अंतर्भाव - समास ४

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥ श्रीराम समर्थ ॥  
सिद्ध होऊन बैसला । दृष्टीं नाणी साधनाला । सादर अशन शयनाला । अत्यादरें ॥१॥
ऐसा असे विषयासक्त । अत्यंत विषयीं आसक्त । सिद्धपणें आपण घात । तेणें केला ॥२॥
जो सिद्धांचा मस्तकमणी । महासतापसी शूलपाणि । तोहि आसक्त श्रवणीं । जपध्यानपूजेसी ॥३॥
अखंड वाचें रामनाम । अनुष्ठान हेंच परम । ज्ञान वैराग्यसंपन्नकाम । सामर्थ्यसिंधू ॥४॥
तोहि म्हणे मी साधक । तेथें मानव पुढें रंक । बापुडे सिद्धपणाचें कौतुक । केवीं घडे ॥५॥
म्हणोनि साधनाशीं जो सिद्ध । तोचि ज्ञाता परम शुद्ध । येर ते जाणावे अबद्ध । अप्रमाण ॥६॥
साधनेंवीण बाष्कळता । तीच जाणावी बद्धता । तेणें अनर्गळता । आसक्तरूपें ॥७॥
मन सुखावलें जिकडे । अंग टाकिलें तिकडे । साधन उपाय नावडे । अंतरापासोनी ॥८॥
चित्तीं विषयाची आस । साधन म्हणतां उपजे त्रास । नेम धरितां कासावीस । परम वाटे ॥९॥
दृढ देहाची आसक्ति । तेथें कैंची विरक्ति । विरक्तीवीण भक्ति । केवीं घडे ॥१०॥
ऐक शिष्यटिळका । नेम नाहीं साधका । तयालागीं धोका । नेमस्त आहे ॥११॥
तंव शिष्य म्हणती । अंतीं मति तीचि गति । ऐसें सर्वत्र बोलती । मी काय करूं ॥१२॥
अंतीं कोण अनुसंधान । कोठें ठेवावें मन । कैसें करावें साधन । अंतसमयाचें ॥१३॥
समय येईल कैसा । हा न कळे भरंवसा । प्राप्त कोण दशा । हें शोत नाहीं ॥१४॥
आशंका घेतली मनें । बोलतों करुणावचनें । याचें उत्तर शोतेजनें । सावध ऐकावें ॥१५॥
इति श्रीअंतर्भाव०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP