आज्ञापत्र - पत्र ४६

ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.


किल्ल्याचा हवाला सरनोबती करीत असतां तो मृत्यू पावला तरी तो मामला त्याचे पुत्रास अथवा भावाबंदास न सांगावा. त्याचे पुत्र अथवा भाऊबंद असतील त्यांचे समाधान करुन त्यांचे स्वरुपानुसार आणखी उद्योग सांगून चालवावें. लस्कराचे सरदाराचे भावाबंदांस अथवा त्याचे निसबतीचे लोकांस परिच्छिन्न किल्याचा मामला सांगूं नये. तैसेंच येका घरचे भाऊबंद येक, दोन, तीन आहेत आणि तितकेहि गदवई तरी त्यांस किल्याचे मामले अवश्यमेव सांगावेच लागतात. काय निमित्त कीं, किल्याचे कामाचे माणूस मिळणें फार कठीण आहे. परंतु, त्यांस समीप समीप किल्यावर न ठेवावे. दूर दूर किले येकाचा हात येकास न पावें, मध्यें आणखी किले असतील यैशा किल्याचे मामले सांगोन सेवा घ्यावी. किल्यांतील मुलकांतील देशमुख-देशपांडे, पाटील-कुलकर्णी, चौगुले आदिकरुन मिरासी वतनदार त्यांस त्यांसमीपच्या किल्यावरी सेवा न सांगावी. त्यांचे वतनापासोन दहा-पांच गांवें दूर किले असतील तैशा किल्यांस ठेवावें. तेंच वतन आणि समीपतेची सेवा जाहल्यावरी चाकरी बरी दुरुस्त न राहतां क्षणांक्षणां घरास जाणार, किंबहुना वतनाचे आशेनें स्थळास भेद करुन दगाहि करणार. यांकरिता किल्याजवळील लोक किल्यांवर न ठेवावे.

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP