श्रीकेशवस्वामी - भाग २८

केशवस्वामींनी मनोभावेंकरून आपल्या कार्यातून हिंदू जनतेस त्यांच्या ठिकाणी आपला धर्म, आपला देश, आपली संस्कृती, आपली भाषा इत्यादिकांसंबंधी जागॄत केले.


सकळ संतसमुच्चय मंडण । अखिळ संशयकारण खंडण ॥

अमळ बोध धनोदय भास्वता । नमो नमोजी नमो निजशाश्र्वता ॥१॥

सुखाचा विभागीच हा लोक पाही । तरी त्या विभागासी नेघेचि कांहीं ॥

महामुक्त होवोनि संसार भोगी । महाराज कैसा म्हणे मी अभागी ॥२॥

सुखें बैसला तो भ्रमे देश नाना । तसें आत्मयालागिं हे जन्म जाणा ॥

असे नेणती जन्म त्याचा वृथा कीं । वृथा दाविती व्युत्पतीची पृथा कीं ॥३॥

गुरु मीचि हें सर्वथा मानती हो । गुरु अद्वयानंद ते नेणती हो ॥४॥

असोनियां सर्व जनांत पाहीं । जनांत हा वास जयास नाहीं ॥

जनांत तो सर्व जनांत जाला । अनंत हे बोलति वेद त्याला ॥५॥

समागमें संग हरूनि नेतो । अपार हा आत्मप्रकाश देतो ॥

तो सद्गुरु-देव-हिरण्यरेता । विलोकितां भस्म भवादि चिंता ॥६॥

काळासि जो भस्म करूनि टाकी । सूर्यादिकां आत्मप्रभेंचि झांकी ॥

तो अंतरीं राम हिरण्य-रेता । म्यां झांकिला संतदया न होतां ॥७॥

देतील जे पूर्ण अनंतदीक्षा । त्याचे ० पदीं चित्त निवांत रक्षा ॥

घेवोनियां तत्त्वविचार-भिक्षा । अलक्ष मी केवळ हेंचि लक्षा ॥८॥

विश्रांति जो पूर्ण शुकादिकांची । जो माउली मुख्य चतुर्मुखाची ॥

हरी-हरा वंद्य विभूति ज्याची । मी लाधलों सर्व दया तयाची ॥९॥

श्रुतीं गायिला जो मुनीं ध्यायिला जो । बळी भूवनीं सर्वदा राहिला जो ॥

महासंकटीं द्रौ० पदी बाहिला जो । गुरुकृपेनें केशवीं पाहिला जो ॥१०॥

कळेना तपें जें व्रतें आकळेना । परातीत पैं साधनें वीवळेना ॥

महद्रूप तें दाविलें पूर्ण मातें । कसें वीसरावें तया सज्जनातें ॥११॥

भवांतका चित्सुख-दायकाची । उपासना सद्गुरु-नायकाची ॥

भावें तुम्ही सर्व भूतीं करा हो । अपार हे दुःख-नदी तरा हो ॥१२॥

मनमुळीं दृढ राघव संचला । जन करीं असतां दुरि वंचला ॥

कवण चालक हें न विचारिती । निगमवाक्य न मानुनि शीणती ॥१३॥

दया क्षमा वस्य जयासि होती । अवश्य ते मोक्ष० पदासि येती ॥

घेती सदा अक्षर सार गोडी । त्याचे करी पावनपाद जोडी ॥१४॥

रामचंद्र हृदयांबरवासी । प्रेमयुक्त भजशी तरि त्याशीं ॥

नित्य मुक्त० पद पावशि तेणें । गर्भवास न घडे मग घेणें ॥१५॥

रमाकांत येकांत साधूनि सेवा । ० पदीं चित्त निर्वात वेधूनि ठेवा ॥

अती शांत होउनि विश्रांति पावा । तुम्ही सर्वथा गर्भवेथा न पावा ॥१६॥

साधू-दया-पान सदा करा जा । ह१त्पंकजीं बोध-रवी धरा जा ॥

वेगीं वराजा निज-रामराजा । पादारविंदीं बरवे विराजा ॥१७॥

भवजाळिं पडलों मी गांजलों दुर्भरानें । त्रिगुण खळखळाटें लोटलों गोपुरानें ॥

सुखघन गुरु तेव्हां बाहिले आदरानें । धरुनि कर करानें तारिलें शंकरानें ॥१८॥

सुखघन गुरु मातें काय येउनि बोले । परम विमल ज्ञानें लोक म्यां मुक्त केले ॥

म्हणवुनि पद माझे वंदि सत्पुत्रराया । तरि तव ० पदवासी होय विश्रांति-जाया ॥

विषय-वमन त्यागी सर्वसंगी विरागी । कवळुनि हरिलागीं तो असे सानुरागी ॥

म्हणवुनि तनु भागा नातळे सर्वदा गा । करुनि त्रिविध यागा पावला चित्प्रयागा ।

करुनियां प्रेम-प्रदक्षिणा रे । अलक्ष तूं होय सुलक्षणा रे ॥२१॥

म्यां साधुचा आजि दुमाल केला । गळूनियां चित्त रुमाल गेला ॥

हे घातली माय उडीच तेथें । क्षरा-क्षरालागिं अभाव जेथें ॥२२॥

जेथें नसे भाव-अभाव कांहीं । जयासि हा नेमक ठाव नाही ॥

तया ० पदा संत बळेंचि गेले । अनंत हे वेद तयास बोले ॥२३॥

श्रुति म्हणे हरि तो परवाचा । लोक त्यासि म्हणती परवाचा ॥

याचिलागिं पडती भवजाळीं । शीघ्र त्यासि दुरि नेउनि जाळीं ॥२४॥

म्यां साधुचा केवळ संग केला । गळोनियां द्वैत-प्रसंग गेला ॥

जालों घनानंद मुकुंद वेगीं । बोले कवी केशवराज योगी ॥२५॥

सुखसागरीची लहरी असे मी । जगत्रयामाजि असतां नसे मी ॥

ममता न जाणे समता न जाणे । रमता स्वबोधें रमणीय नेणें ॥२६॥

नित्य संतचरणीं स्थिर राहों । तत्त्वबोध तरणीमय लाहो ॥

पूर्ण सर्व करणीं हरि पाहों । ब्रह्मभूत धरणीवरि आहों ॥२७॥

गुरुभक्तिचें प्रेम हें वीवळेना । महत्सौख्य तें सर्वदा आकळेना ॥

गुणातीत चिन्मात्र ऐसें कळेना । तया सर्वथा मोक्षवल्ली फळेना ॥२८॥

कर्मपाश हरुनी स्थिर होती । शास्त्रगर्भ धरुनी सुख घेती ॥

आत्मसंग धरुनी तरले ते । पूर्ण संत हृदयीं भरले ते ॥२९॥

क्षणभरी भजतां शिवराव रे । अणुभरी न दिसे तनुभाव रे ॥

मन गळे वितुळे भव-मंडळीं । निज० पदीं रमतो कवि तो बळी ॥३०॥

अमळ केपध्ह चिद्धन पाहतो । मतिविणा स्व० पदीं स्थिर राहतो ॥

नर नव्हे निज ईश्र्वर तो सये । किती वदूं महिमा वदतां न ये ॥३१॥

मृगमदतिलकाचा कोण हा चौभुजाचा । रतिपति मदनाचा नाथ लोकत्रयाचा ॥

मुकुटमणि सुरांचा सिंधु सर्वागुणांचा । हृदयहरुनिजांचा नेणवे अंत याचा ॥३२॥

गुरु० पदिं विनटाना कामसंगें विटाना । भवतरु निवटाना चित्त प्रेमें विटाना ॥

श्रुति मुळिं झगटाना राम आजी लुटाना । परतरि लिगटान कोटि जन्में।

सुटाना जरि कळे हरि केवळ माय । तरि लया ममता-मळ जाय ॥

मग गळै वितुळे भव-माया । सुखवधू मग होईल काया ॥३४॥

म्यां देखिले संत अपारकोटी । माझा सये स्वामि सुकाळ सेटी ॥

करूनियां वृष्टि सुखार्णवाची । केली सदा भेटि सदाशिवाची ॥३५॥

सत्संगतीं निर्द्वय पूर्ण जालों । ब्रह्मांड जाळूनि म्यां सर्व आलों ॥

माझीच म्यां केवळ राख केली । ते राखही आज उडोनि गेली ॥३६॥

संसार-दुःख हरणाप्रति शीघ्र आलों । वाक्यार्थ-चंद्र हृदयीं धरुनी निवालों ॥

जालों सदा परम निश्र्चळ आत्मयोगें । गेला लया त्रिविध मायिक शोक वेगें ।

संसार-ताप-शमना नमनार्थ आलों । वंदूनि पादकमळां तव दास जालों ॥

देउनि बोध बरवा निज देव दावी । ठेवुनि नित्य ० पदवी स्वसुखें बुझावी ॥३८॥

विलोकितां मूर्ति रमाधवाची । अरायणा वृत्ति कधीं जयाची ॥

पवित्र तो ज्ञानस्वरूप साधू । आराधितां सर्व भयासि बाधू ॥३९॥

प्रभाकराचा करही न पावे । न पावतां मारुतही स्थिरावे ॥

तया ० पदा संत समर्थ गेले । न बोलतां वेद विनोद बोले ॥४०॥

हा देह झाला नभ-चित्र ज्यासी । श्रुती म्हणे पूर्ण पवित्र त्यासी ॥

विचित्र हे सर्वही लोक पाहे । त्याची कथा ब्रह्मचरित्र आहे ॥४१॥

नारायणीं कां मन रंगवाना । पुनः पुन्हा काय भवासि वाना ॥

नाना-विद्या-दुःख हरावयासी । करा हरी मानस-क्षेत्रवासी ॥४२॥

घेऊनियां कृष्ण कडेसि वेगें । कडे पडे केवळ सानुरागें ॥

ते माउली गोकुळ नायकाची । विलोकितां प्राप्ति घडे सुखाची ॥४३॥

जो वाचवी सुस्वर बोध-पांवा । श्रुती म्हणे शीघ्र तयासि पावा ॥

तो कृष्णजी आजि बरा जपावां । तेणें तुम्ळी शोक कदां न पावा ॥४४॥

हटेंचि आम्हांसि प्रसन्न होशी । हटेंचि देशी निज-आठवाशी ॥

ऐसा हटी तूं गुरु देवराया । हटेंचि नेलें स्व० पदा वराया ॥४५॥

लेवूनियां चिन्मय-रत्न कानीं । मी बैसलों या ममता दुकानीं ॥

दिसे तरी रे सम ब्रह्म डोळा । होतों सुखी मी बहु वेळुवेळां ॥४६॥

उमापती आणि रमापती हो । निष्काम-योगें सम भासती हो ॥

यालागि नेणें अणु भेदभावा । जाला जगीं एक महेश ठावा ॥४७॥

शरण सकळभावें तूज आलों मुकुंदा । भवभय दुरि वारी सच्चिदानंद-कंदा ॥

कवळुनि भुजदंडीं पूंस माझें विखंडी । जवळुनि जगदीशा वेगळा तूं न सांडी ॥

निष्कामचक्र बरवें धरुनी करी रे । संसारचक्र श्रवणें, मननें हरी रे ॥

चिन्मात्रचंद्र हरि हा हृदयीं धरी रे । स्वाराज्य पूर्ण जगतीतळिं या करी रे ॥४९॥

साधूमुखें नित्य विचार केला । तेणें सये सर्व विकार गेला ॥

याकारणें पूर्ण आरोग्य जालों । वंदूं किती पाददळीं निवालों ॥५०॥

भवार्णवीं या सुखें तराया । मी लागलों सद्गुरुनाथ पायां ॥

तेणें सये वो बरवा निवालों । चिद्व्योमिचा मी निजचंद्र जालों ॥५१॥

जें पंचक्रोशाहुनिया निराळें । तें सर्व कर्णीं अति शीघ्र ल्यालें ॥

यालागि जाला निजलाभ मोठा । आला सये चिद्धनराम पोटा ॥५२॥

करूनियां सर्व विकार रक्षा । निज निर्विकारी असेचि लक्षा ॥

लक्षौंश मी केवळ हे परीक्षा । या घ्या तुम्ही केशवराज दीक्षा ॥५३॥

जगलोचनीं वेंचुनि लोचनासी । प्रकाशिलें पूर्ण भवलोचनासी ॥

विलोकितां त्या सम-लोचनासी । न पडे कदा हो जग लोचनासी ॥५४॥

चिदानंद गोविंद सेजेशि येना । अनिर्वाच्य कीं अंतरीं क्षेम दे ना ॥

परंधामिं आम्हांसि जितांचि ने ना । किती पालवूं शीणलों बोलवेना ॥५५॥

तुम्ही दयाळा मज वांचवा हो । विश्रांतिधामा नित सांठवा हो ॥

भवदुःखबाधा कदा न बाधी । घडे चिदानंद-० पदीं समाधी ॥५६॥

देहबुद्धि हरुनिया परता गे । सुखघना वरुनियां वरुता गे ॥५७॥

दया सद्गुरुची जया पूर्ण बाणे । मरीच्या जळा-सारखें विश्र्व जाणे ॥

म्हणोनी तया भेदक्रीया असेना । मनीं लक्षितां दृश्य डोळां दिसेना ॥५८॥

साधूमुखें राम निजआप्त केला । काळत्रयीं काम अतिदूर ठेला ॥

जीतां जीवीं भेद-भुजंग मेला । सच्चिद्धनीं पूर्ण कवी निजेला ॥५९॥

गुरुदया फळ जया अनयासी । शिवमय जगत्त्रय कळे त्यासी ॥

सुखघ्ज्ञनीं अति निश्र्चळ तो असे । क्षणभरी भजलियां अघ ना वसे ॥६०॥

अंगवात मुनिचा जरि लागे । चित्त आत्मश्रवणीं तरि जागे ॥

शून्य होय ममता मन रोधे । सर्व दुःख निरसे समबोधें ॥८६॥

प्रकाशुनी मंगळरूप वस्तू । करी सदा सर्व भयासि अस्तू ॥

ते सद्गुरु चिन्मय-चंद्रमा हो । क्षणाक्षणा आत्मसुखें नमा हो ॥८७॥

विशेष माया ममता लई हो । जे तिष्ठती सज्जन आलयीं हो ॥

ते ग्रासिती शोक क्षया-विरामा । विलोकिती मंगळधाम रामा ॥८८॥

शुभकथा करुनी हरीची सदा । कवळुनी असती हरिच्या ० पदा ॥

म्हणवुनी बरवी मुनिची सभा । निरखितां प्रगटे सम चित्प्रभा ॥८९॥

मन विरे जंव चिद्धनसागरीं । तंववरी अति मज्जन तूं करीं ॥

तरि सरे भवबंधन-यातना । निजसुखें निवशी मग सज्जना ॥९०॥

यथार्थ जे आत्म० पदासि गेले । ते संत म्यां प्राणसखेचि केले ॥

यालागिं मीं केवळ ब्रह्म जालों । क्षणाक्षणा तें गुज काय बोलों ॥९१॥

विलोकिता नंदकुमार-पायां । गेला सये सर्व कुमार वांया ॥

हें गर्जती सारश्रुती कुमारी । अथवा विबोधें तरणी कुमारी ॥९२॥

सोडुनि माया-मय गोमयासी । विचारिलें नित्य निरामयासी ॥

यालागिं मी शोकभयासि नेणें । जालें निजानंद० पदासि येणें ॥९३॥

ज्याहुनि तों आणिक जोडि नाहीं । तो जोडिला राघव नित्य पाही ॥

त्याची करी पावन पादजोडी । घेसी सदा अक्षर सार गोडी ॥९४॥

ज्याचें अतीपावन वाक्य मोठें । हृत्पंकजीं रंध्र करील नेटें ॥

त्याचे ० पदीं वास करूनि राहें । विश्रांतिचे होशिल धाम पाहें ॥९५॥

प्रभा करी बोधरवी जयासी । महाकवी वेद म्हणे तयासी ॥

भवार्णवीं तारक तोचि पाहीं । त्यावेगळा आणिक देव नाही ॥९६॥

आत्माचि हा मीचि विचार केला । याकारणें सर्व विकार गेला ॥

यालागिं मी पावनरूप जालों । सच्चित्सुखें हो बरवा निवालों ॥९७॥

कळोनि बोलोनि गळोनि डोले । तो भेटतां दोष जळोनि गेले ॥

असें तसें त्यासि कसें म्हणावें । आत्माचि तो पूर्ण असे स्वभावें ॥९८॥

नित्यसंग करुनी हरिचा हो । सर्व शोक त्यजिला करिचा हो ॥

लोक वोक घरिचा दुरि केला । आत्मरूप कवि हा हरिखेला ॥९९॥

दयार्णवाच्या निजसार बोलें । सच्चित्प्रयत्नासि मुहूर्त केलें ॥

आलों सदोदीत आनंदठाया । यालागिं जाली नभपुष्प माया ॥१००॥

भवदया वदिजे किति बोलें । भवजळीं बुडतां भव केलें ॥

म्हणवुनी वदतों भव वाचें । मम क्रिया भव होउनि नाचे ॥१०१॥

मुनि जनीं भजि जें भवपाहीं । म्हणवुनी भव तयाप्रत नाहीं ॥

भवनिधी म्हणती श्रुति त्यासी । भवनदी तरती ० पदवासी ॥१०२॥

हरूनियां सर्वहि वासनेला । अत्यादरें सर्वहि वास नेला ॥

जाला क्षरी-अक्षर-धामवासी । त्याची दया तारक वासवासी ॥१०३॥

जाणोनियां कल्पितरूप वाचा । वाच्यार्थ मी केवळ हेंचि वाचा ॥

तेणें गुणें भेद रिपूं न ज्यांची । अखंड संप्राप्ति घडे अजाची ॥१०४॥

हरिकथा करितां मति रोधली । हरि० पदीं रमतां अति वेधली ॥

हरिसुखें भरली तरली भवीं । मिसळली मग केवळ केशवीं ॥१०५॥

सदा चिद्घनीं वृत्तिचा लोप केला । म्हणोनी सये साधुचा कोप गेला ॥

निमाला स्वयं पावला सत्० पदाशीं । अती वंद्य तो मोक्ष कैलासवासी ॥१०६॥

अचळ वढण केलें शांतिचें निश्र्चयासी । कठिण नखशरांचें मार संपूर्ण सोशी ॥

परम-विमळ योगी वर्णिला तोचि वेदें । अखिळ० पदिं विराजे सच्चिदानंद बोधें ॥१०७॥

तिळांजळी देउनि देहभावा । सच्चिद्धनीं पूर्ण केला रिघावा ॥

मी बद्ध ना मुक्त यथार्थ ऐसें । सकौतुकें हो बहु आजि हासे ॥१०८॥

भजन पंथ विचारें चालतां गोड वाटे । त्रिभुवन जनकासी चिंतितां प्रेम दाटे ॥

म्हणवुनि मन-गंगे लोट आला सुखाचा । नयनकमळद्वारें चालला पाट साचा ॥१०९॥

जो चिंतितां पावन सर्व दोषी । नव्हेचि तो देशिक एकदेशी ॥

घेशी निकें मंगळ नाम त्याचें । होसी सुखें अक्षरधाम साचे ॥११०॥

विवेक-इंद्रा हरि देवराया । प्रबोध - रुद्रा हरि सर्व माया ।

सच्चित्समुद्रा मज भेटि आतां । अनंतचंद्रा कर ठेवि माथां ॥१११॥

देऊनियां चित्सुखमाणिकाला । मागोंचि नेदी मज आणिकाला त्या ।

सेवितां सत्यप्रमाणिकाला । प्रमाण नाहीं मनादिकांला ॥११२॥

राहोनियां ज्ञ नसरोवरीं हो । महत्सुखें हंस क्रीड करी हो ॥

घेतो सदा निर्मळ मुक्त-चारा । देतो दिनाला मुनि शेष सारा ॥११३॥

संतुष्ट केलें मजपूर्ण जेणें । उत्तीर्ण त्याला गुणि केंवि होणें ॥

माझ्या सुखें मी मजलागिं नेणें । अपार हें दीनदयाळ देणें ॥११४॥

प्रकाशला राघव सर्व ठाईं । ठेवावया पाउल ठाव नाहीं ॥

यालागिं मी राम० पदींच नांदे । बोले कवी बोधरवी-प्रसादें ॥११५॥

प्रेमयुक्त करुनी मज राजी । तत्त्वसार गुरु सादर पाजी ॥

सर्वकाळ प्रगटे मजमाजी । याचलागिं मज पांचक बाजी ॥११६॥

कुमंडळीं लोक समस्त आहे । त्यामाजिं हा सज्जन देह राहे ॥

तरी नव्हे साच कुमंडळी तो । कुमंडळां मुक्त करी बळी तो ॥११७॥

त्रिभुवन-जनकाची मूर्ति मी पूर्ण आहें । म्हणवुनि रुप माझें सर्वदा मीच पाहे ॥

मजविण मज कांही दूसरें गुह्य नाहीं । कवि म्हणे दृढ माझें प्रेम माझ्याच ठायीं ॥११८॥

हृत्पंकजीं ठेवुनि साधकाला । मातापिता पूर्ण स्वयंचि जाला ॥

तो सद्गुरू भेटत नित्य ज्याला । भेटोचिना देह असोनि त्याला ॥११९॥

स्वबोधें जया बाणली आत्मदीक्षा । तया योगियाचे सदा शेष भक्षा ॥

अहर्नीश त्याचे मनीं पाय लक्षा । कवीराज ऐसी करी रामरक्षा ॥१२०॥

सांडूनियां वृत्ति कलत्र वेगीं । परांगना निर्भयरूप भोगी ॥

महासुखें भेद गिळोनी डोले । तो मस्करी वेद समर्थ बोले ॥१२१॥

पुत्रत्व त्यागोनि पिताचि झाला । कळत्र मातेसि करूनि ठेला ॥

त्या योगभ्रष्टासि कसें भजावें । भजेल तेणें तैसेचि व्हावें ॥१२२॥

अहेतुक सर्वदा जो ब्रह्मचारी । तयाच्या घरीं तिष्ठती चारि नारी ॥

दया-शांति-विश्रांति-सद्भक्ति बाळा । तिहीं लाविला संग या निष्कळाला ॥

चुडाला तथा देहुती आणि गार्गी । मईत्री जगी कर्कटी चिद्विभागी ॥

जगत्पावना मदलसा गोपवामा । तयाचीं ० पदें चिंतितां मोक्ष आम्हां ॥१२४॥

हरा शोक सेवूनियां शास्त्रसारा । करा नाश वेगीं भवा दुर्निवारा ॥

धरा इंदिरानाथ-पादाब्ज माथा । तरा घोर मायार्णवामाजि आतां ॥१२५॥

भगभग करितांही प्राप्ति नाहीं भगाची । तगतग अति वाढे सौख्यहर्ती जगाची ॥

परम विकळ होती नेणती पूर्वदत्ता । निजगति अविचारें मानिती व्यर्थ चिंता ॥

सदा अच्युतानंत चिंत्तींच बांधे । जगीं अक्षयानंद होउनी नांदे ॥

न बाधी कदा त्यासि माया उपाधी । उपाधीक हा त्यासि जाली समाधी ॥१२७॥

सदा आठवीतां रतीनाथपीता । सदा सेवितां शास्त्र-सारार्थ गीता ॥

सदा सत्० पदां सेवितां त्रुप्त होती । सदा चिंतितां देव हातींच देती ॥१२८॥

मिळोनियां चित्सुख-संगमासी । जे त्यागिती स्थावर-जंगमासी ॥

त्या जंगमा लागुनियां भजावें । या संगमापासुनि मुक्त व्हावें ॥१२९॥

ज्याकारणें तिष्ठति नाकवासी । जो साधितां हा भवसंगनाशी ॥

त्या संगमीं संगमरूप होशी । या चूकशी स्थावर जंगमासी ॥१३०॥

हे हस्त कीं हस्त जया नव्हे ती । हे पाद कीं ज्यास अपाद होती ॥

हा देहही ज्यास विदेह झाला । अदेह तो देह धरूनि आला ॥१३१॥

आले जरि सज्जन देहगांवा । घेती तरी ब्रह्म० पदीं विसांवा ॥

जाले स्वयं-चित्सुख-सार ते कीं । केलें तया मानव मूढ लोकीं ॥१३२॥

साधूसि जो मानवरूप पाहे । श्रुती म्हणे दानव तोचि आहे ॥

भोगी भवीं गौरव शोककारी । नेणें हरी चित्सुख निर्विकारी ॥१३३॥

अमळ मन करावें प्रेम रामीं धरावें । अखिल भय हरावें संतसंगीं तरावें ॥

परम० पद वरावें तत्त्वसारीं विरावें । मितुंपण विसरावें चित्सुखें वीचरावें ॥१३४॥

नये प्रार्थितां इंदिरा मंदिरासी । हरीचिंतनीं सर्वदा प्रीति ज्यासी ॥

अधस्वीत ज्याच्या घरीं नित्य जाली । हरीपाद० पद्मांसि तेणें मिळाली ॥१३५॥

मती साधुच्या पाद० पद्मीं अधस्वी । करी तो जगामाजि मोठा तपस्वी ॥

यशस्वी तयासारखा आन नाहीं । अतिक्रांतता पावला याच देहीं ॥१३६॥

भुतीं भावना पावला ईश्र्वराची । गती राहिली त्रीविधा मंदिराची ॥

अतीमुक्त तो पावला तृप्त जाला । जनीं वर्ततां आत्मसद्मासि आला ॥१३७॥

निर्वाह तो पूर्ण असेचि नाकीं । याकारणें कष्टविती मना कीं ॥

होणार तें अल्प चुकोचि ना कीं । वृथाचि कां ठेविति प्राण नाकीं ॥१३८॥

ज्याच्या भयें काम दिगंत सेवी । ज्याच्या ० पदीं शांत समस्त गोवी ॥

समर्थ ते संत अनाथ-बंधू । विलोकतां आटत शोकसिंधू ॥१३९॥

जयालागिं हा संग कांही न साहे । असंगा तया सर्वसंगीचि पाहे ॥

न बाधी कदा त्यासि संसार-बाधा । सदा पावला चित्० पदा निर्विवादा ॥१४०॥

सदा संचला पूर्ण ब्रह्मावबोधें । करी राज्य हें सर्वभूतीं अभेदें ॥

परब्रह्म तो मानवांमाजि जाला । तया चिंतिता मोक्ष हातासि आला ॥१४१॥

विमुक्तता साधुनि कर्म जाळी । महासुखें नांदति सर्वकाळीं ॥

वर्णाश्रमीं आश्रम शून्यकिर्ती । श्रीपाद ते वंदिती ब्रह्ममूर्ती ॥१४२॥

वर्णाश्रमीं आश्रम शून्य जाले । ते आश्रमा लागुनि संत धाले ॥

जाळें स्वयं-व्यापक ब्रह्म तेणें । अपार हें संत० पदाब्ज देणें ॥१४३॥

अहंभाव ग्रासुनि विज्ञानयोगें । भजा जानकीचा पती राम वेगें ॥

नका कल्पना वाढवूं मोह सोडा । सखा सर्वदा अच्युतानंत जोडा ॥१४४॥

सदा सच्चिदानंद डोहीं बुडाला । स्वबोधें नसे नांवरूपासि आला ॥

जगत्पावन देहकर्में तयाचीं । मुखें वर्णितां प्राप्ति महासुखाची ॥१४५॥

फुटे कुपीका कल्पना नाममात्रें । तया सद्गुरुची निजानंद स्तोत्रें ॥

क्षणार्धें पढे तो चढे मोक्षधामा । गुरुभक्तीचा नेणवे पार आम्हां ॥१४६॥

जडाजडीं राम दिसे जयाला । हा नाथिला भेद नसे तयाला ॥

नयौनी तो नामरूपासि आला । स्वयं-प्रकाशी म्हणती तयाला ॥१४७॥

संसार हा सम्यक सार आहे । असार हे मानिति लोक पाहे ॥

याकारणें जन्म अपार घेती । हें जाणती ते श्रुतिसार होती ॥१४८॥

अनुग्रहो पूर्ण करूनि मातें । प्रकाशिलें तत्त्व अनाथ-नाथें ॥

तेणेंचि मी तत्त्वस्वरूप जालों । अनाथ होउनि निवांत ठेलों ॥१४९॥

अनाथ हें नाम जयासि साजे । अनंत ते सज्जन नाथ माझे ॥

निवांत मी होउनि त्यांसि सेवीं । तों हारपे मीच अनंत देवीं ॥१५०॥

संसार हा सर्व हरावयासी । संसारनिष्ठाप्रति शीघ्र येसी ॥

संसार निर्दाळुनि निश्र्चयेसी । संसार तूं केवळ पूर्ण होशी ॥१५१॥

हृत्पंकजीं मंगळ दीप लावी । समग्र हें मगळसार दावी ॥

तो सद्गुरु मंगळमूर्ति पाहे । त्याचे ० पदीं मंगळरूप राहे ॥१५२॥

लावूनियां मंगळ दीप देहीं । देहीं सदा दाखविला विदेही ॥

त्या मंगलानंद महेशदेवा । हृत्पंकजी भेद हरूनि ठेवा ॥१५३॥

सदा सादरें बैसती संतपंक्ती । सदा अंतरीं लक्षती संतमूर्ती ॥

सदा सत्० पदीं पावती नित्य तृप्ती । सदानंद कीं तेचि संपूर्ण होती ॥१५४॥

विस्ताराला राम समस्त लोकीं । हें जाणिजे पावनरूप लोकीं ॥

तें सर्व लोकांहुनि कां निराळें । नसेत हे लोक तया निराळे ॥१५५॥

संपादुनी भूतदया मनीं हो । जे सेविती भूतपती जनीं हो ॥

ते नेणती मायिक भूतवादा । त्यांच्या मुखें जाइल भूतबाधा ॥१५६॥

महाकल्प गेले तरी तो न मोडे । असा दीर्घ संसार ज्याचेनि मोडे ॥

तया देशिका देवरायासि भावें । विना देशकाळें सदा आठवावें ॥१५७॥

कपाळीस जो आवडे सर्वकाळीं । तयाचीं ० पदें वंदिलीं म्यां कपाळीं ॥

म्हणोनी स्वयं मीच जालों कपाळी । कपाळी असोनी नव्हे भूतपाळी ॥१५८॥

सच्चिद्धनीं नित्य निवांत होती । ० पदो० पदीं आत्मसुखासि घेती ॥

श्रुती म्हणे तारक संग त्यांचा । जितांच या भंग करी भवाचा ॥१५९॥

स्वबोधेंचि हा वासना-भंग केला । जनीं वर्ततां संग सांडूनि गेला ॥

नसे कल्पना-कामिनीचा समंधू । परिव्राज तो अद्वयानंद-सिंधू ॥१६०॥

देऊनिया तारक वाक्य दीक्षा । बोधे करी पातककोटि रक्षा ॥

दावी घनानंदस्वरूप डोळां । तो आठवी सद्गुरु वेळुवेळां ॥१६१॥

संसार-बंदीहुनि सोडवीलें । सच्चित्सुखें केवळ तृप्त केलें ॥

तो आठवा नाथ अनाथ-बंधू । वाचस्पती अद्वयबोध-सिंधू ॥१६२॥

अपार हें पुण्य फळासि आलें । साधूकरीं पिंडप्रदान जालें ॥

गेलें लया पातक पंचघा हो । जालों सुखी आत्म० पदीं सदा हो ॥१६३॥

गुरु० पदीं मन सादर वाहा । जिवदशा हरुनी शिव पाहा ॥

निजसुखें अति निश्र्चळ राहा । मग कदा नलगे भवदाहा ॥१६४॥

विलोकितां सद्गुरुपाद-० पद्मां । येती दया-शांति मिळोनि सद्मा ॥

० पद्मा शिरीं पादसरोज वाहे । तो ० पद्मनाभीस मिळोनि राहे ॥१६५॥

विलोकितां पाय अपाय गेले । उपाय ते सर्वहि दूरि ठेले ॥

हें पावलें चित्त अचिंत ठायां । गेली लया पादजळींच माया ॥१६६॥

अकस्मात हा मंदिरा राम आला । मनोवृत्ति हें बैसणें पूर्ण धाला ॥

नका वेळ लावूं उठा शीघ्र आतां । जगन्नायकाचें धरा पाय माथां ॥१६७॥

सदा भारतीं चित्त ठेऊनि राहे । जनीं एकला भारती कांत पाहे ॥

म्हणे भारथी नेणवे अंत त्याचा । महाभारतीं वर्णिला तोचि साचा ॥१६८॥

शोधूनियां सर्वहि आगमातें । जे साधिती आत्मसमागमातें ॥

तें भेटलें आगमीं आजि मातें । मी पावलों केवळ चित्सुखातें ॥१६९॥

अत्यंत जो आरुढ होय कामा । त्रैलोक्य हें भासत त्यासि वामा ॥

तैसाचि जो आरुढ बोधवृक्षीं । अलक्ष तो सर्वही एकलक्षी ॥१७०॥

बसोनियां केवळ बोधवृक्षीं । त्रिकाळ जो आम्रफळासि भक्षी ॥

तेणें फळें साधकवृंद रक्षी । श्रुती म्हणे तारक तोचि पक्षी ॥१७१॥

पक्षांतरापासुनि मुक्त जाला । विपक्ष पक्षें बरवा उडाला ॥

तो सद्गुरु अद्वय रामपक्षी । स्वपक्ष देऊनि दिनासि रक्षी ॥१७२॥

देऊनियां बोध महेश दावी । महेश दावोनि समाधि लावी ॥

समाधिचें सार करूनि ठेवी । सभाग्य त्याचे ० पदरेणु सेवी ॥१७३॥

महेशासि सेवूनियां भेद भंगी । नव्हे कर्म संगीचि तो कर्मसंगी ॥

असंगी अभंगी अनंगी असे तो । असे तो नसे तो असा तो नसे तो ॥१७४॥

बरी भाकरी अंतरीं सर्वदा हो । हरी कल्पना पावती सत्० पदा हो ॥

गुणातीत जो अद्वयानंददाता । मनीं चिंतितां तत्त्व आलेंचि हाता ॥१७५॥

सर्वकाळ भजती गुरुनाथा । त्यासि नम्र करि शंकर माथा ॥

पादपांसु अतिवंदित धाता । वेद वर्णित कथामृत-गाथा ॥१७६॥

सर्वकाळ जपतां हरिनामा । सर्वकाळ फळला हरि आम्हा ॥

सर्वकाळ हरिचे ० पद लाहो । सर्वकाळ हरि होउनि आहों ॥१७७॥

सर्वकाळ रमतां हरिसंगीं । रंगमूर्ति भरला हरि अंगीं ॥

अंगभेद सरला हरिसंगीं । संगभाग हरला मतिभंगी ॥१७८॥

दयासागराची दया ज्यासि जाली । स्वबोधें प्रवृत्ती तयाची निमाली ॥

महत्प्राप्ति तो पावला मुक्त जाला । स्वरूपार्णवीं सर्वकाळीं विराला ॥१७९॥

धरीना कधीं प्रीति जो क्रोधकामीं । करी वास विश्रांति घेउनि रामीं ॥

घड्या औठ तेणेंचि पैशून्य केल्या । तयाच्या मती मोक्षसद्मासि गेल्या ॥१८०॥

भजे ० पद्मनेत्रासी सोडुनि सद्मा । सुखालागिं त्याचा करी संग ० पद्मा ॥

अती वंद्य तो ० पद्मजालागिं जाला । धरी ० पद्मनाभी शिरीं नित्य त्याला ॥१८१॥

तोडुनि मायामय पाश नाना । करी सदा अमृत सार पान्हा ॥

ते माउली घालित ज्यासि पान्हा । या गोपुरीं केवळ तोचि कान्हा ॥१८२॥

ठेवुनियां हात शिरावरी हो । दावी हरी येक निरंतरीं हो ॥

एकांत हा नित्य करूनि त्यासी । म्यां साधिली आत्म० पदीं मिरासी ॥१८३॥

० पद ६६५ वें गोपी गीतेची चाली

निकट अंतरीं चिंतितां हरी । विकट शोक हा नासला तरी ॥

द्वैत-दैन्य तें पळतसे दुरी । कल्पवृक्ष हा फळतसे घरीं ॥१॥

० पद्मनेत्र जो नंदपुत्र जो । काम-शत्रुचा पूर्ण मित्र जो ॥

भक्तामानसा दानपात्र जो । आठवा हरी सौख्यमात्र तो ॥२॥

चिंतितां हरी शोक संव्हरी । चिंतितां हरीदास उद्धरी ॥

चिंतितां हरी मुक्त तो करी । चिंतितां हरी सर्वही करी ॥३॥

चिंतितां हरी वासना सरे । चिंतितां हरी कल्पना हरे ॥

चिंतितां हरी द्वैत वोसरे । चिंतितां हरी चीत तें नुरे ॥४॥

चिंतितां हरी पाप भंगलें । चिंतितां हरी कर्म खंगलें ॥

चिंतितां हरी चित्त रंगले । चिंतितां हरी ध्यान लागलें ॥५॥

रक्षिली धरा घेउनी सिरीं । तोचि गोकुळीं नांदतो हरी ॥

चित्त चोरुनी ध्यान तूं करीं । स्वामि तो नसे सर्वथा दुरी ॥६॥

संतसंगतीं मोक्ष साधला । संतसंगतीं राम लाधला ॥

संतसंगतीं भेद भस्मला । संतसंगतीं हेचि चित्कळा ॥७॥

संतसंगतीं संग सांडिला । संतसंगतीं रंग मांडिला ॥

संतसंगतीं काम राडला । संतसंगतीं राम भेटला ॥८॥

संतमानसीं इंदिरा वसे । इंदिरापती सर्वदा असे ॥

संगभंग ज्या सत्० पदीं नसे । त्यासि तो हरी अंतरीं दिसे ॥९॥

संतसंगतीं इंदिरापती । पाविजे असें वेद गर्जती ॥

शास्त्र० पद्धती हेच बोलती । सत्० पदीं घडे माधवीं गती ॥१०॥

बंध-सोडते संत भेटले । तत्कृपाबळें दोष आटले ॥

दाटला हरी अंतरीं सदा । चित्त पावलें अक्षया ० पदा ॥११॥

संतवीर ते तत्त्वधीर ते । ज्ञानचंद्र ते आठवा मनीं ॥

शास्त्रसार ते माक्षद्वार ते । निर्विकार ते वर्तती जनीं ॥१२॥

आर्त-बंधु ते प्रेमसिंधु ते । विश्र्ववंद्य ते लीन चिद्घनीं ॥

संगहीन ते भेदशून्य ते । ब्रह्मपूर्ण तें संचले मुनी ॥१३॥

संतसंगतीं पारधी करूं । चित्त-पांखरूं चित्सुख धरू ॥

कर्म-काननीं राहिला कसा । शीघ्र तो हरूं वासना-ससा ॥१४॥

गर्वशोर हा मातला सदा । सैर धावतां नावरे कदा ॥

नीट हात हा त्यावरी करूं । धीट होउनी त्यासि संव्हरूं ॥१५॥

भेद-पर्वतीं शोक-कंदरीं । अहंव्याघ्र तो गर्जना करी ॥

बोण-बाण हा वोढुनि विधी । त्यासि निर्दळूं हेचि पारधी ॥१६॥

काम वेणु हा रंक बापुडा । चंचळ मति अंतरीं कुडा ॥

तत्त्व गोळिचा मार चोखडा । देउनी हरूं प्राण रोकडा ॥१७॥

तत्त्व आकळे तत्वता जया । तत्त्व वेगळें नाढळे तया ॥

तत्त्वरूप तें वेद बोलती । चिंतितां ० पदें देव डोलती ॥१८॥

इंदिरापती राम भेटला । कामसिंधु हा सर्व आटला ॥

दाटला मनीं प्रेम वारधी । द्वैतभावना नाठवे कधीं ॥१९॥

याज्ञवल्किचा प्राण जो हरी । त्यासि जनकही अंतरीं धरी ॥

सेविजे जया तारकें सुखें । तत्० पदीं करा वास कौतुकें ॥२०॥

श्रेष्ठ जे बहु वंद्य या जनीं । व्यास-वाल्मिकादीक हे मुनीं ॥

चिंतिती जया चित्त सारुनी । तोचि आठवा आठवा मनीं ॥२१॥

नित्य मुक्त जो संचला हरी । तोचि राज्य या गोकुळीं करी ॥

आठवेविना आठवा तया । सर्वथा तुम्ही गोकुळा नया ॥२२॥

साधुचा तुम्हीं संग सांडिला । तऱ्हिच गोकुळीं भजा गोकुळातिता ॥२३॥

सर्व गोकुळें जेथ आटती । त्यास गोकुळीं संत भेटती ॥

सांगतां जगीं चोज हे बहू । पूर्णिमा पळे घेउनी कुहुं ॥२४॥

संतसंगतीं रातला सदा । द्वैतभावना नाठवे कदा ॥

पावला ० पदा अक्षया तया । सेवितां निवे नित्य चिन्मया ॥२५॥

ज्यासि आवडे नित्य इंदिरा । इंदिरा नये त्याचिया घरा ॥

ज्यासि आवडे इंदिरापती । त्यासि वोळगे इंदिरा सती ॥२६॥

इंदिरा घरीं राज्य हें करी । हेंचि अंतरीं भावना धरी ॥

इंदिरापती आठवा तरी । इंदिरा तुम्हा मस्तकीं धरी ॥२७॥

सर्व रूप जो संचला असे । त्याचिया ० पदीं सर्व हें नसे ॥

त्यासि गोकुळीं गोपिकामिनी । भोगिती सदा तृप्त होउनी ॥२८॥

त्याग भोग हा राहिला जऱ्ही । भोगिती हरी अंतरीं तऱ्ही ॥

धन्य काळ हा बोलती मुखें । मज्ञ होउनी डोलती सुखें ॥२९॥

जोडिला सखा इंदिरापती । त्या सुखापुढें इंदिरा किती ॥

भोगिती सदा अक्षया ० पदा । लाधली तया कृष्ण सं० पदा ॥३०॥

भाग्य आमुचें माय केव्हडें । लाधलें फुका ब्रह्म येव्हडें ॥

सांगतां जगीं सांकडें दिसे । अर्थ पाहतां वांकडें नसे ॥३१॥

ज्यासि वर्णिती ० पद्मजें शिवें । त्याचियां ० पदीं वेंचिल्या जिवें ॥

धन्य गोपिका विश्र्वतारका । पार हा नसे त्यांचिया सुखा ॥३२॥

ज्याचिया ० पदीं आटली परा । त्यासि भेटतां राहिली त्वरा ॥

भोगिती तया इंदिरावरा । धन्य या जनीं गोपसुंदरा ॥३३॥

मार मारुनी चिंतिती सदा । त्यासि जो हरी नातुडे कदा ॥

त्यासि भोगिती गोपिकामिनी । पादरेणु हे वंदिती मुनी ॥३४॥

ज्यासि लक्षितां दृश्य आटलें । तेंचि या जनीं पूर्ण दाटलें ॥

भेटले सदा संतसंतती । रंगता पदीं पांगळे मती ॥३५॥

॥गोपीगीतमस्तु॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP