण ठाकला गर्वे ताठुनवदे सभेसी धिक्कारुनियांहात उचलतो कोण बघूं या ॥१८७॥दुर्योधन नृपवरा तुम्हासीसाह्य सदा मी असे रणासीत्रिभुवन - विजयी भार्गवछात्रापुढे टिकेल न अत्रपरत्रा ॥१८८॥तुम्ही उधळुनी द्या हा संधी विश्वहि सगळे असो विरोधीबडबड या शठ वाचाळाची मनांत लवहि न धरावयाची ॥१८९॥भीष्म म्हणाले गर्जुन कर्णा मूर्खपणा आवर हाघातक असली भर नच घाली सुयोधनाच्या मोहा ॥१९०॥गंर्धवानें धरितां राजातुझा पराक्रम नच ये काजापार्थे केलें मुक्त तुम्हांसीआठव त्याचा करी मनासी ॥१९१॥विराट नगरी गोहरणास्तव होतासी ना ? तूं सह कौरव गाय न ऐकहि परी मिळालीउलट नेसतीं वस्त्रें गेलीं ॥१९२॥तदा एकटा होता अर्जुनघेसी तरि माघार रणांतुनडौल दाविसी कशास पोकळरणांत ज्याची विद्या निष्फळ ॥१९३॥सुयोधना तूं ऐक हरीचेंरक्षण करि यश धन विभवाचेंगोता देइल तुझी प्रभावळगर्वे जी नित वदते बाष्कळ ॥१९४॥अपमानाएं समजुन भाषणकर्ण चालता होत सभेंतुनसंतापें मनिं जळपळलेलाखल दुर्योधन त्या अनुसरला ॥१९५॥बंधन करण्या श्रीकृष्णासी अधमाधम मनि योजीम्हणे हरी मी अपवादांतुन मुक्त जाहलों आजी ॥१९६॥धृतराष्ट्रा हे परिषज्जन होबोल अम्हावर अता न राहोभोगा आतां परिणामासीसंहारी या तुम्हेंच दोषी ॥१९७॥मूर्ख पाहतो मज निगडायासमर्थ नाहीं भुवनत्रय याअजुनी आज्ञा दे मज राजाशासन करितो तुझिया तनुजा ॥१९८॥तुझ्या कडुन परि घडेल ना तेंलिखित विधीचे वृथा न होतें नारी घेतिल मुखांत मातीरडतिलफिरतिलबडवितछाती ॥१९९॥असो पुरे हें बोलूं कायीकार्य अतांमम उरलें नाहींपरिषज्जन हो आज्ञा द्या मज ”वदे सवंदन देव अधोक्षज ॥२००॥सात्यकिचा कर धरुनी त्यजिती सभाग्रुहा भगवंतदीप्त तेज ते पाहुन थिजले खल चित्ती भयभीत ॥२०१॥हरि, विदुराचा निरोप घेउनकरीत कुंतीसी अभिवाद्नजननी वृद्धा वदें तदा तीतेज जणूं का जळती ज्योती ॥२०२॥“ सुतांस माझे कळिव शुभाशीआलिंगन प्रिय पांचलीसीसांग तया संदेश विभो ममरणांत दावा अपुला विक्रम ॥२०३॥अर्थ न कळताम विप्र जसे कावेद ऋचांचा करिती घोकातत्व विसरुनी तसे युधिष्ठिरधर्म धर्म नच सांगे वरवर ॥२०४॥रक्तपात करणें दुष्टांचाअधर्म यांत न लवही साचाहेंच कर्म कीं करण्या करतांनिर्मी क्षत्रिय - जात विधाता ॥२०५॥सून लाडकी सुशील माझीअधम तिला भरसभेंत गांजी झाल्यावांचुन त्याचें शासनमुख तुमचें मी कधीं न पाहिन ॥२०६॥राज्य रक्षिती बाहू ज्यांचेपुत्र तुम्ही त्या वीर पित्याचेसंपादा श्री, वडीलोपार्जिततरीच मानिन तुम्ही वीरसुत ॥२०७॥धर्माधर्मे भ्रांत जनास्तवजन्म होतसे भगवंता तवउचित असें तें करी मुरारीघातियलें तनयां तव पदरीं ॥१०८॥“ आज्ञेनें तव वर्ततील जननी धर्मादि ” सांगे हरीपाठी राहुन साह्य मी करिन गे पुत्रा तुझ्या संगरींराजा धर्म पुनः दिसेल तुजसी सम्राट सिंहासनींधर्माधिष्ठित शासनांत जगता शांती मिळे जीवनीं ॥२०९॥‘ शमोद्योग ’ नांवाचा पंधरावा सर्ग समाप्तलेखनकाल :-आश्विन शके १८७१ N/A References : N/A Last Updated : December 23, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP