काव्यरचना - बळी राजा

महात्मा फुल्यांनी हे काव्य व्यक्तिमात्रास अनुलक्षुन लिहिले नसून फक्त उपमापर लिहून दिलगिरी व्यक्त केली.


आमुच्या देशीचे अतुल स्वामी वीर ॥ होते रणधीर ॥ स्मरुं त्यास ॥धृ.॥
बळिस्थानीं आले शूर भैरोना ॥ खंडोबा जोतीबा ॥ महासुभा ॥१॥
सद्‌गुणी पुतळा राजा मूळ बळी ॥ दसरा दिवाळी ॥ आठवीती ॥२॥
क्षेत्नीय भार्या "इडापिडा जावो ॥ बळीराज्य येवो" ॥ अशा कां वा ? ॥३॥
आर्यभट आले सुवर्ण लुटीलें ॥ क्षेत्नी दास केले ॥ बापमत्ता ॥४॥
वामन कां घाली बळी रसातळीं ॥ प्रश्न जोती माळी ॥ करी भटां ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 18, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP