मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|अध्यात्मपर पदे| भाग १ अध्यात्मपर पदे भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ अध्यात्मपर पदे - भाग १ श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे Tags : gathasamarthaगाथासमर्थ भाग १ Translation - भाषांतर १५४६( राग-असावरी; ताल-तेवरा; चाल-प्रगट निरंजन० )तगत नाहीं तगत नाहीं तगत नाहीं कांहीं । तगणार एक देव निरंजन तेथें चि अनन्य रांहीं ॥ध्रु०॥नाना राजे भाग्यें विराजे वैमव साजे मोठें । संपत्ति विपत्ति दों दिवसांची सकळहि माइक खोटें ॥१॥तारुण्य़ लावाण्य रूप मनोहर सुंदर सुखकरिता हे । शेवट नासे वाईट दिसे अंतीं सकळ राहे ॥२॥माइक माया सांडुनि थाया सद्दढ धरिं रघुराया । दास म्हणे सुख सकळ पावसी साधन थोर उपाया ॥३॥१५४७( राग-कल्याण; ताल-दीपचंदी ; चाल-अरे नर० )अरे कर सारविचार कसा ॥ध्रु०॥क्षीर नीर एक हंस निवडिती । काय कळे वायसां ॥१॥माया ब्रह्म एक संता जाणती । सारांश घेती तसा ॥२॥दास म्हणे वंद्य वेगळें । कर्मानुसार ठसा ॥३॥१५४८( राग-छायालगत्वखमाज; ताल-धुमाळी )गुणकाया रे मूळमाया रे । सकळ जनांसि भजाया रे ॥ध्रु०॥जीवेंभावें रे बहु नांवें रे । परि आणिक नाहीं परावें रे ॥१॥जीवतंतु रे मूळतंतू रे । त्याहूनि भिन्न अनंतु रे ॥२॥धन्य धन्यु रे अन्ये अन्यु रे । दास म्हणे मुनिमान्यू रे ॥३॥१५४९( रागा-काफी; ताल-दीपचंदी; चाल-राजी राखो० )सकळ पद मायिक आहे । एक निरंजन पाहे ॥धु०॥चंचळ ते चळ जातें पळपळ । जाइल सर्व न राहे ॥१॥इंद्रपदादिक राज्यपदेंहि । निर्गुण संग न साहे ॥२॥दास म्हणे रचत खचताहे । पुसत जा सज्जना रे ॥३॥१५५०( रग-केदार; ताल-त्निताल. )द्दढ धरिलासी विश्वासें । आतां करिसी कैसें ॥ध्रु०॥मिथ्या माईक जीवित । कळलें तुझें मत ॥१॥द्दश्य विपरीत भावना । मी कां आणीन मना ॥२॥माया लाविली माईक । ठकिले बहुत लोक ॥३॥माझी माया त्वां मारिली । जीवा हाणी केली ॥४॥करीन देवपणाचा नास । तरीच रामदास ॥५॥१५५१( राग-कल्याण; ताल-दीपचंदी; चाल-अरे नर सार० )सकळ भय लागलें चंचळीं ॥ध्रु०॥उत्पत्ति स्थिति संहारत आहे । वैलोक्य तेंहि न राहे ॥१॥जें जें उमारेल तें तें संहारेल । होईल जाईल रे ॥२॥दास म्हणे जनीं आत्मनिवेदनीं । अनन्य हो निश्चळीं ॥३॥१५५२( चाल-धर्म जागो० )सा तें काय बापा । व्यर्थ कापिसी लाफा ॥ प्रचित पुसो जातां । कां रे देतोसी धापा ॥ध्रु०॥संसारा सार नाहीं । देह असार पाहीं ॥ वैमव स्थिर नाहीं ॥ कोणी सवें येत नाहीं ॥१॥पृथ्वी जाते आप जातें । तेज जातें वारें जातें ॥ अंतरात्मा तेंही जातें । द्दश्य द्दश्यातें खातें ॥२॥चंचळ तें चळत आहे । निश्चळ तें स्थिर राहे ॥ दास म्हणें बरें पाहें । संग निःसंगा न साहे ॥३॥१५५३( राग-असावरी; ताल-तेवरा; चाल-धन्य हरी जन० )सुटत नाहीं सुटत नाहीं सुटत नाहीं माया ॥धु०॥पाहों जातां सत्य असेना मानस घेतें थाया । दिसतसे परी सत्य न राहे पंचभूतिक काय ॥१॥होइल तें मग जाइला शेवट खटपट व्यर्थचि वायां । रामदास म्हणे सत्य निरंजन विरहित मायिक माया ॥२॥१५५४ ( रागा-श्रीराग; ताल-दादरा; चाल-हर हर० )चंचळ दामिनी । रम्य आठवे मनीं । झक पडे नयनीं । जाय निघोनी ॥१॥तरंग निवळ । करी नळ नळ । रूप पाहतां कोमळ । फुटे तत्काळ ॥२॥दास म्हणे स्वप्र । तेथें रिझें मन । तुटे समाधान । होतां पूर्ण ॥३॥१५५५( चाल-श्रीराग; ताल-दादरा; चाल-हर हर० )गडे हो सर्व संग दुरि तुम्ही करा । माझी संगति द्दढ घरा । येथा तडवेल तोचि खरा । येरां पडेल लोम घसरा ॥ध्रु०॥तुम्हीं जितेंचि मरोनि पहा । मग अमर होउनि रहा । याहि वेगळें नसोनि आहां । मग हाहि बोल न साहा रे ॥१॥मी बोलतों कोण्या भावें । येथें मन बहु घालावें । आजि पाहिल्या ठाया जावें । अन्न देहबुद्धि चट खावें ॥२॥माया यमुनेचा पैलपार । तेथे स्थळ सुरवाडिक फार । जरि मघेंचि डगमगाल । तरी हे भ्रमपुरीं वाहवाल ॥३॥पोहों जाणेल तों बुडी मारा । परी मुख्य तोंड गच्च घरा। वाढवेळ घरिताम थारा । तुम्ही अंतराल निज घरा ॥४॥रामदासाचा निज गडी । तो पात्नवितो पैलथडी । तो देतो विवेक सांगडी । तो मारूं देत नाहीं बुडी ॥५॥१५५६( राग-कानडा; ताल-दीपचंदी )समज दे देवदेवा । करिन मी सर्व सेवा ॥ध्रु०॥बहुरूपीं मन तल्लिन जालें । अंतर तें चुकलें ॥१॥अंतररूपीं अनंत लीळा । नेणें विघी कमळा ॥२॥समजल्यावरि भक्त चि होणें । उत्तम तें लक्षणें ॥३॥१५५७( रग-असावरी; ताल-तेवरा; चाल-धन्य-धन्य हरीजन० )कळत नाहीं कळत नाहीं कळत नाहीं लीळा || येणें सायासें हें अनयासें होतें जातें अवलीळा ॥ध्रु०॥भूगोळ केला गुप्तचि जाला पाहतां दीसत नाहीं । जेणॆं केलें ते दीसत जातें त्यास विवंचून पाहीं ॥१॥ढोवळा ज्ञाने ढोवळ ज्ञानें देव केंवी दिसताहे । सूक्ष्म द्दष्टी करून पाहे तरी कांहीं एक लाहे ॥२॥दास म्हणे रे झाड ढोवळें बीज तें मूक्ष्मरूपी । तैसाचि कर्ता सूक्ष्म आहे कांहीं एक सत्यस्वरूपी ॥३॥१५५८( चाल=धर्म जागो० )सारासार विचारावें । काय असार त्यागावें । सार तें काय घ्यावें । खरें करून द्यावें ॥ध्रु०॥पिंडींचे देह चारी । ब्रह्मांडींचे देह चारी । अष्ट देह निरसितां । अवघी होते बोहरी ॥१॥दिसतें तें नासतें । सद्य प्रचिती येते । उपजतें तें मरतें । सर्व होतें आणि जातें ॥२॥दास म्हणे अचळ । तेथें नाहीं चंचळ । परब्रह्म तें निश्चळ । सार तेंचि केवळ ॥३॥१५५९( राग-सिंधाकाफी; ताल=धुमाळी; चाल-अलभ्याचा हा लाम० )वेघु मज लागलासे मनीं । निरुपणीं श्रवणमननीं । अखंडित हेत जनीं वनीं । जनवन नाढळे विजनीं ॥ध्रु०॥सारासार विचार पाहणें । सार तेंचि वळखोनि राहणें । दुरीपरी ते जवळीं च लाहणें । सुखदु:खें विवेकें साहणें ॥१॥एकलाचि सर्व करीतसे । दुजा येथें पाहतां न दिसे । पुरावीण पुरुष तें कैसें । आम्ही कोण पहाना आमासें ॥२॥दास म्हणे ओळखितां बरें । यथातथ्य सांगतों मी खरें । हरीविण कोण रे दुसरें । निवेदनीं निर्गुणीं वास रे ॥३॥१५६०( राग-कल्याण ; ताल-दीपचंदी; चाल-अरे नर० )बहु जन स्वप्रमरें भरलें । कैसेंनि उद्धरलें ॥ध्रु०॥जागेपणाहुनि दुल्लभ जालें । नेणों कांहीं लाधलें ॥१॥जागें होतां व्यार्थचि गेलें प्राणी ह्ळु पडिलें ॥२॥दास म्हणे तैसें सकळ कांहीं । जाणतिय हरिलें ॥३॥ N/A References : N/A Last Updated : May 20, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP