पंचमान - मान ३

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


धन्य ते योगीये साधु । पावले परमेश्वरा ।
आपुलें हीत तें केलें । तरले तारिले जना ॥१॥
सत्कर्में शोभती वेष । बोलणें मधुरा गिरा ।
पुण्यात्मे सुकृती न्याई । योजिती धर्मस्छापना ॥२॥
विशाळा पावना बुधी । विशाळा सुखकारकी ।
परोपकारणी काया । परत्र लोंकसंग्रहीं ॥३॥
यातना सेवका नाहिं । ते तवं ईश्वरी तनु ।
उपायें सोडवी लोकां । तो संग सुकृतें घडे ॥४॥
सन्मार्ग साधनालागी । संग तों पाहिजे बरा ।
सत्संग शोधितां नाहिं । सत्संग हीतकारकु ॥५॥
कुसंगें नासती प्राणी । सत्संगें पावती पदा ।
यांत मानेल तें घ्यावें । सर्वज्ञ जाणते तुम्ही ॥६॥
संसार पाहिला डोळां । रंग वोरंग होतसे ।
हांसती रुदती प्राणी । सुखदु:खें परोपरीं ॥७॥
देखिलें चाखिलें मागें । जन्मदारभ्य आठवे ।
निशेष राहिल्या शक्ती । रोग व्याधी विटंबणा ॥८॥
दैन्यवाणा देहे जातो । ते काळीं हीत नाकळे ।
म्हणोनि धन्य ते साधु । मायात्यागेंची सुटले ॥९॥
संपती संतती विद्या । शक्ती सामर्थें जातसे ।
दक्ष ते जाणती आधीं । बावळीं भुलली मदें ॥१०॥
राहिला कोण ये लोकीं । संहार रावणादिकां ।
इतरां कोण तो लेखा । नेणती मूढ माणसें ॥११॥
मधेंची झांकिली काया । येतां जातां दिगांबरी ।
जाणती तापसी योगी । संगत्यागें सदा सुखी ॥१२॥
मी मोठा मी मोठा वाटे । न शोधितां वसुंघेरा ।
चालिला गर्व कोणाचा । काळ हा घसरी जना ॥१३॥
पाहाता रंक ते राजे । राजे रंक पुन्हपुन्हा ।
भर्वसा कोण मानावा । हाणी मृत्य समागमें ॥१४॥
लाभ तो येक जाणावा । परमात्मा परमेश्वेरु ।
भक्तीनें आपुला कीजे । विचक्षणें चुकों नये ॥१५॥
चुकतां मुख्य देवासी । चुकेना येम यातना ।
म्हणोनि सद्नुरु कीजे । न कीजे आवलक्षणु ॥१६॥
शाक्त मुक्त अनाचारी । मंत्र येंत्र करामती ।
नाटकी चेटकी भोंदु । तो गुरु न मने मना ॥१७॥
कर्मठु नित्य संदेही । ज्ञानहीण तमोगुणी ।
अवैरागी माहांडंभी । तो गुरु न मने मना ॥१८॥
तीर्थें व्रतें तपें दानें । बहुधाशास्रनिश्चंई ।
प्रत्ययो नाडले जेथें । तो गुरु न मने मना ॥१९॥
असार कोण तें नेणे । सार तें तों कळेचिना ।
सर्व सार वदे लोकां । तो गुरु न मने मना ॥२०॥
कर्ता कोण तो नेणे । नेणे चंचळ निश्चळु ।
त्रिगुण कोण तें नेणें । तो गुरु न मने मना ॥२१॥
निष्ठाहीण अविश्वासी । वेसनी परधातकु ।
भ्रमिष्ट आळसी मंदु । तो शिष्य न पवे पदा ॥२२॥
लालची तामसी वेडा । नष्ट भ्रष्ट बहुचुकु ।
प्रज्ञाहीण प्रेत्नहीण । तो शिष्य न पवे पदा ॥२३॥
सुखवासी गोडग्रासी । निकामीच निसंगळु ।
कदापी धारणा नाहिं । तो शिष्य न पवे पदा ॥२४॥
विवरेना विचारीना । श्रवणीं मननीं कदा ।
प्रत्यय पाहिल्यावीण । तो शिष्य न पवे पदा ॥२५॥
तत्वज्ञानें ब्रह्मज्ञानें । पिंडब्रह्मांडनायेकु ।
विवेकें चोजवीना जो । तो शिष्य न पवे पदा ॥२६॥
इति श्रीपंचमाने स्वल्प संकेते ॥ गरुशिष्यलक्षण नाम ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP