मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचसमासी| समास ५ पंचसमासी समास १ समास २ समास ३ समास ४ समास ५ पंचसमासी - समास ५ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ समास ५ Translation - भाषांतर ॥ श्रीराम समर्थ ॥ आतां शिष्या सावधान । मागील कथानुसंधान । झालिया आत्मनिवेदन । आली वृत्ति मिथ्यत्वें ॥१॥धन पाहोनि लोभी आलें । परी मन तेथेंचि बैसलें । शरीरप्रकृतिं । भ्रांतापरी ॥२॥कार्य करी प्रपंचाचें । ध्यान लागलें धनाचें । अंतर गुंतलें तयाचें । द्रव्याकडे ॥३॥ऐसें परम झालें मन । ध्यानीं आठवे धन । पिसें लागलें स्वप्र । तैसेंचि देखे ॥४॥तो ज्ञाता समाधानीं । प्रारब्धयोगें वर्ते जनीं । परी अनु-संधान मनीं । वेगळेंची ॥५॥वृत्ति गुंतली स्वानुभवें । जनीं तेंचि भासे आघवें । सबाह्य व्यापिलें देवें । ब्रह्मांड अवघें ॥६॥वृत्ति मुळाकडे पाहे । त्यास राम दिसताहे । स्तब्ध होवोनियां राहे । रामचि दिसे ॥७॥मन मुरडे आटे । तंव मार्गीं राम भेटे । मागें पुढें प्रगटे । रामचि अवघा ॥८॥दाही दिशा अवलेकितां । रामचि भासे तत्त्वतां । वदन चुकवूं जातां । सन्मुख राम ॥९॥राम झालिया सन्मुख । कल्पांतीं नव्हे विन्मुख । नेत्र झांकितां अधिक । रामचि दिसे ॥१०॥मग विसरोनि पाहिलें । तंव तें रामचि झालें । जीव सर्वस्वें वेधिले । संपूर्ण रामें ॥११॥मग आपणा पाहे । तंव रामचि झाला आहे । उभय-साक्षी जो राहे । तोचि राम ॥१२॥रामेंविन सर्वथा कांहीं । अणुमात्र रितें नाहीं । दृश्य द्रष्टा दर्शन तेंही । रामचि भासे ॥१३॥प्रपंच सारिला मानसें । दृढ लागलें रामपिसें । देह वर्ते भ्रमिष्ट जैसें । पिशाचवत् ॥१४॥रामरूपीं वेधलें मन । तेणें राहे कुलभिमान । पूर्व दशेचें लक्षण । पालटोनि गेलें ॥१५॥धरूनि रामरूपीं आवडी । प्रपंच गेला ताडातोडीं । माया राहे बापुडी । न चले कांहीं ॥१६॥प्रत्यक्ष जन प्रगटला । दृश्य पदार्थ बोधिला । असतच नाहींसा झाला । सद्रुरुप्रतापें ॥१७॥ऐसें नाहीं हेंगे तेंगे । ऐसें तैसें पुढें मागें । पूर्वस्थिति बोलणें लागे । ऐसिया परी ॥१८॥स्वरूप बोलिलें नव जाये । बोलिल्यावीण हातां नये । म्हणोनि शब्द उपाये । रचिला देवें ॥१९॥शब्दाचे उदरीं अगाध । सांठवला नीतिबोध । अर्थ पहातां स्वानंद । तुंबळे बळें ॥२०॥शब्दमथन शब्दें केलें । अर्थ नवनीत प्रगटलें । मथनकर्त्यासी भक्षिलें । त्या नवनीतें ॥२१॥प्रपंचतक्राअंतरीं । नवनीत वास्तव्य करी । तक्र आटोनि पात्रभरी । नवनीत झालें ॥२२॥अवघें नवनीत दाटलें । तेणें बळें पात्र फुटलें । नवनीतें संपूर्ण झालें । ब्रह्मांड अवघें ॥२३॥तेथेंहि दाटलें उदंड । तेणें उतटलें ब्रह्मांड । सकळ लोपोनि उदंड । तेंचि तें झालें ॥२४॥नवनीत प्राप्त व्हावयासी । जातां तयासि तेंचि ग्रासी । सकळ पदार्थमात्रासी । नवनीतें सेविलें ॥२५॥सेविलें आपणा आपण । हे अनुभवाची खूण । ग्रंथ झाला संपूर्ण । पंचसमासी ॥२६॥सद्रुरूसी जातां शरण । शीघ्र तुटे जन्ममरण । सर्व मनोरथ पूर्ण । होती वचनमात्रें ॥२७॥देह नासे क्षणांतरीं जाणोनि सार्थक करी । तो एक धन्य संसारीं । सत्संगेंचि ॥२८॥उपजला प्राणी तो नासे । आपणा तो मार्ग असे । म्हणोनि दृढ विश्वासें । सद्रुरुपाय धरावे ॥२९॥चालवीत असतां आश्रम । जे होइजे आत्माराम । ऐसा हा सत्यमागम । महिमा कोटिगुणें ॥३०॥श्रोतीं सावध होणें । अंतकाळीं लागे जाणें । येथील राहाती सजणें । आणि संपत्ति ॥३१॥बहु जन्मांचे शेवटीं । नरदेह पुण्यकोटी । म्हणोनि भगवंता भेटी । होती सत्संगें ॥३२॥ऐशी खूण सकळांस । सांगोनि गेला रामदास । सत्संगे जगदीश । नेमें भेटे ॥३३॥अरुख बोबडी वाणी । भावें पूजिला कोंदडपाणि । न्यून पूर्ण संतजनीं । क्षमा केली पाहिजे ॥३४॥॥ पंचसमासी ग्रंथ संपूर्ण ॥ ओवीसंख्या ॥१५०॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP