मानसपूजा - प्रकरण ३

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥ श्रीराम समर्थ ॥   
आतां ऐका स्वयंपाकिणी । बहु नेटक्या सुगरिणी । अचूक जयांची करणी । नेमस्त दीक्षा ॥१॥
शुचिष्मंत बाह्य निर्मळ । साक्षेपपणीं बहु चंचळ । नेमक निष्टंक केवळ । उमा रमा ॥२॥
ज्यांची भगवंतीं आवडी । श्रीहरिभजनाची गोडी । मनापासोनि आवडी । कथाकीर्तनाची ॥३॥
शक्ति युक्ति बुद्धि विशेष । नाहीं आळसाचा लेश । कार्यभागाचा संतोष । अतिशयेंसी ॥४॥
कदा न आवडे अनर्गळ । वस्त्रें पात्रें झडफळ । नेमक करणें ढसाळा । यथातथ्य ॥५॥
गोड स्वादिष्ट रुचिकर । एकहदयतत्पर । न्यूनपूर्णाचा विचार । कदापि न घडे ॥६॥
रोगी अत्यंत खंगलें । तेणें अन्न भक्षिलें । भोजनरुचीनें गेलें । दुखणें तयाचें ॥७॥
तेथें उत्तमचि आघवें । काय घ्यावें काय सांडावें । जेवीत जेवीत जेवें । ऐसें वाटे ॥८॥
उत्तम अन्नें निर्माण केलीं । नेणों अमृतें घोळिलीं । अगत्य पाहि जेत भक्षिलीं । ब्रह्मादिकीं ॥९॥
सुवासेंचि निवती प्रान । तृप्त चक्षु आणि घ्राण । कोठून आणिलें गोडपण । कांहीं कळेना ॥१०॥
भव्य स्वयंपाक उत्तम । भोजनकर्ते सर्वोत्तम । दास म्हणे भोक्ता राम । जगदंतरें ॥११॥
॥ इति श्रीमानस० ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP