चक्रव्यूह कथा - प्रसंग चवथा

श्री कृष्णदासांनी लिहीलेली काव्ये महानुभावीय स्वरूपाची आहेत.


॥ श्रीकृस्णरायायन्मा : ॥श्री॥ ॥श्री॥ ॥श्री॥

श्रीकृस्ण आर्जुन तेथें गेलें : तवं टहुटाळके पाचारीले : तुम्ही अनंत पवाडे केलें : म्हणौनि युध्यासी बोलावीलें : ॥४॥
मग बोलीला प्राराक्रर्म : आतां तुम्हासी संग्रामी करीन संभ्रम : आता नीवडेल तुमचा भ्रम : सांहे मात : ॥५॥
म्हणौनी आमिते बाण : आर्जुने वरच्यावर तोडुन : तव आज्ञी शस्त्रें घालुन : तवं आज्ञि प्रजळला ॥६॥
त्या आज्ञीतें देखिलें : आर्जुनें प्रजयेशस्त्रें घातले : तेण आज्ञितें निवारीलें : मग तेणें प्रहरीला वायो ॥७॥
पार्थे पन्नकाशस्त्रें घातलें : तेणें पंन्नक चालीलें : तवं टहुटाळके प्रहरीलें : गरुडाशस्त्रें ॥८॥
तेणे पंन्नक गीळीलें : मग आर्जुन्ये काये केलें : ऐसी बहुत आसतीलें : आता नीर्वाण करू ॥९॥
आता पाठवा बंदिजन : तुम्ही बोलावीलें आम्हालागुन : ऐसी बहुत वींदान : थोडी आसती : ॥१०॥
तेणे पार्थे तयाते : हाणीतले टहुटाळकाते : तेणे तोडिले त्या बाणाते : मग हाणीतले सात बाण ॥११॥
च्यार्‍ही चहु वारुवासी : येके भेदला सारथीयासी : दोन लागले टहुटाळकासी : तेणे त्यासी मुर्छेना आली : ॥१२॥
तेणे सांडिला तो रथ : गेला आपुलिया दळात : तवं पाठि लागला तो पार्थ : वर्सला सरधारी ॥१३॥
बाण येती घनदाट : सैन्य अवघे घायवंट : पाडिले विर सुभट : बारा वाटा सैन्यासी ॥१४॥
बाणापाठि येती बाण : आती तीखट दारूण : बहुत पाडिले रण : तीयेवेळी : ॥१५॥
बहुतदळ आटाले : तवं टवटाळके काये केलें : मावेतें स्मरीलें : आवघे जाले तेजमये : ॥१६॥
उदकाचे कलोळें : वाहती नदीचे खलाळे : ऐसें देखिलें डोळा जळें : पार्थवीरे : ॥१७॥
रथ गज नगर : वाहात असति आपार : ग्रामगृहे (सु)स(र)(म)गरः जाताति वाहत ॥१८॥
ऐसा माहापुर बहुत : देखितां जाला पार्थ : मग म्हणे देवातें : आतां निगीजे वेगी : ॥१९॥
उदकाचा माहापुर : वाहुन जाईल रहीवर : ऐथें न चले वीचार : धनुरवीद्येचा ॥२०॥
ते वेळीं श्रीकृष्णनाथ : नाभी म्हणती आर्जुनातें : तुज दावीन वैरीयाते : हे माव राक्षेसी ॥२१॥
दैत्याची या मावा : न कळती समस्ता देवा : आर्जुन म्हणे केसवा : दावी प्रचीती : ॥२२॥
बहुत युध्ये मागा जाली : परि हे माव नाही देखली : देवे मंत्रुनी रक्षा टाकीली : तंव उदक न दीसे : ॥२३॥
काही न दीसे पुर : मग देखिला दळ्भार : मग म्हणे सारंगधर : याचा मृत्यु मी सांगेन : ॥२४॥
टवटाळक नावयासी : तुज सांगेण परीऐसी : तळवातळ हात अन टाळुसी : भेदी एकचि बाणे : ॥२५॥
हे सांगतिले श्रीकृष्णनाथे : मग वीनवीलें पार्थे : भेदीन तीनी ठाया यातें : यातें : ऐसे म्हणिता जाला : ॥२६॥
देवो म्हणे परी ऐसी : तु कैसा याते भेदीसी : तरि सांगै मजपासी  : पंडुसुता : ॥२७॥
पार्थ म्हणे पुर्वामुख : भेदीन उर्ध वीषेख : ऐसें लक्षण देख : छेदिन दैत्याची ॥ ऐसें पार्थ बोले : ते देवाच्या मना आले : मग चालीयलें : तयावर्‍ही ॥२८॥
तवं टहुटाळके दैत्यनाथे : वेढिले आर्जुनातें : हाणता शस्त्रेंघात : लक्षे क्रोडी ॥२९॥
त्याची शस्त्रें तोडुनि : वीद्या जपे मोहनि : शस्त्रेंजाळ घालुनी : मोहीता जाला ॥३०॥
देति जांबया आंगमोडे : सैन्य नीद्रा येउनी पडे । मग रथावरी पहुडे : टवटाळक तो : ॥३१॥
तो नीट चरण पसरी : मग धनोरजयो संध्यांन करी : भेदी तीये आवस्वरी : तळवातळ हात टाळु ॥३२॥
भेदुन तळवातळहाता : वाण जाला नीगता : मग भेदीला माथा : तयांचा पै : ॥३३॥
या परी दैत्यारी मारीले : मग सीर छेदिले : कबंध पाडीलें : धरणीवरी : ॥३४॥
मग मोहोनीशस्त्र काढिलें : सैन्य सचेतन जालें : तेहि पडिला देखीलें : टहुटाळकाते ॥३५॥
मग हाहाकार जाला : वीरा पळ सुटला : मग पार्थ बोलीला : देवरायासी : ॥३६॥
काऐ वर्तलें आसेल तेथें : माझीये उदरी लोळे फीरते : सोध झडकरी पेलीजे रथे : आप्ण जाउं वेगी : ॥३७॥
देव जवं ज्ञानी पाहे : तवं आभीमन्या पडीला आहे : देवो काये म्हणता होये : तीयेवेळी ॥३८॥
द्रोण धनोर्धर थोर : त्या समोर न राहे वरकोदर : जरी धरीला युध्येस्टीर : तरि कार्य नासलें : ॥३९॥
ऐसे पार्थ आसे बोलत : मेलीकारा पावला त्वरीत : तव कोल्हाळ आईकत : दोघेजण : ॥४०॥
आर्जुन म्हणे मुरारी : कोल्हाळ होताये मेलीकारी : काही वीपरीत परी : जाली असे : ॥४१॥
मेलीकाराजवलि आले : स्थातळी उतरले : धनुस्य भाते ठेवीलें : तव आले वैराट द्रोपद : ॥४२॥
तयातें आर्जुन पुसे : हा कोल्हाळ काईसा आसे : तयातें देव म्हणत आसे : चला सामोर ॥४३॥
ऐसे देव बोलीला : तवं ते भीम आला : तेणे हांबरडा हाणीतीला : मग सांगता जाला ॥४४॥
आभीमन्याची वेवस्ता : भीम जाला सांगतां : मूर्छना आलि पार्था : मग पडला धरणीवरी ॥४५॥
अर्जुन उचलीला : धर्मापासी नेला : तव कोल्हाळ जाला : लकुळशाहादेवाचा ॥४६॥
मुर्छना आली पार्थासी : भीम धरीला पोटेसी : कृस्ण म्हणती आर्जुनासी : ऐसे यास काई कीजे ॥४७॥
मग सावध होउन : लेकरु युध्यासी पाठवण : ऐसा बहुत कोपुन : धर्मावरी ॥४८॥
असतां ईतुका दळभारु : युध्या पाठविले लेकरु : या वडिलास काऐ करु : मग धर्म बोलीला ॥४९॥
चक्रवीहु रचीला : भीम संग्रामा पाठवीला : सात क्षेवणिने वेढिला : मग आला आम्हावरी ॥५०॥
द्रोपदाते जिंतिले : सैन्य अवघे भंगले : मग आमते धरीले ते सोडवीलें : वरकोदरे क्षणामाजी ॥५१॥
भीम येकला वेढिला : तो सर्वाआंगी खोचला ॥ थोर मूर्छागत जाला : मग आले दळ टाकोनी : ॥५२॥
ईतुके जवं जाले : तवं द्रोणे भाट पाठवीले : संग्रामासी बोलावीलें : तव भीम मुर्छनागत : ॥५३॥
चक्रवीहुचा मारू : भाट बोलेंती बडीवारु : मग तुमचा तो कुमरु : उठीयला : ॥५४॥
तो नीघाला संग्रामासी : आम्ही वर्जिले तयासी : अभीमन्ये मात केली कैसी : चक्रवीह भेदीला : ॥५५॥
भीम होता वेढिला : तो त्याने सोडवीला : अभीमन्ये संव्हार केला : कौरवात : ॥५६॥
पुनरपी चक्रवीहु भेदीला : कुमर लक्षीमन मारीला : द्रोणकर्ण पळवीला : मार केला सैन्यासी : ॥५७॥
आस्वास्थामयासी : जिंतीलें सरजाळे समस्तसी : ख्याती केली ऐसी :तुझेनी पुत्रे : ॥५८॥
मग समस्ति वेढीला : ते बहुत हा येकला : ऐसा जाला ऐक वेळा : काये कीजें पार्था ॥५९॥
तु म्हणतांसी लेकरू : परी तो सासाअर्जुनाचा अवतारु : तो जाणे मार्गु : चक्रवीहुचा ॥६०॥
ऐसे धर्म बोलीला. तवं आर्जुन कोपला : आम्हा वनवास जाला : तुमचेनि बोलें ॥६१॥
गांधार गंधर्वि धरूनि नेला : तो तुम्ही सोडवीला : वैरभाव होतां तुटला : राज्ये आपुले होते ॥६२॥
आता काऐ आठउ जीवी : तुम्ही रीती केली बरवी : संतोषें तुमचा जीवी : कुमर आधी मारवीला : ॥६३॥
ऐसा बहुता परी कोपला : हातें खर्गासी घातला : तो श्रीकृस्णे धरीला : मग नेला येकांतासी ॥६४॥
त्यासि जाला सीकवीता : धर्म पंडुपस्ये मान पीता : त्यासी प्रवर्तलासी घाता : काऐ आता तुज म्हणु : ॥६५॥
क्षेत्रधर्म पुत्रे केला : धर्म वाया दुखविला : तुवा आपराध थोर केला : जाय लाग चरणासी : ॥६६॥
देवासि म्हणे पार्थ : माझा अपराध जाला बहुत : मी करीन अपघात : मुख केवी दाउ धर्मासी ॥६७॥
कृष्ण पार्थासी म्हणे : आपघात न लगे करणे : पुत्राचा कुढावा करणे : हे विचारा पा : ॥६८॥
आता धर्माची स्तुती करावी : झडकरी त्याते बुझावी ; रणभुमि सोधावी : अभीमन्याची : ॥६९॥
मग आले धर्मापासी : आर्जुन लागला चरणासी : नीष्टुर बोलीलो तुम्हासी : घात आपुला करीन : ॥७०॥
क : मग कढंवाचा खंजीर काढीला : धाउनी भीमाने धरीला : काये म्हणता जाला ; आर्जुनासी : ॥७१॥
तुम्हा ऐसे जाले मरण : आभीमन्याच्या सुड घ्यावा कवण : कौरवा नीपात करण : वायावीण का मरतां : ॥७२॥
नीर्वाळा कौरवा : सुड आपुला घ्यावा : मग भलता वीचारु करावा : जीवासी तुम्ही ॥७३॥
मग म्हणे योधीष्ठिरु : मग वर बोलीला वरकोदरु : हा बरवा केला वीचारु : आम्हास मानला : ॥७४॥
ते वेळी तो पार्थ : आस्तुति करीत : आसुराचा केला घात : जगन्नाथ मानवला : ॥७५॥
खांडववना आज्ञी दीधली : त्रीलोक्यें जींतीली : उत्तरे गोग्रहणी नागवली : कौरव समस्तें ॥७६॥
ऐसी आस्तुत करीता : वीस्तारा जाईल कथा : आर्जुन जाला नीगतां : रणभुमीसी ॥७७॥
सकळ सैन्यासी : अर्जुन आला रणभुमीसी : पडले देखिलें अभीमन्यासी : मग तयांसि काये बोले ॥७८॥
घाईचुर्ण असे जाला : परी आत्मा नाहि गेला : मग काये म्हणता जाला : आर्जुनासी ॥७९॥
म्या प्राण धरी कंठी : जे तुम्हासि होईल भेटी : आईक ताता जगजेठी : मी म्हणे ते परीसांवें ॥८०॥
मी रणि पडिला : तवं जईद्रथे पापर हाणीतीला : तेणे दुखवला : प्राण माझा : ॥८१॥
मग आर्जुन म्हणें अभीमन्यासी प्रभातें वधीन जईद्रथासी : हे सर्वथा माझी भाक ऐसी : जाण सत्ये : ॥८२॥
प्रभाते जरी न मारी : तरी स्वान पातेल माझे सरीरी : त्याते न मारी : करीन आज्ञीप्रवेस ॥८३॥
त्याचा न करी वध : तरी प्राणासी करीन खेद : हा वडीलाचा बोध : याचे पतन मज : ॥८४॥
आपुलीया उदरपोसनाकारणे : पुडिलाचें बोले उणें : तेणे लीपीजे पतने : सत्ये जाणा ॥८५॥
जरी मी तयांसी न मारीता : तरि प्रतिज्ञा बहुतां : पार्थ जाला बोलेतां : सांगतां होईल विस्तारु : ॥८६॥
ऐसे पार्थ बोलीला : मग अभीमन्ये प्राण सांडिला : मग क्रीया कर्म करीता जाला : पार्थ वीरू : ॥८७॥
आर्जुनाची बोली : दुतने आईकीली : तेही सांगीतली : दुर्योधनापुढें ॥८८॥
मग दुर्योधन बोले : जईद्रथासि पाहिजे राखिले : मग द्रोणासी सांगीतिलें : तयावेळीं ॥८९॥
यावरी द्रोण म्हणे : जैईद्रथासी राखिन : आज्ञीप्रवेस करवीन : पार्थाकरवी ॥९०॥
आतां पांडवात : समर्थ येक पार्थ : तो आपणया करील घात : येराचा अंत पुरविन : ॥९१॥
ऐसा जाला वीचारीता : तेथे पांडवाचा दुत होता : तेही जाणवीली धर्मासी वार्ता : भीमा आर्जुनासी ॥९२॥
मग पांडव आले श्रीकृस्णापासी : तेही सांगीतले तयांसी : मग म्हणे ह्रसीकेसी : याचे काऐ भये : ॥९३॥
देव ह्मणे पंडुसुतां : मी जवळी असतां : कैसा राखतील जईद्राथा : प्रभा ते जान वैल : ॥९४॥
ते कर्मली नीसी : उदयो जाला दीनकरासी : पार्थ म्हणे वीरासी वेगी पालाणा : ॥९५॥
सैन्य सावध केलें : मग कृस्णापासि आले : समस्त पायां लगले : सोडोस उपचारी ॥९६॥
देव रथि बैसले : पुडा दळभार चालीले : रणतुरा गजर जालीले : मग आले रणभुमिसी : ॥९७॥
तवं ऐरीकडे दुर्योधने : सामधी केली सैन्ये : मग काये केले द्रोणे : ते परीयेसा पां : ॥९८॥
पालाणोनी बाहीर आला : मग गुरु काये करीता जाला : वीहु चहुकडे रचीला : मधे घातला जईद्रथ : ॥९९॥
मग जन्मोजया म्हणे : त्या वीहुचि नावं कवणे : मग वैसंपायेन म्हणे : परीयेसी राया : ॥४००॥

सुचिकावीहु संकटवीहु : त्यामधे कृस्णवीहु : चवथा चक्रवीहु : परीऐसा पा ॥१॥
याचहुआत : घातला जईद्रथ : आता कैसा वींधील पार्थु : सवं देवें कौसालीया : ॥२॥
ऐसे च्यार्‍ही वीहुते रचीलें : मग रणभुमीसी आलें : ते आर्जुने देंखिलें : (मग) म्हणतीले भीमासी : ॥३॥
द्रोपद आणी वैराट : दुस्टदुन्म सुभट : मी पुढा करीन वाट : वीर आदट संव्हारीन : ॥४॥
तुह्नि चौघी मिळुनी : कौरव पाडावे रणी : आसुध वाहे धरणि : ऐसे करावं ॥५॥
ऐसा करावामारू : ना म्हणावा साना थोरु : सोधे कौरवोदळाचा करा शंव्ह रु : बहुत करावा : ॥६॥
कोंतीभोज वीरराज : शीशुपाळ आत्मज : पराक्रर्म सहज : जाणवलें तुमचा : ॥७॥
आजिचा दिवस : कौरवा घेउ द्या उलास : ऐसे बोले ह्रसीकेस : तया वेळी : ॥८॥
नकुळ शाहादेवें : धर्मापासी असावें : बरवियापरी राखावे : ऐसी आज्ञा दिधली : ॥९॥
संख स्फुरीला देवोदंत : ध्वजी भुभुकार करी हनुमंत : मग उठीवोला पार्थ : बाणि वरसला : ॥१०॥
तेथें संग्राम थोर जाला : पार्थाने गुरू हाणीतीला । घोडे सारथी मारीला : पडले देखा : ॥११॥
तो वीरथी करोनी : संवंचि वीहु भेदुनी : कौरवा मार करूनी : तवं भीम काये करी : ॥१२॥
गजाने गज हाणे गाढा : मारी घोडयाने घोडा :ऐसा करी रगडा : कौरवसैन्याचा : ॥१३॥
रथानें रथ हाणे : घे घे पुढिलाते म्हणे : ऐसे दळ संहारुन : कौरवचे देखा : ॥१४॥
वैराटे द्दपद मार केले : दुष्टद्युम्ने संव्हारीले : मग पाचारीले : सुर्योनंदना : ॥१५॥
तोही खडतर बानी हानीतला : कर्ना जीव्हारी खोचला : मग भीम काय करीता जाला : ते आवोधारा राया : ॥१६॥
गदा घेउनि करी : धाविनला कर्णावरी : वारु मारीले च्यांर्‍ही : आनि सारथि पाडीला । ॥१७॥
तो वीरथि जाला : आणिके रथासि गेला : तव तेथें पावला : सुभट अस्वस्थामा : ॥१८॥
द्रुपद आणि वैराट : सैन्यासि भेवंडिला आट : तेथ पावोला सुभट : आस्वस्थामा ॥१९॥
तो बाण वर्शत : त्या विराते पाचांरीत : ते तो देखे पार्थ : सींहनादें गर्जत : ॥२०॥
पार्थे बाणी वरुशे : त्यामाजी आस्वस्थामा न दीसें : मग कर्ण द्रोण सरीशे : उठावले : ॥२१॥
तेथें रणकंदन जालें : मग अस्वस्थामयातें सोडवीलें : तवं भीमसेने संव्हारीलें : कुंजरातें : ॥२२॥
हस्ति धरुनि चरणी : येकात टाकि गगनी : येंक  आपटी धरणी : आला लोटुनि पार्थापासी : ॥२३॥
वैराट द्रुपदासि तेथें वेढिलें : त्यासि भीमे सोडवीले : रणी आणिक वीर मारीले : असंक्षात ॥२४॥
द्दष्टद्युम्रें वेढिला होता : तो जाला येता : मग पार्थ जाला नीगता : भेदि चक्रवीहुते ॥२५॥
दुर्योधन होता तेथें : तेणे देखीले पार्थाते : तो तेथुनी पळत : तयाते देखोनियां ॥२६॥
त्यातें पार्थे म्हणे : राहे राहे जासि झणे : म्हणों हाण हाणे सत्राणें : साता बाणी ॥२७॥
च्यार्‍ही चहुं वारुवासी : ऐक भेदला सारथीयासी : दोन भेदले गांधारासी : तेणे तयासी मुर्छना आली ॥२८॥
तव कर्ण द्रोण आले : दुर्योधनासी पाठीसी घातले : मग काय करीते जाले : भीम आर्जुन : ॥२९॥
कर्णा आणि द्रोणासी : संग्राम जाला अर्जुनासी : ते सांगेन परिऐसी : माहा दारुण : ॥३०॥
ते वेळी वरकोदरु : धाविनला वेगवत्तरु : उचलीला रहवरु : कर्णवीराचा ॥३१॥
रथ धरीला मकरतोंडी : वेढे च्यार्‍ही भोवंडी : तवं कर्णे घातली उडी : रथाखालुती : ॥३२॥
रथ भुमिसी आपटी : तो वीर जगजेठी : तव द्रोणे शरदाटी : केळी देखा : ॥३३॥
ते देखीले पार्थे : घातलें सरजाळाते : भीम हाणे द्रोणातें ॥ गदाघातें : ॥३४॥
भीम हाणे जाणौनी : द्रोण गेला रथ सांडोनी : सारथी वारु मारूनी : भीम परतला : ॥३५॥
तव तो पार्थ : सरजाळि वरूषत : सैन्ये संव्हारी बहुत : कौरवांचे : ॥३६॥
थोर उठावला दळभारू : भोवतें शस्त्रेराचा पुरकलोळ : बानी खीलीले सकळ : तीये वेळी ॥३७॥
तव हाहाकार जाला : भीम सींहीनाद गर्जला : भुभुकार केला : पवनपुत्रें ॥३८॥
संख स्फुरला देवदत्त : ब्रह्मादिक कापत : थोर जाला अकांत : कौरवासी ॥३९॥
ते वेळी कृपाचार्याचा वीहु भेदीला : कौरवभार मोडिला : मग पळ सुटला : माहावीरासी : ॥४०॥
कर्ण आणि द्रोण : गेले सकटविहु टाकुन : दारवटा बळकाउन : वीर राहीले ॥४१॥
आस्वस्थामा कृतवर्मा : दुस्वाशान सुसर्मा : बहुत वीराचा सामा : दारवठा राहीला ॥४२॥
सैल्य सोमदत्त : भुरीस्रवा भगदत्त : ऐसा मेळवा बहुत : राहीला आसे ॥४३॥
अणीक नामनीके वीर : तेथें राहीले आपार : माहाकाळाचे जुंझार : भज भारी राहीले ॥४४॥
दळ सात क्षेवणी : जाण राहीले बळकाऊनी : तवं पंडुनंदन : संधान करी ॥४५॥
आर्जुनाचे बाण : अती तीखटे दारूण : बहुत पाडिले रण : कौरवांचे ॥४६॥
हाका देती वीक्राळी : येकाहुनी येक बळी : भीमसेन तीये वेळी : रथाखाली उतरला : ॥४७॥
गदा घेऊनी वेगी आला आत : मीसळला सैन्यांत : शस्त्री खोचला बहुत : मग पार्थ सोडवीला : ॥४८॥
भीम गदाघाते : संव्हारी त्या दळाते : त्यासि वेढिल बहुते : शस्त्रें वर्शताती : ॥४९॥
तेथें अर्जुन आला टाकुनी : सोडविलें भीमालागुनी : संकटवीहु भेदुनी : वाट केली भीतरी : ॥५०॥
तो आर्जुन येकला : संकटवीहुमाजि गेला : शस्त्राचा पुर वर्शला : कर्ण द्रोण आश्वस्थामा : ॥५१॥
अणिक कौरव बहुत : तेही शस्त्रे वरुर्शत : त्या शस्त्राते तोडित : पार्थवीर ॥५२॥
शस्त्रजाळ वर्शति कैसे : त्यामाजि आर्जुन न दिसे : सुर्यबींब झाकुळे जैसे : आभ्रामाझी ॥५३॥
शस्त्राशस्त्री घनदाट : वीर वर्सती सुभट : गगनी नाहीं वाट : वारीयासी ॥५४॥
प्रजन्यधारा कल्पांती : जैसे मेघ वर्सती : तैसे कौरव हाणीती : आर्जुनासी : ॥५५॥
तयाचि शस्त्रे तोडित : तो पंडुचा सुत : आणी दळ संव्हारीत : कौरवाचे ॥५६॥
बापु धनुर्धर जगजेठी : येकला बहुताते दाटी : वीर नींघत कपाटी : दाही दीशा ॥५७॥
बहुत पाडिले रणी : आसुध वाहे धरणी : मग कर्ण द्रोणे करणी : काय केली : ॥५८॥
न नागवे हा सुभट : सैन्या भवंडिला आट : आता चहुकुणी करु दाट : आर्जुनासी ॥५९॥
येव्हडा वेग नाही मना : आर्जुनाचिया संधाना : तेही पंडुचीया नंदना : वेढिले चहुकुणी ॥६०॥
हे चवघे धनुर्धर ॥ सस्त्रे हाणीती आती आपार : ते कौरववीर : हाणती पार्थासी : ॥६१॥
द्रोण कर्ण आस्वस्थामा : चौघे वीर कृतवर्मा : हे वीर आर्जुना : हाणते जाले ॥६२॥
बाणी भरले अंबर : सींहुनाद गर्जती वीर : बाण न माती धरणीवर : तीऐ वेळीं देखा ॥६३॥
च्यार्‍ही चहुवारुवासि : येक भेदला सारथीयासी : दोन लागले तयासी : वक्षस्थळी : ॥६४॥
आर्जुनाच्या बाणी : कृतवर्मा पाडिला रणी : मग कर्णाद्रोणालागोनी : सुटला पळ ॥६५॥
तव हाहाकार जाला : कौरववोसर मोडला : तवं दीवस उरला : पाहार येक ॥६६॥
देव म्हणे पार्थासी : उदक द्या वारूसी : त्रुस्या लागली सैन्यासी : उदक दीधले पाहीजे ॥६७॥
मग बाण लावीला गुणी ॥ आणीली भोगावती मेदनी : उदकाचे कल्लोळ नीगती रणी : मग उदक घेतले ॥६८॥
उदक सकळी घेतली : मग हो माहानदी प्रवर्तली : रणी द्रोणगुरू : ध्वजस्तंबि भुभुकारू : करी हनुमंत ॥७०॥
संख स्फुरीला देवोदत्त : मग बोले पार्थ : द्रोणाते असे म्हणत : साहे मात : ॥७१॥
तुम्हीं लपविला जईद्रथ : आता करीन नीर्धात : नाहि तरी नीपात : करीन समस्तांचा ॥७२॥
जईद्रथाकारणे : का जाता प्राणे : ऐसे म्हणौनि हाणे शस्त्राने : आर्जुन तो ॥७३॥
मग आणीक बाण घातले : ते कर्णे तोडीले : पार्थे त्याते म्हणतीले : आपुले वळ ना वीचारसी : ॥७४॥
मग कोपला पार्थ : हाणीतीले कर्णाते : मारीले सारथीयाते : त्या समई ॥७५॥
तो वीरथी जाला : आणीका रथासि गेला : तव द्रोण हाणीतला : आमीत्ये बाणी ॥७६॥
ते बाण तोडीले : तवं अस्वस्थाम्याने हाणीतले : द्रोणे संधान केले : ते वेळी पाहा ॥७७॥
मग बाण घातले कर्णे : पार्थ तोडी संधाने : आता सुचीकावीहु भेदणे : ते सांगैल कवि कृष्ण पंडीते ॥७८॥
तीन चक्रवीहु भेदुन : पार्थ गेला तीही तडाकुन : चौथा चक्रवीहुचें भेदन : ते आईक श्रुत ॥ प्रसंग चवथा ॥४॥ ॥छ॥ ॥छ॥ ॥छ॥
श्री सारस्वतीयेन्मा : श्रीगुरूभ्येयन्मा :

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP