|
प्रसंग पडला म्हणजे दुष्ट माणसाचीहि खोटी प्रशंसा करुन आपला फायदा करुन घ्यावा लागतो. त्याखेरीज इलाजच नसतो. -सुंद्राबाई ११६. [ एका कोल्ह्याला नदीपार व्हावयाचें होतें. तेव्हां त्यानें सुसरीला थाप दिली कीं, मला पलीकडे नेऊन आण म्हणजे तुला तिकडला खाऊ देईन. सुसर फसली. तिनें त्याला पाठीवर घेतलें. पाठीवर असतांना कोल्ह्यानें तिचें वर्णन सुरु केलेः " सुसरीबाई, तुझि पाठ कशी ? कापसाची मोट तशी ! सुस्वरीबाय, तुझि कातडी मऊ, डपाशीं लाऊं आणि दोन पदें गाऊं ! सुस्वरीबाई, तुझे डोळे कसे ? लोण्याचे गोळे तसे ! सुस्वरीबाई, तुझें नाक कसें ? कोल्हापुरी माप तसें !" पुढें कोल्हा पळून गेला. -लोककथा २.२३०.]
|