श्रीजनार्दनस्वामींचे ताटीचें अभंग - ३

श्रीजनार्दस्वामींचे ताटीच्या अभंगांचे पारायण करणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभूती आहे.


राजयोगेंवीण न कळे ब्राह्मज्ञानें । प्रमाणें अनुमानें मेलियांही ॥१॥

पाहोनियां ग्रंथ केलिया ते खुण । न लमें दिल्या प्राण अनंतजन्में ॥२॥

व्रते तपें नेम केलियां पठण ॥ प्रतिमा पाषाण पुजिलियां ॥३॥

न लभे जनघमें मत अभिमानें ॥ तीर्थ उद्यापनें लक्षकोटी ॥४॥

पढों नये ग्रंथ त्यागावा कुळधर्म ॥ न घ्यावें जनकर्म उदाहरण ॥५॥

सेवावें उच्छिष्ठ निर्माल्य गुरुतीर्थ ॥ ऐको नये मात कवणांची ॥६॥

न करतां ग्रहण सेवों नये काहीं । अर्पावें सकळही श्रीगुरुसी ॥७॥

मानों नयें विटाळ राहों भलतें स्थिती । स्पशें दग्ध होती पापें सर्व ॥८॥

जोडती ते मेरू पुण्याचें अगणीत । पावन समस्त श्रीगुरुचेनी ॥९॥

दर्शन पूजन गुरुशेषेंवीण । सेवन ग्रहण पातकची ॥१०॥

गुरुच्या अमक्तांचें वर्जावें दर्शन । निश्चयें पतन तयासंगें ॥११॥

पाहों नये शास्तरें पुराणें चरित्रें । करावीं गुरुशास्त्रें पठण नित्य ॥१२॥

नलगे स्मार्त शैव वैष्णवादि मत । मेदाभेद व्यर्थ तर्कवाद ॥१३॥

संती सांगितलें तेचि आचरावें । व्हावें निज वैष्णवे ज्ञानें निज ॥१४॥

घेवों नयें तर्क दोषादि कल्पना । विचार वल्गना वाद शंका ॥१५॥

असो मलतैसे निंद्यही का नीच । परी योग्य तेंच करावयां ॥१६॥

श्रीगुरुंचे दास जगीं म्हणवावें । नाडले थोर थोर गर्वे अभिमानें ॥१७॥

म्हणें जनार्दन हे तें व्यर्थ आटी । उघडी भ्रमताटी एकनाथा ॥१८॥

N/A

References : N/A
Last Updated : January 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP