चौचरणी वोव्या - माझ्या स्वामींचे वचन

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


पतित मी होतों पावन चि केलें । लागतां पाउलें सामियाचीं ॥१॥
स्वामियाचे पाय देखतां नयनीं । जालें जनीं वनीं समाधान ॥२॥
समा़धान घडे बहुता सुकृती । सज्जनाचे चित्तीं मिळों जातां ॥३॥
मिळतां मिळणी ऐक्यरूप होता । वेगळें पडतां पतन ची ॥४॥
पतनीं पडिले शब्दज्ञानी जाले । साउलीच बोले वाउगीची ॥५॥
वाउगे बोलिले वेष पालटिले । हिंडो चि लागले दारोदारीं ॥६॥
दारोदारीं जैसे श्वान हिंडतसे । कामक्रोध वसे हदयामाजीं ॥७॥
हदयामाजीं काळकूट हे कल्पना । दिसे वृंदावना बाह्याकार ॥८॥
बाह्याकारें स्नान बाह्याकारें संध्या । बाह्याकारें विद्या दावीतसे ॥९॥
दावीतसे जना नानापरी भाव । बुडतयाचा पाव खोलाकडे ॥१०॥
खोल हा संसार तयांत बुडाला । धोका हा लागला रात्रंदीस ॥११॥
रात्रंदिवस धोका वाहात चि गेला । काष्टवत जाला वाळोनिया ॥१२॥
वाळला आपण बोलतसे पण । पोरें वणवण करीताती ॥१३॥
करिताती चिंता लग्राची सर्वदा । मागुती वेवादा उठताती ॥१४॥
उठतां बैसतां करी नाना चिंता । सज्जनाच्या चित्ता कानकोडें ॥१५॥
कानकोंडे जालें तया मुक्ति कैंची । जितां चि पावती नर्कपात ॥१६॥
नर्कपात चुके सज्जन सेवितां । सर्व शास्त्र गीता बोलतसे ॥१७॥
बोलतसे माझ्या स्वामीचें वचन । सर्व हि सज्जन समाधान ॥१८॥
समाधान जालें सज्जना सेवितां । मुक्ति सायोज्यता घर रीघे ॥१९॥
घर रीघे ऋद्धिसिद्धि हे पहातां । मनांत तत्त्वता रामरूप ॥२०॥
रामरूप सर्व कल्याण अंतरीं । कीर्ति निरंतरीं जगामाजीं ॥२१॥

N/A

References : N/A
Last Updated : March 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP