मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे| श्री समर्थ रामदास स्वामींचा पोवाडा पोवाडे महात्मा फुले शिवाजी महाराज अज्ञात शाहिर पेशवाईच्या उत्तरार्धाचा पोवाडा श्री समर्थ रामदास स्वामींचा पोवाडा शहाजीची सुटका लोकमान्य टिळक पोवाडा महात्मा गांधीचा पोवाडा झाशीची राणी इचा पोवाडा हुतात्मा बाबू गेनू याचा पोवाडा लेखणी तलवार भांडण दारुबंदी पोवाडा ४२ चे चळवळीचा पोवाडा वडगावची लढाई काँग्रेसचा पोवाडा छ. राजाराम महाराजांचा पोवाडा कल्य़ाण खजिना पोवडा श्री समर्थ रामदास स्वामींचा पोवाडा इतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो. Tags : powadaramdasपोवाडारामदास श्री समर्थ रामदास स्वामींचा पोवाडा Translation - भाषांतर धन्य धन्य समर्थ रामदास । चिरंतन वास । सज्जनगडास । यात्रा वद्य नवमी माघ मासास । समाधि दर्शने मोदचित्तास । वाटे आत्मारामतनय शाहिरास ॥श्रीराम प्रभू जन्मला । चैत्र नवमीला । दुपारी माध्यान्हिला । त्याच वेळि समर्थ आले जन्मास । रामोपासना त्यांचे वंशास । "रामफळ" जणूं समर्थ रामदास ॥आठवे वर्षि वडिल बंधूला । नारायण म्हणाला । उपासना मला । द्या असा हट्ट धरुनी बसला, रुसूनी देवळात जाऊनी निजला उठवुनी रामे मंत्र दिधला ॥यशोदेनें पाहुनी कृष्णाला । लोण्याचा गोळा । घेऊनी खाल्ला । पळू लागता धरला गुलामास । उघड बघू तोंड म्हणे कृष्णास । पाहूनी चकित विश्वरुपास ॥थेट तस्सा अनुभव आला । राणुबाईला । पाहूने नारायणाला । म्हणे काय करतोस अंधारात । ऐका उत्तर दिले तोर्यात । चिंता विश्वाचि करितो चित्तांत ॥द्विज जेव्हां वदले सावधान । ऐकूने कोण । सावध होऊन पळाले फक्त रामदास । नाना प्रुरश्चरणे गोदातीरास सूर्योपासना केली नाशकास ॥चाल :- १तेरा कोटी राम नाम जपले । पुरश्चरण गायित्री केले ॥बारा वर्षे तप तिथे केले । रविसम तेज प्रगटले ॥ग्रंथांचे ज्ञान मिळविले । वैराग्य शुकासम लाभले ॥हरि कीर्तन निरुपण केले । कीर्तनी लोक डुलवीले ॥चाल :-२पंचाग्नि साधने "सोन्यासम" तळपले । वरि सूर्य खाली गोदेंत उभे तप असले ।समर्थाचे पाय माशांनि पार कुरतडले ।पाहुनि घोर तपश्चर्या चकित जन झाले ।कृपादृष्टी रामरायाची, दर्शन घडले ।रामाज्ञे तीर्थाटन पायीं त्यांनी सुरुं केले ।चाल मोडते :आसेतु हिमाचल भ्रमण । तीर्थाटन करुन । उठले पेटून । अन्नाविण तडफडणारे पाहुण । मंदिरे उध्वस्त गेली होऊन ।हृदय समर्थांचे गेले पिळवटून ॥चौक २ रा यवनांनी मूर्ती फोडिल्या । स्त्रिया भ्रष्टविल्या । ऐकूनी किंकाळ्या । यवन सेनेचा पाहुनि धुमाकुळ । हिंदूंचा केला अनन्वित छळ । अंतरी ज्वालामुखीचा लोळ ॥यवनांनी हिंदु बाटवून । स्त्रिया पळवून । गायि कापून । हिंदू राजांच्या राण्या पळवून । मंदिरांच्या मशिदि केल्या पाहून । उठले तत्काळ समर्थ खडबडून ॥प्राणिमात्र जाहले दु:खी । नाही कुणीं सुखी । निनयिका । असे सूर चित्र पाहून । उदासी वृत्ती गेली होऊन । स्वराज्य मार्ग काढला शोधून ॥चाल :-१डोळ्यांची झोप उडाली । जलावीण जशी मासोळी ।चिंतेत समर्थ माऊली । कृष्णाकाठिं होति बैसली ॥दृष्टांत होता उडि घाली । अंगावरी मूर्ती सांपडली ॥मिरवीत मूर्ति आणिली । चाफळी स्थापना केली ॥रघुवीर समर्थ आरोळी । महाराष्ट्रिं त्यांनी घुमविली ॥बलहीन जनाना पटली । हनुमान मूर्ती महाबळी ॥चाल:-२रात्रीत आकरा मारुती केली स्थापना ॥गांवोगावि घुमविती तरुण तालिमखाना ॥बजरंग बलीच्या तरुण करिति गर्जना ॥ बाराशे मठ स्थापूनि महंत योजना ॥दासबोध ग्रंथाचे सतत चाले पारायणा ॥क्रांतिकारि योगि सत्पुरुष भेटले शिवबाना ॥इटलीस मेंझिनी इथे समर्थ राणा ॥"यंग इटली’ त्यांची, समर्थांची महंत संघटना ॥"कुबडीत गुप्ती" तशी करा " गुप्त संघटना" ॥फेकुनी टाळ, तलवार दाखवा यवनांना ॥वाघाचे बच्चे तुम्ही भिता काय शत्रुना ॥गवसले समुद्र-मंथनी अमृत देवांना ॥स्वातंत्र्य अमृत गवसले समर्थ शिवबांना ॥मिळविण्या मोक्ष घ्या "रामनाम" साधना ॥राष्ट्राचा साधण्या मोक्ष करा नामी संघटना ॥चाल मोडते :-रामजन्म उत्सव सुरु केले । प्रभावित झाले । क्षात्र तेजें दिपले । रामोपासना महाराष्ट्रात । घरोघर गेली जन हृदयात । झळकू लागली तरुण रक्तांत ॥॥ चौक ३ रा ॥राम राय देव देवांचा । ज्यांने रावणाचा । वध केला त्याचा । आदर्श समर्थांनी दिला शिवबास । भेट दोघांची चाफळ गांवास । रामोपासना त्याच्या समयांस ॥जनशक्ती तोंड देण्याला । राज्य घेण्याला । सिद्ध शिवबाला । वानरसेना जशी रामास । मावळी सेना तशी शिवबास । हड्डि यवनांचि नरम करण्य़ास ॥समर्थ शहाजि भेट नाशकाला । अंतरि मेळ जमला । कारवाई करण्याला । शिवबाला जोर त्यांने चढलां । कडेकोट किल्ले बांधण्याला । राष्ट्राची शक्ती वाढण्याला ॥चाल : १सकळ जनांतरिचा देव । उठविला रिताना ठाव ॥शोधला असा उपाय । जन हृदयिं मिळाला वाव ॥जेव्हां धर्म येतो धोक्यांत । राजशक्ति हवी हातांत ॥शिवसमर्थ जोडि मिळाली । कृष्णार्जून ती वाटली ॥रणभेरी त्याची गर्जिली । स्वराज्याचि यांचि आरोळी ॥स्वप्राणबळें घुमविली । स्वातंत्र्य ज्योत फुलविली ॥जनशक्ती तरारुनी उठली । जोडिच्या पाठि ठाकली ॥चाल: - ३समर्थांची तेजस्वी मूर्ती । तपे तलपती । बुद्धीवान अती । प्रभावित होती हो । जनता भोंवती ॥समर्थांछि अमोघवाणी । चैतन्यखनी । ऐकूनी कर्णी । रंगली कीर्तई हो । तरुण मंडळी ॥इटालीचे स्वातंत्र्य उद्गाते । मेंझिनी होते । तसेच भारताचे । रामदास होते हो । शंका ना तिथे ॥समर्थांची पुण्याई मोठी । प्रत्यक्ष राम म्हणति । " प्रसंग हा तडातडी । करा विवेक तातडी । उठा उठा करा कृति । लोकोद्धारासाठी हो । मी आहे पाठी" ॥चाल :-२सांगूनि गीता अर्जुना युद्धा उठविले दासबोध सांगुनी (समर्थे) जना जागृत केले ।रामानी दुष्ट रावणाचे हनन केले ।शिवबांनी औरंग्यासम कैक लोळविले ।भवानीच्या कृपेने राज्य स्थापन केले ।थाटात राज्यारोहण रायगडीं केले ।जिजाईंचे डोळे आनंद अश्रूनी भरले ।"जाहले उदंड पाणि" समर्थ वदले ।भवानिला " सुवर्ण पुष्प" त्यांनी वाहिले ।"वाढवी तुझा तू राजा" मागणें केले ।चौक ४ था समर्थ भक्त श्री. देव अलौकिक । मोठे संशोधक । ध्यास त्या एक । लावणे शोध " शिवथर घळिचा" । लागता वाटेहा शोधचि स्वर्गाचा । आनंद मावेना गगनि त्यांचा ॥जिथें दासबोध गंगा अवतरली । भूमी, ती सगळी । पावन झाली । नाना साहेबानी स्वर्ग समजून । तेथ शिव समर्थांना वंदून । पवित्र मातीत घेतले लोळून ॥चाल :- ४हिमगिरि शंकर करि हरि चिंतन । समर्थ प्रभु चिंतन तसें करि शिवथर घळि बैसून ॥निसर्ग सुंदर त्याच घळीचे । "सुंदर मठ" म्हणून । समर्थे नांव दिले ठेऊन ॥इथेचि केली गुप्त खलबते । शिव समर्थ जोडिनं । बांधिले स्वराज्याचे तोरण ॥चाल :-१ करा आधि प्रपंच नेटका । मग परमार्थाचे विवेका ॥दासबोध, क्रांतिकारी ग्रंथ । साधका आधार स्तंभ ॥परमार्थ प्रपंच सांगड । कांहि संत म्हणती हे बंड ॥सांगडीचे समर्थ तत्वज्ञान । वाटे अंमृत जनाजीवन ॥स्थापक वैद्य बाबुरावांना होति तळमळ ॥चाल :- २हा दीप स्तंभ घेऊन समर्थ मंडळ ।मालखीच दर्शन होता खूष जवाहरलाल ॥त्रिशताब्दि उत्सवी केला हलकल्लोळ । त्यासाठी ख्यात श्री समर्थ सेवामंडळ ।लाखोनि लोक लोटले घेण्या दर्शन ।व्याख्यान, लेखनाद्वारे जनजागरण ।कीर्तन, भजन आणि दासबोध पारायण ।जन होति थक्क उत्सव थाट पाहून ।उत्सवी भगवा शोभतो मोठ्या डौलाने फडकविला तोच वैकुंठी रामदासानं ।वैकुंठि लाविली ध्वजा रामदासानं ।वैकुंठि भक्तिची ध्वजा लाविली त्यानं ।चाल मोडली :-महापुरुष योगि रामदा । महाराष्ट्रास । गुरु शिवबास । आत्म आणि क्षात्र तेज समयास । लाभले स्वतंत्र देश करण्यास । नमन शाहिरांचे समर्थ चरणास. --- समाप्त --- N/A References : N/A Last Updated : January 09, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP