आरती सद्रुरूची - जय जय आरति सद्रुरु स्वामी...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


जय जय आरति सद्रुरु स्वामी समर्था ।
काया वाचा जिवें प्राणें ओवाळिन आतां ॥ध्रु.॥
ब्रह्मा विष्णू हरादिक मानसीं ध्याती ।
सुरवर किन्नर नारद तुंबर कीर्तनीं गाती ।
आगम निगम शेष स्फूर्ती मंदली गती ।
तो तूं आम्हां पूर्ण कामा मानवा प्राप्ती ॥१॥
ऋषिवर कविवर मुनिवर ज्ञानी तुझे स्थापीले ।
षड्‍दर्शनीं मत्त गुमानी पंथ चालीले ।
अपरांपर परात्परा पार ना कळे ।
पतीत प्राणी पदालागुनी कल्याण जाले ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP