मराठी मुख्य सूची|दिन विशेष|ऐतिहासीक दिन विशेष|फाल्गुन मास| फाल्गुन शुद्ध १ फाल्गुन मास फाल्गुन शुद्ध १ फाल्गुन शुद्ध २ फाल्गुन शुद्ध ३ फाल्गुन शुद्ध ४ फाल्गुन शुद्ध ५ फाल्गुन शुद्ध ६ फाल्गुन शुद्ध ७ फाल्गुन शुद्ध ८ फाल्गुन शुद्ध ९ फाल्गुन शुद्ध १० फाल्गुन शुद्ध ११ फाल्गुन शुद्ध १२ फाल्गुन शुद्ध १३ फाल्गुन शुद्ध १४ फाल्गुन शुद्ध १५ फाल्गुन वद्य १ फाल्गुन वद्य २ फाल्गुन वद्य ३ फाल्गुन वद्य ४ फाल्गुन वद्य ५ फाल्गुन वद्य ६ फाल्गुन वद्य ७ फाल्गुन वद्य ८ फाल्गुन वद्य ९ फाल्गुन वद्य १० फाल्गुन वद्य ११ फाल्गुन वद्य १२ फाल्गुन वद्य १३ फाल्गुन वद्य १४ फाल्गुन वद्य ३० फाल्गुन शुद्ध १ दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व. Tags : marathiphalgunदिन विशेषफाल्गुनमराठी फाल्गुन शुद्ध १ Translation - भाषांतर हरिभाऊ आपटे यांचें निधन !शके १८४० च्या फाल्गुन शु. १ या दिवशीं मराठींतील सर्वश्रेष्ठ ध्येयवादी कादंबरीकार हरि नारायण आपटे यांचें निधन झालें. हरिभाऊंचे पालनपोषण त्यांचे चुलते महादेव चिमणाजी आपटे यांच्याकडून झालें. यांचें सुरुवातीचें शिक्षण मुंबईस झाल्यानंतर हे पुणें येथें आले व मॅट्रिक्युलेशनची परीक्षा पास झाले. कॉलेजमध्यें चारपांच वर्षे काढूनहि परीक्षा पास होणें कांही त्यांना जमलें नाहीं. परंतु याच वेळीं ज्ञानार्जनाचा मोठा हव्यास हरिभाऊंना लागला. इंग्रजी, संस्कृत, फ्रेंच व जर्मन या भाषांतील उत्तमोत्तम वाड्मयप्रकृतींचा आस्वाद त्यांनीं घेतला. हरिभाऊंची पहिली कादंबरी ‘पुणें वैभव’ या पत्रांत सन १८५५ मध्यें ‘आजकालच्या गोष्टीं-मधली स्थिति’ या नांवानें प्रसिद्ध झाली. त्यानंतर ‘गणपतराव’ प्रसिद्ध होऊं लागली. हरिभाऊंचे निर्माण झालें होतें. यानंतर यांच्या कादंबर्यांना भरीव स्वरुप प्राप्त झालें. लोकशिक्षणाचें व बहुजनसमाजांत विचारजागृति करण्याचें कार्य करण्यासाठीं सन १८९० मध्यें यांनी आपलें स्वत:चे ‘करमणूक’ पत्र काढले. ‘पण लक्षांत कोण घेतो ?’ ही ‘करमणूकीं’ त प्रारंभी प्रसिद्ध झालेली कादंबरी होय. याच पत्रांत त्यांनीं एकूण आठ सामाजिक व दहा ऐतिहासिक कादंबर्या, आणि शेंकडों उत्कृष्ट गोष्टी लिहिल्या. मी, यशवंतराव खरे, भयंकर दिव्य, मायेचा बाजार, उष:काल, सूर्योदय, सूर्यग्रहण, चंद्रगुप्त, वज्राघात, इत्यादि यांच्या कादंबर्या प्रसिद्ध आहेत. या कादंबर्या त्यांनीं जनमनरंजनार्थ लिहिल्या नाहींत. त्या पतितांच्या उद्धारासाठीं, दीनांच्या दु:खविमोचनासाठीं, मार्गभ्रष्टांना सन्मार्गदर्शनासाठीं, हताश झालेल्या हृदयांत नवचैतन्य उत्पन्न करण्यासाठीं, समाजशुद्धीसाठीं, राष्ट्रीय भावना उद्दीपित करण्यासाठीं लिहिल्या नाहींत. त्या पतितांच्या उद्धारासाठीं, दीनांच्या दु:खविमोचनासाठीं, मार्गभ्रष्टांना सन्मार्गदर्शनासाठीं, हताश झालेल्या हृदयांत नवचैतन्य उत्पन्न करण्यासाठीं, समाजशुद्धीसाठीं, राष्ट्रीय भावना उद्दीपित करण्यासाठीं लिहिल्या. ‘संत सखूबाई’ व ‘सती पिंगला’ हीं दोन नाटकेहि यांनीं लिहिलेलीं प्रसिद्ध आहेत. यांनीं आपल्या अंगच्या गुणांवर व बुद्धिकौशल्यावर लौकिक मिळविला. स्वत: पदवीधर नसतांहि हे विद्यापीठांत उच्च परीक्षेंत परीक्षक म्हणून असत. -३ मार्च १९१९ N/A References : N/A Last Updated : October 05, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP